S
StoryPublisher
Guest
परपीडन आणि स्वपीडन विषयावरील मराठी कथा
स्वराची हाक ऐकून पूर्वा चालायची थांबली.
“वॉव..स्वरा…काय म्हणतेस ? कशी आहेस ?” स्वराचा हात हातात घेत पूर्वाने विचारले
“मी मजेत. तू कशी आहेस ? रोज येतेस का या बागेत फिरायला ?”
“हो. अग माझं घर इथे जवळच आहे ना”
“पण एकटीच ? अभिषेक नाहीत सोबत ?”
“अगं घरात जिम आहे , ते तिथेच व्यायाम करतात. पण मला सकाळी बाहेर फिरायला आवडतं. म्हणून मी येते”
“ओह..घरामध्येच जिम..बडे लोग. बडी बाते ..” स्वरा चिडवत म्हणाली.
“ए चूप ग…” पूर्वा लाजत लटक्या रागाने म्हणाली.
“चल ना पूर्वा थोडा वेळ गप्पा मारत बसूयात. रमेश ऑफिसच्या कामानिमित्त चार दिवस बाहेरगावी गेलाय म्हणून मी निवांत आहे. नाहीतर आम्हाला कुठे निवांतपणा”
दोघी बागेतील बाकावर बसल्या.
“पूर्वा मी तुझ्या लग्नाला तर आले, पण तुझं लग्न जुळलं कसं ..इतकं मोठं स्थळ कसं आलं…वगैरे काहीच माहीत नाही मला. सांग ना सगळी स्टोरी मला “
“अगं स्टोरी वगैरे काय..? तुला तर माहितीये आमची पण माहेरची परिस्थिती साधारणच आहे. आपलं ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर त्यांना माझ्या लग्नाची चिंता होतीच. ते एका छोट्या फर्ममध्ये अकाउंटट होते. पगार फारसा नव्हता पण त्यांच काम खूप चोख असायचं. अभिषेकच्या फर्ममध्ये अकाउंटटची गरज होती आणि कुणीतरी त्यांना बाबांचं नाव सुचवलं. त्यानंतर बाबांनी अभिषेकची फर्म जॉईन केली. नंतर फर्मच्या एका समारंभात सगळ्या कर्मचार्यांना सहकुटूंब बोलावलं होतं. आम्ही पण सगळे गेलो. तेव्हा अभिषेकनी मला पाहिलं. दोन दिवसांनी त्यांनी बाबांना घरी बोलावलं. माझ्याबद्दल विचारलं. त्यानंतर आम्ही सगळेच त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या घरी बघण्याचा छोटासा कार्यक्रम झाला आणि ठरलं लग्न.”
“हं.. तुला पाहून त्यांना पहिल्या नजरेतच प्रेमात पडलेत म्हणजे.तू आहेसच अशी सुंदर, ब्युटीक्वीन.. ए पण तुला कसं वाटलं त्यांना भेटून”
“बाई गं… माझा तर विश्वासच बसत नव्ह्ता. ते इतके मोठे, श्रीमंत, दिसायलाही देखणे आणि रुबाबदार. आणि त्यांनी मला अशाप्रकारे मागणी घालावी. मी तर गोंधळूनच गेले होते अगदी.”
“मग ? ते काय बोललेत ? तू काय बोललीस ?”
“मला तर काही सूचतच नव्हतं आणि ते पण जरा कमीच बोललेत. पण नंतर एकांतात बोलण्यासाठी आम्ही त्यांच्या खोलीत गेलो तेव्हा त्यांनी मला दोन गोष्टी सांगितल्या”
“काय ?”
“ते म्हणाले ‘पूर्वा मला तू बघताच क्षणी खूप आवडलीस. पण तू मात्र केवळ वडीलांच्या आग्रहाने हे लग्न करीत नाहीयेसना याची मला खात्री हवीय. तुझ्या मनात दुसरं कुणी असेल किंवा तुला मी आवडलो नसेन तर तसं स्पष्ट सांग. तुझ्या नकाराने तुझ्या बाबांना नोकरीत काही अडचण येईल अशी भिती मनात आणू नकोस. झालंच तर तुझ्या बाबांनाही मी समजवेन'”
“मग ? तु काय म्हणालीस ?”
“काय म्हणणार ? तुला तर माहित आहेच की माझं असं काही नाही. वयात आल्यापासून आई नेहमीच हे सांगत आली की प्रेम-बिम असलं काही करायचं नाही त्यात घराची बदनामी होते वगैरे. मी त्यांना म्हणाले की ‘असं काही नाहीये. मी मुलींच्या कॉलेजातूनच शिकले. आणि मलाही तुम्ही आवडलात. पण तुम्ही इतके मोठे..म्हणजे हुशार, श्रीमंत, कर्तॄत्ववान आणि मी अगदी सामान्य.'”
“मग ?”
“ते म्हणाले ‘तु खूप सुंदर आहेस, तुझा चेहरा, तुझे डोळे, तुझे केस, तुझे ओठ , तुझा गोरा वर्ण सगळं काही अतिशय सुंदर आहे. तुझा आवाज खूप गोड आहे'”
“ओह.. क्या बात.. तु तर लाजून लाल झाली असणार”
“हो नाहीतर काय. पहिल्याच भेटीत असं बोलतं का कुणी. आणि ते असं बघत होते माझ्याकडे की मला धड नजर वर करुन त्यांना बघायलाही शरम वाटत होती. थोड्या वेळाने ते म्हणाले ‘आता दुसरी गोष्ट ऐक. पती-पत्नीच्या नात्यात कुणी मोठं नसतं , कुणी लहान नसतं. हे नातं समानतेवर आधारलेलं असतं. तु ही असंच मानतेस ना ?’ त्यांच्या या प्रश्नाने मी अजूनच गोंधळून गेले. काय बोलावं काही कळेना. मी आपलं त्यांच्या हो ला हो केलं. मग ते म्हणाले ‘छान. पण आता ते विसरायचंस. कारण आपल्या नात्यात तुला नेहमीच माझं ऐकावं लागेल, माझ्या आज्ञेत रहावं लागेल. तुझे सगळे लाड मी पुरवेन, तुला कशाची कमी नसेल. पण सगळे अधिकार माझ्याकडेच असतील. आणि तु जाणतेपणानं एखादी आज्ञा मोडलीस तर मी खूप कठोर होईन. तुला हे मान्य असेल तर आणि तरच तु माझ्याशी लग्न कर.”
“मग तु काय म्हणालीस ?”
“मला तर काहीच कळेना. काही क्षणांपुर्वी रोमँटिक होवून माझ्या सौंदर्याची स्तुती करणारे अभिषेक आता हे काय बोलत आहेत. मला काहीच सुचेना काय बोलावं. ते असं अगदी अचानकपणे आणि ठासून बोललेत ना की मी गोंधळले. मग तेच म्हणालेत की ‘दोन दिवस नीट विचार कर मग उत्तर दे. दोन दिवसानी पुन्हा इथे ये. आणि हो एकटीच ये म्हणजे तुला काही दडपण वाटणार नाही.'”
“मग तु काय विचार केलास ?”
“तसं म्हंटलं तर ते काही चुकीचं बोलत नव्हतेच. माझ्याही मनावर आतापर्यंत बिंबवलेला संस्कार हाच आहे की बायकोने नवर्याचं सगळं ऐकावं. बाकी घरातही मी नेहमीच आई-बाबांच ऐकत आलेले आहे, फारसा हट्टीपणा कधी केल्याचं आठवत नाही. पण माझे बाबा अजिबात कठोर नाहीत त्यामुळे घरात कुणाचं काही चुकलं तरी ते शांतपणेच समजवतात. अभिषेकने ‘मी कठोर होईन’ असं जे म्हंटलं ते थोडं वेगळं वाटलं. खरतर थोडी भितीच वाटली की लग्नानंतर आपलं कसं होईल. कधी अभिषेकना माझा कसला राग आला तर ते काय करतील, माहेरी तर पाठवून देणार नाही ना , लग्न मोडणार तर ना ? पण खरं सांगायचं तर मी पण अभिषेकच्या प्रेमात पडले होते. मग विचार केला एकदा त्यांच्या आज्ञेत रहायची सवय झाली की मग कधी आज्ञा मोडली जाणारच नाही. आणि त्यातून कधी ते संतापलेच तर घेईन ऐकून , करेन थोडं सहन. कुणाशीही लग्न केलं तरी तो व्यक्ती माझ्यावर कधी रागावणार नाही असं तर नाही ना. इथे हे आधीच स्पष्ट सांगत होते इतकंच.”
“बरं मग ? भेटल्यावर काय बोलण झालं तुमचं” स्वराची उत्सुकता वाढली होती.
“मी म्हणाले त्यांना की ‘मला तुमचं म्हणणं मान्य आहे, माझी काही हरकत नाही’ त्यावेळी आमच्या अंगणातील बगिच्यात बसलो होतो. माझं उत्तर ऐकून त्यांनी माझा हात हातात घेतला. त्यांच्या नजरेनं मी लाजून गेले. मी त्यांना म्हणाले
‘अभिषेक , मला आवडेल नेहमीच तुमच्या धाकात रहायला आणि तुमच्या आज्ञा झेलायला'”
“वॉव..मग ? काय म्हणालेत ते ?”
“ते हसलेत , त्यांनी मला जवळ घेतलं आणि म्हणालेत ‘तु खूप गोड मुलगी आहेस, अशीच रहा’…मी त्यांच्या छातीवर डोकं टेकलं तेव्हा वाटलं ‘ज्याच्या आज्ञेत रहावं असेच आहेत अभिषेक..’ ”
“मग लग्नानंतर आहेस का तु त्यांच्या आज्ञेत ?”
“हो गं.. म्हणजे काय ? प्रत्येक गोष्ट मी त्यांना विचारुनच करते. त्यांनी मला जितकं स्वातंत्र्य दिलंय त्याच्या बाहेर मी कधी जात नाही. आणि खरं सांगू त्याची कधी गरजही वाटली नाही. आता दोन महिने झालेत लग्नाला आणि मी खूप खूष आहे. त्यांनी घालून दिलेले सगळे नियम , त्यांच्या सगळ्या आज्ञा अगदी योग्य असतात, उगाच त्रासदायक असं काही नाही. मग त्यांचं पालन करायला काय हरकत आहे ना ? शिवाय ते माझी खूप काळजी घेतात , माझ्यावर त्यांचं खूप प्रेम आहे. मग मी कशाला उगाच उद्धटपणा करु ना ?”
“छान, अगं तु खूष आहेस ना, मग झालं तर. आणि तसंही तु त्यांचं सगळं ऐकायची सवय लावून घेतली आहेस तर तुला त्रास होणार नाहीच.”
दोघींच्या गप्पा चालू असताना मध्येच स्वरा म्हणाली “ए तुझा गाऊन खूप छान आहे गं. मी मगाशीच म्हणणार होते. पण राहिलंच बघ..”
तशी पूर्वा चपापली.
“स्वरा, मी निघते. मला खूप उशीर झाला. निघायला हवं , बाय” असं म्हणत पूर्वा उठून उभी राहिली.
“अगं काय झालं एकदम ? आणि तु अशी घाबरलीयस का ?” स्वराने गोंधळून विचारलं
“काही नाही. मी जाते” पूर्वा भितीने कापू लागली होती हे स्पष्टच दिसत होतं.
“पूर्वा ..अगं काय झाल ? नीट सांग पाहू.. आधी बस तू इथे” स्वराने पुर्वाचा हात धरुन तिला बसवले “पाणी पितेस का थोडं ?” स्वराने पर्समधून पाण्याची बाटली काढत विचारलं.
“नाही नको. मी जाते. सॉरी. मला जावू दे ना प्लीज” पूर्वा गोंधळून कसबसं बोलली.
“पूर्वा.. शांत हो पाहू. आणि नीट सांग काय झालं ते. तु घाबरलीयेस का ?”
“स्वरा माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये गं.”
“काय झालंय पूर्वा ?”
“मी दहा-पंधरा दिवसापासून रोज सकाळी फिरायला जाते. आणि कधी कधी कपडे बदलायचा कंटाळा आला तर नाईट गाऊनवरच जाते. पण अभिषेकला ते आवडत नाही. म्हणून मागच्या आठवड्यात त्यांनी मला बजावलं होतं की ‘तु असं नाईट गाऊन वर फिरलेलं मला अजिबात आवडंत नाही. तु माझी बायको आहे आणि तुझं असं नाईट गाऊनवर फिरणं माझ्या स्टेटसला शोभत नाही. तु ट्रॅक सूट घाल, जीन्स-टीशर्ट घाल किंवा वाटलंच तर पंजाबी ड्रेस घाल पण यापुढे असं नाईट गाऊनवर घराबाहेर फिरायचं नाहीस.’ मग त्या दिवसानंतर मी रोज सकाळी ट्रॅकसूट नाहीतर पंजाबी घालूनच बाहेर पडते”
“ओह.. मग आज काय विसरलीस का कपडे बदलायचं ?”
“नाही गं कंटाळा केला मी. म्हणजे आज बाहेर फिरायला जायचा कंटाळा आला होता. मी घरच्या बगिच्यातच दहा-पंधरा मिनटं फिरुयात असा विचार केला. आणि कुंपणाची भिंत बरीच उंच असल्याने तिथे फिरताना गाऊनवर फिरलं तरी कुणी बघणार नाही म्हणून कपडे बदलले नाहीत. पण नंतर बाहेरचं वातावरण बघून बाहेर फिरण्याचा मोह झाला आणि मी विसरुनच गेले की बाहेर जायचं नव्हतं”