S
StoryPublisher
Guest
सासूबाईंचा कानमंत्र
शालिनीबाई अस्वस्थतेने आपल्या मुलाची वाट पहात होत्या. त्यांचा मुलगा सुरेश दोन दिवसांपूर्वी आपल्या बहिणीकडे राखीसाठी गेलेला होता. त्यांची मोठी मुलगी रमा लग्नं होऊन गावातच असलेल्या आपल्या सासरी होती. तिच्या लग्नांला आता तीनेक वर्षे होऊन गेली होती. आता शालिनीबाईंनापण नातवाचे वेध लागले होते. पण तिच्याकडे तशी काहीच हालचाल नव्हती. मागच्या महिन्यात ती दोन दिवसांसाठी माहेरी आली होती. तेव्हापण ती जरा नव-यावर उखडलेलीच वाटत होती. शालिनीबाईंनी खोदुन खोदुन चौकशी करण्याचा प्रयत्नं केला होता पण तिने दाद लागु दिली नव्हती. आता आपल्या मुलाला राखीसाठी तिच्याकडे पाठवतांना त्यांनी त्याला हीच माहिती काढायची कामगिरी दिली होती. नीट बघायला सांगितले होते.
तसं रमाचा संसार चांगला चालला होता. जावई एका मोठ्या कंपनीत कामाला होते. त्यांचा जॉब पर्मनंट होता आणि पगारही चांगलाच होता. घरात कलर टीव्ही, वॉशिंग मशीन आदी गोष्टी होत्याच. परत रहाता फ्लॅटही जावयांच्याच मालकीचा होता. जावई स्वभावाने चांगलेच आणि तसे रसिक रंगेल होते. बायकोला छान छान साड्या , कपडे वगैरे आणायचे. एकुण ती सुखी म्हणायला हरकत नव्हती. आता पाळणा हलायलाच पाहिजे. पहिले वर्षभर तिला त्यांनी टोकले तेंव्हा रमा म्हणाली की ' हे म्हणतात की इतक्यात नको.' त्यांचं प्लॅनिंग चाललं होतं. आता स्थिर स्थावर झाले होते. गेल्या काही महिन्यांपासुन त्यांनी मुलीच्या मागे मुल होऊ देण्यासाठी लकडा लावला होता. आसपासचे आणि ओळखीचे लोकही आडुन आडून चौकशी करीत. त्यांना उत्तरं देता देता त्यांची पुरेवाट होइ.
मागचे वेळी ती जेंव्हा माहेरी आली होती तेंव्हा त्यांच्या मनांत शंकेची पाल चुकचुकली होती. रमा एकदा सहजच म्हणाली होती की 'जावयांना वेळच कुठे असतो हल्ली.' म्हणजे त्यांना बायकोला जवळ घेऊन 'ते' करायलासुद्धा मिळत नाही की काय ? दुर्लक्ष करतात म्हणे. आता आपणच लक्ष घालायला हवं असं त्यांना वाटत होते. मुलीच्या संसारासाठी काहीतरी करायलाच हवं असं त्यांना वाटत होतं. ब-याच वेळानंतर संध्याकाळी त्यांचा मुलगा सुरेश घरी परतला. घरात आल्यावर तो हात पाय धुवायला गेला आणि शालिनीबाईंनी चहा करायला ठेवला. तो कपडे बदलुन बाहेर आला तोवर चहा झालेलाच होता. चहाबरोबर थोडी बिस्कीटं ठेवुन त्यांनी कप बशी सुरेशच्या हातात दिली. त्याने एक घोट घेताच 'व्वा!' म्हणत पसंती जाहीर केली. शालिनीबाईंना बरे वाटले.
शालिनीबाई अस्वस्थतेने आपल्या मुलाची वाट पहात होत्या. त्यांचा मुलगा सुरेश दोन दिवसांपूर्वी आपल्या बहिणीकडे राखीसाठी गेलेला होता. त्यांची मोठी मुलगी रमा लग्नं होऊन गावातच असलेल्या आपल्या सासरी होती. तिच्या लग्नांला आता तीनेक वर्षे होऊन गेली होती. आता शालिनीबाईंनापण नातवाचे वेध लागले होते. पण तिच्याकडे तशी काहीच हालचाल नव्हती. मागच्या महिन्यात ती दोन दिवसांसाठी माहेरी आली होती. तेव्हापण ती जरा नव-यावर उखडलेलीच वाटत होती. शालिनीबाईंनी खोदुन खोदुन चौकशी करण्याचा प्रयत्नं केला होता पण तिने दाद लागु दिली नव्हती. आता आपल्या मुलाला राखीसाठी तिच्याकडे पाठवतांना त्यांनी त्याला हीच माहिती काढायची कामगिरी दिली होती. नीट बघायला सांगितले होते.
तसं रमाचा संसार चांगला चालला होता. जावई एका मोठ्या कंपनीत कामाला होते. त्यांचा जॉब पर्मनंट होता आणि पगारही चांगलाच होता. घरात कलर टीव्ही, वॉशिंग मशीन आदी गोष्टी होत्याच. परत रहाता फ्लॅटही जावयांच्याच मालकीचा होता. जावई स्वभावाने चांगलेच आणि तसे रसिक रंगेल होते. बायकोला छान छान साड्या , कपडे वगैरे आणायचे. एकुण ती सुखी म्हणायला हरकत नव्हती. आता पाळणा हलायलाच पाहिजे. पहिले वर्षभर तिला त्यांनी टोकले तेंव्हा रमा म्हणाली की ' हे म्हणतात की इतक्यात नको.' त्यांचं प्लॅनिंग चाललं होतं. आता स्थिर स्थावर झाले होते. गेल्या काही महिन्यांपासुन त्यांनी मुलीच्या मागे मुल होऊ देण्यासाठी लकडा लावला होता. आसपासचे आणि ओळखीचे लोकही आडुन आडून चौकशी करीत. त्यांना उत्तरं देता देता त्यांची पुरेवाट होइ.
मागचे वेळी ती जेंव्हा माहेरी आली होती तेंव्हा त्यांच्या मनांत शंकेची पाल चुकचुकली होती. रमा एकदा सहजच म्हणाली होती की 'जावयांना वेळच कुठे असतो हल्ली.' म्हणजे त्यांना बायकोला जवळ घेऊन 'ते' करायलासुद्धा मिळत नाही की काय ? दुर्लक्ष करतात म्हणे. आता आपणच लक्ष घालायला हवं असं त्यांना वाटत होते. मुलीच्या संसारासाठी काहीतरी करायलाच हवं असं त्यांना वाटत होतं. ब-याच वेळानंतर संध्याकाळी त्यांचा मुलगा सुरेश घरी परतला. घरात आल्यावर तो हात पाय धुवायला गेला आणि शालिनीबाईंनी चहा करायला ठेवला. तो कपडे बदलुन बाहेर आला तोवर चहा झालेलाच होता. चहाबरोबर थोडी बिस्कीटं ठेवुन त्यांनी कप बशी सुरेशच्या हातात दिली. त्याने एक घोट घेताच 'व्वा!' म्हणत पसंती जाहीर केली. शालिनीबाईंना बरे वाटले.