S
StoryPublisher
Guest
आई काय काय करते...
स्त्री. हि पहिल्यापासूनच का कमी लेखली गेली आहे कोणास ठाऊक. प्रत्येक ग्रंथामध्ये किंवा प्रत्येक प्रसंगामध्ये स्त्रीच्या वाट्याला तिरस्कार, त्रास, पीडा, दुःख वगैरे सगळं असं दाखवलं गेलं आहे. चित्रपट आणि मालिकांमध्ये सुद्धा बहुतांश स्त्रियांना त्रास सहन करावा लागताना दाखवत आहेत. परंतु प्रत्येक स्त्रीला पुरुषासारखा स्वतंत्र होऊन जगण्याचा अधिकार आहेच कि. मग ते चित्रपट आणि मालिकांमध्ये का दाखवत नाहीत? आईला होणाऱ्या यातना दाखवण्यापेक्षा आई तिच्या सामर्थ्यावर काय काय करू शकते हे दाखवणे उत्तम. कारण आई हि सर्वव्यापी असते. आईसाठी कोणती गोष्ट असंभव अशी नसतेच. जर असे दाखवले तर टीव्ही समोर बसणाऱ्या स्त्रियांमध्ये नक्कीच धैर्य आणि आत्मविश्वास प्राप्त होईल.
अरुंधती आणि अनिरुद्धचे पुन्हा लग्न होणार होते. त्यासाठी सगळेच जण तयारीला लागले होते. पण अनिरुद्ध यामध्ये जास्त रस घेत नव्हता. त्याचे प्रेम तर संजना वर होते. अरुंधती खूप साधी आणि सरळ असल्याचा गैरफायदा घेत अनिरुद्ध आणि संजना या दोघांचे खेळ सुरूच होते. लग्नाची खरेदी करण्यासाठी सगळेच जण बाहेर गेले होते. नेहमी प्रमाणे अरुंधती घरातली कामे आटोपण्यासाठी घरी थांबली होती. अनिरुद्ध ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. खरं तर तो ऑफिसला न जाता संजनाच्या घरी जाणार होता कारण आज संजना ऑफिसला येणार नव्हती.
इतक्यात अरुंधतीच्या नावाने एक कुरियर आलं. त्यावर कोणाचेच नाव नव्हतं. तिने खोलून बघितल्यावर त्यामध्ये संजना आणि अनिरुद्ध यांचे नको ते एकत्रित फोटो होते. त्या फोटोंमध्ये संजना आणि अनिरुद्ध अर्धवस्त्र तसेच काही फोटोंमध्ये विवस्त्र देखील होते.
तिच्या पायाखालची जमीन सरकली. तळपायाची आग मस्तकात गेली. एक स्त्री बाकी काहीही सहन करेल पण तिच्या मंगळसूत्रावर जर कोणी गदा आणली तर मग तिच्या वाटेवर कोणीही आलं तर मग त्याचा फडशा पडला म्हणून समजा.
रागाने अरुंधतीचे डोळे लाल झाले. एव्हाना शांत आणि सहनशील असलेली अरुंधती आता एक आगीचा धगधगता गोळा बनली होती. तिने अनिरुद्ध सोबत याबाबत काहीच वाच्यता न करता तिने संजनाला भेटायचे ठरवले. संजनाला तिने फोन लावला आणि विचारलं कि कुठे आहेस म्हणून. संजनाने आज ऑफिसला नाही येणार आणि घरीच थांबणार असल्याचे सांगितले. अरुंधतीने लगेचच फोन ठेवून दिला आणि संजनाच्या घरी जाण्यासाठी ती तिथून निघाली.
घाई गडबडीमध्ये त्यामधला एक फोटो खाली पडला. अरुंधती तशीच घराबाहेर पडते. त्याच वेळी अनिरुद्ध बेड रूम मधून बाहेर आला आणि अरुंधतीला हाक मारू लागला. पण अरुंधती कुठेच दिसत नसल्याने तो विचारात पडला.
दरवाजाजवळ जाताच त्याला समोर अरुंधती कुठेतरी जाताना पाठमोरी दिसली. बऱ्याच हाका मारून सुद्धा ती थांबत नव्हती. त्याच वेळी त्याची नजर त्या पडलेल्या फोटोकडे गेली. तो फोटो पाहिल्यावर अनिरुद्धला सगळं काही समजलं आणि मग तो सुद्धा अरुंधतीच्या मागे मागे तिला रोखण्यासाठी जाऊ लागला. पण अरुंधतीने अनिरुद्धचे एक नाही ऐकले आणि ती संजनाला खडसावण्यासाठी तिच्या घरी गेली. ती संजनाच्या घरासमोर आली आणि दरवाजा उघडून तिच्या घरात शिरली. अनिरुद्ध लांब उभा राहून हे बघत होता. त्याची संजनाच्या घरी जाण्याची हिम्मत होत नव्हती. त्याला घाम फुटू
लागला.
आता काय होणार या विचाराने तो कावरा बावरा झाला. संजनाला तो फोन करत होता पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता. जवळ जवळ एका तासाने अरुंधती संजनाच्या घरामधून बाहेर पडते. अनिरुद्ध लपून छपून तिला बघतो पण तिला सामोरे जाण्याची त्याची हिम्मत होत नाही. अरुंधती तिथून गेल्यावर अनिरुद्ध संजनाला फोन करू पाहतो पण संजनाचा फोन आता सुद्धा स्विच ऑफ लागत असतो. संजनाच्या घरी जाण्यासाठी सुद्धा त्याचे पाय लटपटत असतात. अरुंधती संजनाला काय बोलली असेल आणि जर आता आपण संजनाच्या घरी गेलो तर रागात असलेली संजना आपल्याला काय करेल याचा नेम नाही या विचाराने अनिरुद्ध संजनाच्या घरी जाण्याचे टाळतो.
तो तसाच ऑफिसला जातो. पण ऑफिसमध्ये सुद्धा त्याचे लक्ष लागत नसते. तो सारखा सारखा संजनाला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो पण तिचा फोन बंद असतो.
स्त्री. हि पहिल्यापासूनच का कमी लेखली गेली आहे कोणास ठाऊक. प्रत्येक ग्रंथामध्ये किंवा प्रत्येक प्रसंगामध्ये स्त्रीच्या वाट्याला तिरस्कार, त्रास, पीडा, दुःख वगैरे सगळं असं दाखवलं गेलं आहे. चित्रपट आणि मालिकांमध्ये सुद्धा बहुतांश स्त्रियांना त्रास सहन करावा लागताना दाखवत आहेत. परंतु प्रत्येक स्त्रीला पुरुषासारखा स्वतंत्र होऊन जगण्याचा अधिकार आहेच कि. मग ते चित्रपट आणि मालिकांमध्ये का दाखवत नाहीत? आईला होणाऱ्या यातना दाखवण्यापेक्षा आई तिच्या सामर्थ्यावर काय काय करू शकते हे दाखवणे उत्तम. कारण आई हि सर्वव्यापी असते. आईसाठी कोणती गोष्ट असंभव अशी नसतेच. जर असे दाखवले तर टीव्ही समोर बसणाऱ्या स्त्रियांमध्ये नक्कीच धैर्य आणि आत्मविश्वास प्राप्त होईल.
अरुंधती आणि अनिरुद्धचे पुन्हा लग्न होणार होते. त्यासाठी सगळेच जण तयारीला लागले होते. पण अनिरुद्ध यामध्ये जास्त रस घेत नव्हता. त्याचे प्रेम तर संजना वर होते. अरुंधती खूप साधी आणि सरळ असल्याचा गैरफायदा घेत अनिरुद्ध आणि संजना या दोघांचे खेळ सुरूच होते. लग्नाची खरेदी करण्यासाठी सगळेच जण बाहेर गेले होते. नेहमी प्रमाणे अरुंधती घरातली कामे आटोपण्यासाठी घरी थांबली होती. अनिरुद्ध ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. खरं तर तो ऑफिसला न जाता संजनाच्या घरी जाणार होता कारण आज संजना ऑफिसला येणार नव्हती.
इतक्यात अरुंधतीच्या नावाने एक कुरियर आलं. त्यावर कोणाचेच नाव नव्हतं. तिने खोलून बघितल्यावर त्यामध्ये संजना आणि अनिरुद्ध यांचे नको ते एकत्रित फोटो होते. त्या फोटोंमध्ये संजना आणि अनिरुद्ध अर्धवस्त्र तसेच काही फोटोंमध्ये विवस्त्र देखील होते.
तिच्या पायाखालची जमीन सरकली. तळपायाची आग मस्तकात गेली. एक स्त्री बाकी काहीही सहन करेल पण तिच्या मंगळसूत्रावर जर कोणी गदा आणली तर मग तिच्या वाटेवर कोणीही आलं तर मग त्याचा फडशा पडला म्हणून समजा.
रागाने अरुंधतीचे डोळे लाल झाले. एव्हाना शांत आणि सहनशील असलेली अरुंधती आता एक आगीचा धगधगता गोळा बनली होती. तिने अनिरुद्ध सोबत याबाबत काहीच वाच्यता न करता तिने संजनाला भेटायचे ठरवले. संजनाला तिने फोन लावला आणि विचारलं कि कुठे आहेस म्हणून. संजनाने आज ऑफिसला नाही येणार आणि घरीच थांबणार असल्याचे सांगितले. अरुंधतीने लगेचच फोन ठेवून दिला आणि संजनाच्या घरी जाण्यासाठी ती तिथून निघाली.
घाई गडबडीमध्ये त्यामधला एक फोटो खाली पडला. अरुंधती तशीच घराबाहेर पडते. त्याच वेळी अनिरुद्ध बेड रूम मधून बाहेर आला आणि अरुंधतीला हाक मारू लागला. पण अरुंधती कुठेच दिसत नसल्याने तो विचारात पडला.
दरवाजाजवळ जाताच त्याला समोर अरुंधती कुठेतरी जाताना पाठमोरी दिसली. बऱ्याच हाका मारून सुद्धा ती थांबत नव्हती. त्याच वेळी त्याची नजर त्या पडलेल्या फोटोकडे गेली. तो फोटो पाहिल्यावर अनिरुद्धला सगळं काही समजलं आणि मग तो सुद्धा अरुंधतीच्या मागे मागे तिला रोखण्यासाठी जाऊ लागला. पण अरुंधतीने अनिरुद्धचे एक नाही ऐकले आणि ती संजनाला खडसावण्यासाठी तिच्या घरी गेली. ती संजनाच्या घरासमोर आली आणि दरवाजा उघडून तिच्या घरात शिरली. अनिरुद्ध लांब उभा राहून हे बघत होता. त्याची संजनाच्या घरी जाण्याची हिम्मत होत नव्हती. त्याला घाम फुटू
लागला.
आता काय होणार या विचाराने तो कावरा बावरा झाला. संजनाला तो फोन करत होता पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता. जवळ जवळ एका तासाने अरुंधती संजनाच्या घरामधून बाहेर पडते. अनिरुद्ध लपून छपून तिला बघतो पण तिला सामोरे जाण्याची त्याची हिम्मत होत नाही. अरुंधती तिथून गेल्यावर अनिरुद्ध संजनाला फोन करू पाहतो पण संजनाचा फोन आता सुद्धा स्विच ऑफ लागत असतो. संजनाच्या घरी जाण्यासाठी सुद्धा त्याचे पाय लटपटत असतात. अरुंधती संजनाला काय बोलली असेल आणि जर आता आपण संजनाच्या घरी गेलो तर रागात असलेली संजना आपल्याला काय करेल याचा नेम नाही या विचाराने अनिरुद्ध संजनाच्या घरी जाण्याचे टाळतो.
तो तसाच ऑफिसला जातो. पण ऑफिसमध्ये सुद्धा त्याचे लक्ष लागत नसते. तो सारखा सारखा संजनाला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो पण तिचा फोन बंद असतो.