• Hello Friends You can Register on the Forum and by posting you can earn money too.

एका गायनॅकची डायरी

S

StoryPublisher

Guest
एका गायनॅकची डायरी

भाग १ ते ३ (फक्त प्रौढांसाठी) सत्य घटनांवर आधारित कथा

सुनील हा माझा शाळकरी वर्गमित्र. माझ्यासारखाच हुशार, पण श्रीमंत बापाचा मुलगा. आमचे शाळेत दोघांचे जवळ जवळ सारखेच मास असत. दहावी नंतर तो सायन्सला गेला; तर मी आर्टसला. ग्रॅज्युयशननंतर तो डॉक्टरकीला गेला हे मला माहित होते. मीही बी.ए. फर्स्ट क्लास मध्ये पास झालो व मुंबईच्या एका बँकेत लागलो.

अचानक कित्येक वर्षानंतर माझी व सुनीलची एका समारंभात भेट झाली. साला, तोही मुंबईतच होता. तो एक नामांकित गायनॅक (स्त्रीरोग तज्ञ) झाला होता. मुंबईतल्या जुहूसारख्या पॉश वस्तीत त्याचा फ्लॅट होता. तेथेच त्याचे क्लीनिक होते. बेटा, अक्षरशः नोटा छापत होता. तर मी बँक ऑफिसर.

बऱ्याच दिवसांनी भेटल्यानंतर आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. जेव्हा मी त्याला विचारले, अरे, साल्या, तू गायनॅक कसा काय झालास? तेव्हा तो हसून म्हणाला, अरे, राजा, तुला माझा-तुझा वीक पॉईंट माहितच आहे. मला व तुला पोरींमध्ये इंटरेस्ट अगदी तेव्हा पासूनच होता. एमबीबीएस झाल्यावर एमडीचे स्पेशलायझेशन करायचे ते गायनॅकमध्येच असे मी ठरविले. आमच्या घरच्यानी परवानगी दिली व मी आज हा असा आहे. आता त्याचे, तसेच माझेही लग्न झालेले होते. आम्ही आमच्या संसारात सुखी होतो. किंबहुना दोन-दोन मुलांचे बाप होतो.

लहानपणापासून मला लिहायची खुमखुमी होती. कथा, कविता, लेख मी बरेच लिहिले होते. ते छापूनही आले होते. मला व सुनीलला त्या वयांपासूनच सेक्स बद्दल विशेष आकर्षण होते. शाळेत असताना आम्ही चावट पुस्तकांची अदलाबदल करायचो. एकदा त्याने मला कोकशास्त्राचे पुस्तक वाचावयास दिले होते. अर्थात तेव्हा ते समजण्याएवढे ज्ञान आमच्याकडे नव्हते.

मी बँकेत आहे; हे समजल्यावर सुनीलला बरे वाटले. तो म्हणाला, राजा, अजून काही लिहीतोस की नाही? मी म्हणालो, अधून-मधून लिहीतो.

अचानक माझ्या डोक्यात कल्पना आली. सुनील तर गायनॅक आहे, समजा त्याच्याकडे ज्या केसेस येतात, आल्या असतील; जर त्यांच्यावर आपण लिहिले तर? काय मजा येईल! एकतर लोकांना सेक्स लाईफ, त्यांचे प्रॉब्लेम्स काय असतात ते तर समजेलच, शिवाय मनोरंजनाबरोबर त्यांचे उद्बोधनही होईल. मी सुनीलला म्हणालो, अबे साल्या, मला तुझे पॅक्टीस करतानाचे किस्से सांग ना, मी त्यांच्यावरच कथा लिहीन. तो हसला, म्हणाला, गुड आयडिया! मी तुला माझी एक डायरीच देतो. त्यावरून तू लिही. पण एक मात्र कर, नावे व स्थळ मात्र खरे लिहू नकोस. कारण ते माझ्या प्रोफेशनच्या एथिकच्या विरूध्द होईल. मी तयार झालो. काही दिवसातच त्याने मला त्याची एक डायरी सोपविली. तीच मी तुमच्यापुढे आज उलगडत आहे.

ही डायरी मिळताच ती मी झटक्यात वाचून काढली. माझ्यासारख्या लेखकाला तो एक खजिनाच सापडला होता. किंवा आपण असे म्हणूया हे एक प्रकारचे रॉ मटेरियलच होते. या डायरीत तसे बरेच टेक्निकल शब्द आहेत. ते टाळून सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत मी लिहिणार आहे. तसेच आपल्या नेहमीच्या भाषेतच मी वर्णन करणार आहे. या डायरीतल्या विशिष्ट केसेसच मी निवडल्या आहेत. मानवी स्वभावाचे विविध कंगोरे, निसर्गाचे खेळ व मनोविकृती; तसेच जग हे कसे विसंगतीने भरलेले आहे, यांचे मजेदार किस्से म्हणजेच ही डायरी आहे. ती तुम्हाला निश्चततच आवडेल, विचार करायला लावेल

 
केस पहिलीः

एक जोडपे माझ्या क्लीनिकमध्ये आले. ते नवविवाहित होते. त्यांच्या लग्नाला सहा-सात महिने झाले असतील. मी त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. त्यांचा प्रॉब्लेम म्हणजे नेहमीचाच, बायकोला अजून दिवस जात नव्हते. अनेक डॉक्टर्सना दाखवून झाल्यावर ते माझ्याकडे आले होते. तसेच त्या दोघांनी त्यांच्या टेस्टसही करून घेतलेल्या होत्या. मी त्यांचे रिपोर्टस् पाहिले. सर्वकाही नॉर्मल होते. मग माशी कुठे शिंकत होती?

माझ्या पध्दतीने मी त्यांची विचारपूस सुरू केली. बायको समोर असली की नवरे काही प्रश्नांची उत्तरे द्यायला लाजतात हा माझा अनुभव होता. म्हणन मी बायकोला बाहेर बसायला सांगितले. मी नवऱ्याला प्रश्न विचारला. तुमचा संभोग व्यवस्थित होतो ना? तो हो म्हणाला. त्याच्या वीर्यात शुक्राणुंची संख्याही आवश्यक तेवढी होती. बायकोला पाळी व्यवस्थित येत होती. मग गाडे कुठे बरे अडत असावे? अगदी पाळी सोडली तर ते दररोज संभोग करत होते.

मीही विचारात पडलो. पटकन मी त्याला प्रश्न विचारला. संभोग केल्यानंतर, म्हणजे वीर्य गळाल्यानंतर तुम्ही दोघे काय करता? तेव्हा तो म्हणाला, मी बाथरूममध्ये जातो. तसेच बायकोही बाथरूममध्ये जाते आणि आपली योनी (पुची) धुवून टाकते.

झाले. माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले होते. मी त्याच्या पत्नीलाही मग आत बोलविले. तिलाही तोच प्रश्न विचारला. तर तीही तसेच करते म्हणाली. मग मी त्या दोघांनाही समजावून सांगितले. हे बघा, वीर्य स्खलन योनीत (पुचीत) झाल्यानंतर ताबडतोब योनीमार्ग धुणे बंद करा. काही काळ म्हणजे कमीत कमी पंधरा मिनिटे तरी बाईने ढुंगणाखाली उशी घेऊन तसेच पडून राहिले पाहिजे. आज पासून मी त्यांना तसे करावयास सांगितले. माझा निरोप घेऊन ते जोडपे निघून गेले.

मी त्यांना विसरूनही गेलो होतो. असेच दिवस जात होते. साधारण महिन्याभराने ते जोडपे माझ्या क्लीनिकमध्ये पुन्हा आले. माझ्या केबिनमध्ये येताच नवऱ्याने माझ्या हातात हात दिला. माझ्या हातात मिठाईचा पुडा दिला. म्हणाला, पत्नीला दिवस राहिलेत. तो अगदी खुशीत होता, तशीच त्याची बायकोही. मीच पुन्हा चेकअप केले. काही टेस्ट केल्या खरोखरच ती बाई प्रेग्नंट होती. तिला दुसरा महिना लागला होता. मी त्या दोघांचे अभिनंदन केले.

तात्पर्य काय? तर आपल्या समाजात असणारे सेक्स बद्दलचे प्रचंड अज्ञान. सेक्स म्हणजे आपण काही तरी वाईट करतो, ते घाणेरडे काम आहे अशी भावना लहानपणापासूनच प्रत्येकाच्या मनात असते. तेव्हा वरील केसमध्ये संभोग होताच ते दोघे आपापली जननेंद्रिये धुवून टाकत. यात होते काय की वीर्य गळाल्यानंतर त्यात जे शुक्राणू (स्पर्म) असतात ते गर्भाशयाच्या पिशवीपर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागतो. कारण स्त्रीचे जननेंद्रीयही त्यावेळी ओलसर झालेले असते. अशावेळी जर तुम्ही जननेंद्रीय पाण्याने धुवून टाकले तर स्वाभाविक शुक्राणु धुवून जातात. स्त्रीला गर्भधारणा राहण्याची शक्यता कमी होते.

 
केस दुसरीः

एकदा एक नवपरिणीत जोडपे माझ्याकडे आले. नवरा असेल पंचवीशीचा, तर बायको विशीची होती. मुलगा सुशीक्षित होता तशीच बायकोही. मी त्यांना त्यांचा प्रॉब्लेम विचारला. तो असा होता की संभोगाच्या वेळी नवरा आपले इंद्रिय बायकोच्या योनीत संपूर्ण घालू शकत नव्हता. त्यामुळे ते दोघेही सेक्स एंजॉय करू शकत नव्हते. माझ्या लक्षात आले काय प्रॉब्लेम आहे तो. मी त्या बाईला चेकींगसाठी आत नेले. प्रथम ती बाई लाजू लागली. पण डॉक्टरला लाजून कसे चालेल? माझ्या नर्सने तिला समजावले. ती कशीबशी तयार झाली. अर्थात चड्डी काढूनच.

मी हँडग्लोव्हज चढवले. अशा वेळी मी मुद्दाम नर्सला जवळ ठेवतो. कारण बायकांना अवघड वाटू नये म्हणन. मी तिची योनी (पची) पाहिली. ती व्यवस्थित होती. मी माझे मधले बोट आत सारले. मला चटकन बाईच्या पुचीतला पडदा आड येत होता. मी जोर लावला. पण काही उपयोग नव्हता. मी माझे चेकींग आटोपले. बाईला बाहेर बसायला सांगितले.

मी त्या नवऱ्याला विचारले, बाबा, तुझा लवडा व्यवस्थित ताठतो ना? तो हो म्हणाला. मी त्यालाही तो दाखवायला सांगितला. त्याचा साईझ नॉर्मल होता. मग मी त्याला सांगितले की हे बघा, बाईच्या पुचीत पडदा असतो. तो पहिल्या संभोगाच्या वेळी फाटतो. रक्त वगैरे येते. ती आपल्या देशात मुलीच्या कौमार्याची खूण समजली जाते. तो खुश झाला की त्याची बायको अजून कुमारी होती. पण प्रॉब्लेम हा होता की त्याच्या बायकोच्या पुचीतील पडदा अधिक जाड व चिवट होता. त्यामुळे तो फाटत नव्हता. लिंग प्रवेशात त्यामुळे अडथळा येत होता.

हजारात का दहा हजारात अशी एखादीच केस आढळते. अशा वेळेला आम्ही डॉक्टर मग त्या पडद्याला छेद देतो (इन्सिजन) म्हणजेच चाकूने तो फाडतो. जेणे करून लिंग प्रवेश सुलभ होतो.

या केस मध्ये मी तसे न करता त्या नवरोबाला सांगितले की संभोग करते वेळी अधिक जोर लावा. म्हणजे पडदा फाटेल व ते एंजॉय करू शकतील. मी चान्स घेण्याचे ठरविले. त्याने ते ऐकले. ते दोघे निघून गेले.

दोन दिवसांनी पुन्हा ते जोडपे माझ्याकडे आले. मी विचारताच तो म्हणाला, खुप प्रयत्न केला; पण पडदा काही फाटत नव्हता. अरे देवा! हा येडझवा निघाला, मी मनात म्हणालो. आता पडदा कापण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मी त्याला तसे सांगताच तो तयार झाला. झाले बायकोला मी आत घेतले. व आमच्या पध्दतीने इन्सिजन केले. बाईला सांगितले थोडेसे रक्त येईल.घाबरायचे नाही. अशा प्रकारे त्या नववधचे उदघाटन (?) माझ्या हस्ते झाले.

दोन दिवसांनी ते जोडपे परत आले. आता ते खुशीत दिसत होते. मी विचारताच नवरेबुवा खुश होऊन म्हणाले, डॉक्टरसाहेब आता व्यवस्थित जमते. मी त्यांचे अभिनंदन केले.

दोन महिन्यानंतर ते जोडपे मिठाईचे पॅकेट घेऊन आले. खरोखरच त्या बाईला दिवस गेले होते. ती प्रेग्नंट होती.

आता या पडद्याबद्दल. योनीमार्गाच्या सुरूवातीला हा पडदा असतो. ती निसर्गाची योजना आहे. त्या पडद्याला एक बारीक छिद्र असते त्यातून मासिक पाळीचा स्त्राव निघत असतो. प्रथम संभोगाच्यावेळी मात्र जोर बसताच हा पडदा फाटतो व थोडे रक्त येते. पूर्वीपासून आपल्याकडे अशी समजूत आहे की हा पडदा मुलीच्या पुचीत असेल तरच ती कुमारी नाही; तर ती अगोदर झवलेली असली पाहिजे. पण हे साफ चुकीचे आहे. अनेक कारणामुळे हा पडदा फाटू शकतो. उदा. सायकलींग करते वेळी, उंचावरून पडल्याने, अनवधानाने एखादी मेणबत्ती वा काकडी सारखी वस्तु आत खुपसल्याने हा पडदा फाटू शकतो. तेव्हा नुसतेच प्रथम संभोगाच्यावेळी रक्त्त आले नाही, म्हणून ती मुलगी बदचालीची किंवा तिच्या चारित्र्याविषयी शंका घेणे हे चुकीचे तसेच अज्ञानीपणाचे आहे.

 
केस तिसरी:

मी पॅक्टीस सुरू केल्यापासून थोड्याच दिवसात माझी कीर्ती सर्वदूर पसरली. लांब-लांबून स्त्रियां माझ्याकडे सल्ल्या, उपचारासाठी येऊ लागल्या. अशीच एक केस माझ्याकडे आली ती प्रातिनिधीक स्वरूपाची आहे. म्हणून ती मी येथे मुद्दाम देत आहे. विवाहिताना अपत्य संभवाबाबत किती अज्ञान, गैरसमजुती असतात त्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे ही केस असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

अपत्यसंभव म्हणजेच गर्भधारणा ही मानवी शरिरातील अत्यंत गुंतागुंतीची अशी क्रिया आहे. आणि म्हणूनच ती समजावून सांगणे हे माझे मी कर्तव्य समजतो.

डॉक्टरसाहेब, तुम्ही पुरूषाला बी तपासता का? साधारण विशीची एक तरुण खेडवळ स्त्री मला विचारत होती. तिने गोल साडी नेसली होती, अंगकाठी साधारणच होती. आणि अंगात कमी रक्त्त असल्यासारखा फिकट रंग तिच्या शरिराचा होता. गळ्यात मंगळसूत्र, कपाळाला ठशठशीत कुंकू, म्हणजे गावातल्या चारचौघींसारखी ती दिसत होती.

मुंबईतल्या डॉक्टरला दाखवायचं म्हणून आसपासच्या गावातल्या बायका येथे येतात. कारण त्यांना विश्वास असतो की मुंबईतला डॉक्टरच त्यांच्यावर योग्य तो उपचार करेल. ही बाई नवी मुंबईतल्या एका गावातून आली होती. ती चांगल्या सुखवस्तु कुटुंबातली वाटत होती. कारण माझी फी तशी जरा महागडीच होती. कोण्या मैत्रीणीच्या सांगण्यावरून आणि त्यात मी मराठी आहे म्हणून ती मोठ्या विश्वासाने माझ्याकडे आली होती.

जनरल पॅक्टीस आणि कन्सल्टींग पॅक्टीस मधला भेद त्याना विशेष कळत नाही. त्यामुळेच अगदीच तातडीची, तात्पुरती वैद्यकीय मदत देणं अशा केसेस सोडून बाकीच्या इतर केसेस दुसऱ्या डॉक्टरांकडे जा, असं सांगूनच परत पाठवाव्या लागतात. या बाईला सुध्दा मी तेच सांगितलं

हे बघ, ताप, सर्दी, खोकला, पोटदुखी वगैरे पेशंट मी तपासत नाही. मी फक्त लैंगिक समस्या असलेले म्हणजे नवरा-बायकोंच्या संबंधांबाबत अडचणी असलेले पेशंट तपासतो आणि सल्ला देतो. सोप्यात सोप्या भाषेत मी तिला सांगितले. तुमच्या सल्ला-मार्गदर्शनाची पाटी वाचली मी. मी नववी शिकलेली आहे. वर्षापूर्वीच लगीन झालं. पण अजून दीस राहिनात. माझ्या मालकाला जरा कमजोरी वाटते हीच चौकशी आधी करायला मी आले.

मी जरी गायनॅक असलो, तरी माझ्याकडे लैंगिक वैवाहिक समस्येवर सल्ल्यासाठी येणाऱ्यात बहुसंख्य पुरुषच असतात. आपण होऊन सल्ल्यासाठी येणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण पुरुषांच्या मानानं कमीच, कारण स्त्रियांना वाटणारी लाज. ज्या स्त्रिया येतात, त्या बहुतेक सर्व चांगल्या शिकलेल्या असतात. पण अशा रितीने एक साधारण शिकलेली गावात राहणारी अन् तरुण वयाची बाई अशी नवऱ्याबद्दल तक्रार घऊन येणं हे पहिलंच उदाहरण मी अनुभवत होतो. म्हणजे स्त्री-पुरुषांनी लैंगिक बाबतीत स्पष्ट बोलावं असं माझं मत असूनसुध्दा ही खेडवळ बाई स्पष्टपणे बोलत असल्याचं बघून मलाही जरा आश्चर्य वाटलं.

संबंध करायला दोघंही लागतात ना, मग अडचणी दोघांच्या मिळूनच असतात. मी बायकांचा डॉक्टर असलो तरी पुरुषांना तपासत नाही असं थोडंच आहे? बाईडॉक्टर पुरुषांना नाही का तपासत? मी तिची मुख्य शंका सोडवण्याच्या दृष्टीनं सोप्या भाषेतच सांगितलं. आणि पुढे विचारलं, पण हे एवढंच विचारायला तू आलीस का इतक्या लांब? काय नाव तुझं?

माझं नाव नर्मदा. आमचं गाव तसं लांब नाही. दोन गाड्या बदलून या यला दीडेक तास लागतो. नर्मदा पुढे म्हणाली, मी त्याना कितीवेळा तरी म्हणाले, की डॉक्टरला दाखवा म्हणून, पण ते तयारच नाही होत. आता वरीस झालं लग्नाला, अजून दीस राहत नाहीत, म्हणून सगळे विचारतात मला. तुमचं नाव ऐकलं मैत्रिणीकडून, म्हणून मी आले.

एकूण आपल्याला मूल होत नाही, ही नर्मदाची खरी व्यथा होती. म्हणूनच मला एकदम असं वाटलं की नवऱ्यापासून अजून दिवस राहत नाहीत. म्हणूनच नवऱ्याला जरा कमजोरी वाटते असं नर्मदाचं म्हणणं असावं. कारण अनेक लैंगिक संबंधाबद्दलचे शब्द अर्थ न समजल्यामुळे बरेच लोक ते वापरतात; असा माझा अनुभव आहे.

अगं, पण एकच वर्ष झालं ना तुमच्या लग्नाला? मग एवढी घाई का आहे? वय काय तुझं? मी विचारले. अठरा सरलं बघा गेल्या महिन्यात. नर्मदाने उत्तर दिले.

अठराच ना, मग एवढी का म्हातारी झालीएस का तू एवढं कासाविस व्हायला मुलासाठी? लहानच वय आहे तुझं अजून. मी म्हटलं.

अवो, आमच्या गावात कसलं लहान आणि मोठं. माझ्या बरोबरच्या मैत्रिणीना पटापट दिवस राहिले, दोघी तिघींना पोरं बी झाली. अन् मी अजून तशीच! माझ्या जिवाला लागणार की नाही त्यांची वाढलेली पोटं बघून? मलाच अजून दिवस का राहिनात? ते काय नदीवर धरण बांधायचं आहे काय, येळ लागाया? पळून जावंसं वाटू लागलंय मला. पण आमचे मालक थंडच! एकूण नर्मदाचा प्रश्न तिच्या समजुतीप्रमाणे फारच तातडीचा आणि गंभीर होता.

 
कुठलीही संतती प्रतिबंधक साधने न वापरता जर पती-पत्नीचे व्यवस्थित संबंध येत असतील, इतरही पाळीच्या वगैरे कुठल्या तक्रारी नसतील, पतीच्या वीर्यातही दोष नसेल तर साधारण ९० टक्के जोडप्यांमध्ये लग्नानंतर पहिल्याच वर्षात स्त्रीला दिवस राहतात. असा एकण वैद्यकीय तपासणीचा अहवाल सांगतो. त्यामळे पहिलं वर्षभर मूल होण्यासाठी चिकीत्सा अशी करण्याची गरज नसते. उरलेल्या साधारण दहा टक्के जोडप्यांना मग वर्षानंतरही मूल झालं नसलं तर मग तपासणी चिकित्सा सुरू करावी. मग काही केसेसमध्येही दोष असतो. मग ते दोष दूर केले, औषधांनी, शस्त्रक्रियेने, की मग त्या दहा टक्क्यांपैकी साडे तीन ते चार टक्के जोडप्यांना नंतरच्या काळात मूल होऊ शकतं.

पण साधारण सहा साडेसहा टक्के जोडप्यांना काही केलं तरी, म्हणजे त्यांच्यात दोष सापडलेला असो वा नसो, मूल होऊ शकत नाही, हे कटू सत्य आहे. आणि हे सहा साडेसहा टक्के वंध्यत्वाचं प्रमाण, इतके नवनवीन शोध वैद्यकीय शास्त्रात लागले तरी जगभर कायमच आहे. असे एकूण वैद्यकीय पाहणीचे अहवाल सांगतात.

अर्थात मूल होत नाही म्हणून कोणी स्वस्थ बसून राहत नाही, प्रयत्न हे केलेच जातातच आणि करायचेही असतातच. पण प्रयत्न करताना ते योग्य पध्दतीनेच करावे लागतात. तिला तपासण्या, चिकित्सा एक ठराविक क्रमानेच कराव्या लागतात, की ज्याला वेळ लागू शकतो. भांबावून जाऊन, निराश होऊन, मन हळवं करून, खऱ्याखोट्याचा विवेक सोडून नुसतेच या डॉक्टराकडून त्या डॉक्टरकडे, तेही अर्धवट उपचार करत, नाही तर मग मांत्रिक, महाराज, मग भोंदू, नकली डॉक्टर्स या ठिकाणी हिंडण्यानं पैशाचा आणि सहनशीलतेचा चुराडा होतो. मन ताण, तणाव, दुःख, निराशा या भावनाखाली दबलं जाऊन त्यामुळे एकूणच इतरही शारिरीक क्रियांची आणि स्वास्थ्याची हानी होते, आणि पदरी काहीच पडत नाही.

मूल होण्यासाठी दोघांचाही म्हणजे पति-पत्नीचा एकत्र विचार करावा लागतो. दोघांच्याही प्रजनन क्षमतेचा विचार एकमेकांच्या संदर्भात करावा लागतो. बऱ्याच वेळेस असंही असतं की अशा मूल न होऊ शकणाऱ्या पती-पत्नी जोडप्यापैकी स्त्रीचं लग्न दुसऱ्याच कोणा पुरुषाशी झालं असतं तर तिला मूल होऊ शकलं असतं, किंवा त्या पुरुषाचं लग्न दुसऱ्याच स्त्रीशी झालं असतं तर तोही त्या दुसऱ्या स्त्रीला मूल देऊ शकला असता.

परंतु प्रत्यक्षात असे प्रयोग आपल्याला करता येत नाहीत. कारण पती-पत्नीच्या इतरही अनेक भावना ह्या प्रश्नात गुंतलेल्या असतात. म्हणूनच प्राप्त परिस्थितीत काय आणि कसे प्रयत्न करायचे ह्याचेच योग्य तर मार्गदर्शन जोडप्याला ठराविक पध्दतीने करावं लागतं.

त्या दृष्टीनं नर्मदाचा प्रश्न सोडविण्यासाठी मी तिला माहिती देण्यासाठी सांगू लागलो, हे बघ नर्मदा, तुला मूल व्हायला पाहिजे, पण तुझ्या नवऱ्याच्या कमजोरीमुळे हे घडत नाही असंच तुला म्हणायचं आहे ना?

हो आणि तुम्ही पुरुषांना सुध्दा तपासता तर मी घेऊनच येते त्याना इथं, नर्मदा उत्साहात म्हणाली. कमजोरी म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला? परत सर्व गोष्टी स्पष्ट व्हाव्या म्हणून मी विचारलं.

कमजोरी म्हणजे हेच हो, की मूल पाहिजे तर संबंध करायलाच हवा ना. पण त्याना जेमतेम दोन वेळा झालं की कंटाळाच येतो. आधी तरी तीनदा होत होतं. पण आता जमतच नाही म्हणतात. नर्मदा न लाजता म्हणाली. मुलाची तीव्र इच्छा मनात धरूनच. दोन वेळा म्हणजे आठवड्यातून की दिवसातून? मी विचारले. दिवसातून हो. आठवड्यातून दोनदा झालं तर कधीच मूल व्हायला नको मला. नर्मदानं स्पष्ट केलं.

नर्मदाचं हे बोलणं ऐकूण मला हसूच आलं. म्हणजे नर्मदाचा आणि तिच्या नवऱ्याचा लैंगिक संबंध व्यवस्थित येत होता. पण दिवसाकाठी २/३ वेळा संबंध आला तरच गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते, असं तिला वाटत होतं. आणि नवरा तसा करू शकत नव्हता, तो कंटाळायचा. म्हणून तिला वाटलं त्याच्यात कमजोरी आहे.

कमजोरीचा खरा अर्थ, जो लोकांना माहीत आहे तो, म्हणजे पुरुषात असलेली संबंध (संभोग) करण्याची असमर्थता किंवा दुर्बलता, म्हणजेच इच्छा होऊनहीं लिंग (लवडा) ताठरता न येणं किंवा इच्छाच क नर्मदाच्या नवऱ्याचं तसं नव्हतं. पण नर्मदाच्या मागणीनुसार तो संभोग करू शकत नव्हता किंवा त्याला कंटाळा यायचा. कारण उघड आहे, ज्या आनंदासाठी, तृप्तीसाठी पतिपत्नीनी जवळ येऊन झवायचं असतं, तो आनंदच नर्मदाच्या नवऱ्याला मिळत नसला पाहिजे.

कारण नर्मदाची संभोगाची इच्छा फक्त मुलासाठी होती. शृंगाराकडे आणि प्रेमाकडे तिचं लक्ष नसायचं. त्यामुळे तिच्या नवऱ्याच्या दृष्टीने संभोग (झवणे) एक निव्वळ क्रियाच झाली होती. पत्नीची मुलाची मागणी पुरी करण्यासाठी संभोग दोन, तीन तीन वेळा करूनही नर्मदाला दिवस राहत नव्हते. त्याचाही ताण त्याच्या मनावर पडला असणारच आणि तणावाखाली संभोग करायचा म्हणजे बहुदा नर्मदाच्या नवऱ्याला शीघ्रपतन (लवकर गळणे) होत असणारच अशी माझ्या मनात शंका आली.

म्हणून मी नर्मदाला विचारलं, साधारण कितीवेळ संबंध टिकतो तुमचा? कुठला टिकतो? सुरू झाला की लगेच, म्हणून तर कमजोरी आहे असं मी म्हटलं. पूर्वी असं होत नव्हतं. आताशाच व्हायला लागलं आहे. नर्मदा म्हणाली. माझा अंदाज खरा ठरला.

काय करतो तुझा नवरा? नाव काय त्याचं, वय किती? घरात इतर कोणीच नसतं का तुझ्या? मी प्रश्न विचारले.

आम्ही दोघंच घरात. त्याचं नाव जनार्दन. वय असेल पंचवीस एक. सायकल दुरुस्तीचं दुकान आहे त्यांचं. काही आजार वगैरे आहेका त्याला? प्रकृती कशी असते? व्यसन वगैरे आहे का?

व्यसन काही नाही. तंबाकू खातात ३/४ वेळा एवढंच. प्रकृती चांगली आहे. व्यवस्थित खातात, पितात. मागे कुस्तीबी खेळायचे, पण आता सोडून दिली. नर्मदा म्हणाली.

___बरं नंतर तू तुझ्या नवऱ्याला घेऊन येच, पण आधी मी तुला काही गोष्टी मूल होण्याच्या दृष्टीने समजावून देणार आहे, त्या नीट समजावून घे. तुला मी प्रश्न विचारीन त्यांचीही नीट उत्तरे दे. मग तुला अंगातून तपासावं लागेल! मी नर्मदाला म्हटलं.

__मला तपासा पण त्याचीही कमजोरी दूर व्हायला पाहिजे ना? नर्मदा परत म्हणाली. नवऱ्यामुळेच आपल्याला दिवस राहत नाहीत अशी तिची पक्की समजूत तिनं करून घेतली होती. नवऱ्याचं बघूच, पण तुझी पाळी वेळेवर येते की नाही, अंगावर किती जातं, बीज तयार होतं की नाही, तुझी एकंदर प्रकृती वगैरे सर्वच गोष्टी योग्य आहेत की नाही हे बघावं लागेल. एवढं नर्मदाला सांगून मी तिला माहिती द्यायला सुरूवात केली.

गर्भधारणा व्हावी, पुनरुत्पत्ती व्हावी म्हणूनच निसर्गतः मुलगा आणि मुलगी शारिरीक दृष्ट्या परिपक्व होतात, म्हणजेच वयात येतात. त्यासाठी स्त्रीबीजाची उत्पत्ती करणारे बीजांडकोष गर्भाशयाकडे बीजवहन करणाऱ्या बीजवाहिन्या गर्भधारणा जिथे होते ते गर्भाशय आणि गर्भ जिथून स्त्री शरीराबाहेर पडतो तो जननमार्ग हे सर्व व्यवस्थित आणि कार्यक्षम लागतातच, मासिक पाळीचं चक्र, त्यातल्या बारीक सारीक घटना क्रमवार घडून तालबध्द रीतीनं नियमित चालू रहावं म्हणून मेंदूतील पिट्युटरी ह्या अंतस्त्रावी ग्रंथीच्या प्रधान ग्रंथीचं (जी इतरही नलिकाविहीन अंतःस्त्रावी ग्रंथीना त्याचे स्त्राव करण्यासाठी प्रेरक व नियंत्रक म्हणून काम करते) स्त्राव आणि बीजांडकोषाकडून उत्पन्न होणारे स्त्राव ह्यांचं संतुलन राहावं लागतं. ह्या स्त्रावांची निर्मिती परस्परावलंबित असते.

तसेच पिट्युटरी स्त्रावाचं नियंत्रण, हायपोथैलमस ह्या मेंदूतील अति महत्वाच्या केंद्राकडून शरीराच्या आतील व बाहेरील परिस्तितीचा सर्वंकष विचार करून केलं जातं. म्हणूनच ताण, चिंता, काळजी मनावर असले की मासिक पाळीची लय, नियमितपणा बिघडू शकतो हे महत्वाचं. मासिकपाळीचं चक्र सुरू होतं म्हणजेच गर्भधारणेच्या दृष्टीने गर्भाशयातील आंतर त्वचेची जाडी वाढणं-त्याला रक्तपुरवठा वाढणं वगैरे सुरू होतं. सुरूवातीला काही महिने पिट्युटरी आणि बीजांडकोषातील स्त्रावांच्या निर्मितीतील संतुलन नीट सुरू होईपर्यंत स्त्री बीजांडकोषात बीज उत्पत्ती सुरू होत नाही. पण हळुहळू ते मार्गी लागतं. मुलीला ती वयात आल्याच्या इतर खुणा शरीरावर उमटू लागतात. जसे स्तनांचा आकार वाढणे, नितंब (ढुंगण) रुंद व मांसल होणे, योनीवर (पुचीवर) केस येणे इ.

स्त्री बीजोत्पत्ती बीजांडकोषात सुरू करणं हेच तर स्त्रीच्या ऋतुचक्राचं प्रमुख ध्येय. बीजांडकोषात असंख्य सूक्ष्म अशी वाढ न वाढलेली स्त्रीबीजं असतात. पिट्युटरीच्या बीजोत्तेजित स्त्रावांमुळे बीजांडकोषातील काही बीजं हळुहळू वाढू लागतात. पण त्यातील एकच पुढे वाढत स्वतःभोवती कवच तयार करतं. साधारण चौदा दिवसांच्या कालात एक बीज कवचासकट मोठं होतं आणि मोठं होता होता ते स्वतःचे इस्ट्रोजन स्त्राव निर्माण करू

लागतं, की ज्यामुळे पिट्युटरीच्या बीजोत्तेजित स्त्रावाचं कार्य बंद होतं, आणि इतर बीजं वाढत नाहीत.

ह्या इस्ट्रोजन स्त्रावामुळे गर्भाशयातील आतील त्वचाआवरण (इन्डोमेट्रीयम) जाड होऊ लागतं आणि संभवनीय गर्भधारणेसाठी त्यात लहान ग्रंथीची वाढ होऊ लागते. तसंच स्तनातील दुग्धोत्पादक ग्रंथीची वाढ होऊ लागते, म्हणजे गर्भारपण सुरू झालं तर त्याची तयारी म्हणून.

बीजवाढ सुरू झाल्याच्या साधारण चौदाव्या दिवशी इस्ट्रोजनच्या स्त्रावाचं प्रमाण कळसाला पोहोचतं, त्यामुळे गर्भाशयमुखातील एरवी घट्ट असणारे द्राव, जे शुक्राणुना आत जाऊ देत नाहीत, ते आता पातळ व्हायला लागतात. अशा रितीने चवदाव्या-पंधराव्या दिवशी योनीमार्गात पडलेल्या वीर्यातील शुक्राणू गर्भाशय मुखात प्रवेश करू शकतात आणि ह्याच १४ व्या दिवशी इस्ट्रोजनमुळे पिट्युटरीतून एक नवीन स्त्राव रक्तात स्त्रवणं सुरू होतो की ज्यामुळे आतापर्यंत बीजांडकोषात कवचासकट मोठं झालेलं बीज कवच फोडून बाहेर येतं आणि बीजांडवाहिनीत प्रवेश करतं. हाच बीजोत्पत्तीचा काळ. आणि अशा रितीने उत्पन्न झालेलं बीज हे फक्त २४ तास जिवंत राहतं म्हणजे एवढ्या अवधीतच जर पतीशी पत्नीचा संबंध आला तरच तिला त्यावेळेस दिवस राहू शकतात. जर २४ तासांनी बीज मरून गेलं तर मग त्या महिन्यात गर्भधारणा होणं शक्यच नाही. पण जर चवदाव्या दिवशी उत्पन्न झालेलं स्त्रीबीज चोवीस तासच जगतं, नंतर मरून जातं, तर मग लगेच पाळी का सुरू होत नाही? मग पुढील पाळी सुरू व्हायला १४/१५ दिवस का लागतात? नर्मदानं विचारलं.

 


ते गर्भाशयाचं वाट पहात असतं. फलित बीजासाठी आतापर्यंत जे इस्ट्रोजन नावाचे अंतःस्त्राव बीजांडकोषातून निर्माण होत असतात पहिले चौदा दिवस, त्याऐवजी आता उरलेल्या कवचातून प्रोजेस्टेरॉन हे गर्भधारणेला मदर करणारे अंतःस्त्राव स्त्रवू लागतात. त्यामुळे गर्भाशयातील ग्रंथीची वाढ थांबते व त्यातून गर्भधारणेसाठी आवश्यक अशा पोषक द्रव्यांची निर्मिती सुरू होते. आवरण जाड होतं आणि त्या आवरणाला वलयाकृती आकाराच्या स्प्रिंगसारख्या रक्तवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणावर रक्त पुरवठा होतो. हेतु हा की फलित बीजाला गर्भाशयात रोपण करण्यास सर्व सिध्दता असावी.

पण डॉक्टर, हे बीज फलित होतं म्हणजे काय होतं? नर्मदा. सांगतो, गर्भाशयातील दोन बाजूंला दोन बीजांडकोष असतात. पण आताच सांगितल्याप्रमाणे एका महिन्यात एकाच बीजांडकोषातून बीज तयार होतं आणि चवदाव्या दिवशी ते त्याच्या कवचातून फुटून पोकळ अशा बीजवाहिनीत जाऊन पडतं. व तेथून त्याचा गर्भाशयाकडे प्रवास सुरू होतो.

जर या सुमारासच पतीचा पत्नीशी संबंध आला आणि त्याचं भरपूर शुक्राणू असलेलं वीर्य पत्नीच्या योनीमार्गात गर्भाशय मुखाशी पडलं तर त्यातले फक्त शुक्राणुच गर्भाशय मुखाच्या आत म्हणजे गर्भाशय ग्रीवाच्या आत (ग्रीवा म्हणजे मानेसारखा अवयव) आताच पातळ झालेल्या द्रवातून गर्भाशयात प्रवेश करू शकतात. त्यातील काही शुक्राणु गर्भाशयाच्या त्या बीजवाहिनीत जातात आणि त्यातलं केवळ एकच बीजवाहिनीत वाट पहात असलेल्या स्त्रीबीजाशी जाऊन भिडतो व त्या स्त्रीबीजाचं आणि ह्या पुरुषबीजाचं (शुक्राणुचं) मीलन होतं आणि एक नवीनच फलित बीज तयार होतं.

शुक्राणु किंवा पुंबीजं दोन प्रकारची असतात. एक नरपुंबीज आणि दुसरं मादीपुंबीज या दोन्हीपैकी ज्या प्रकारच्या पुंबीजाचं स्त्री बीजाशी मीलन होतं यावर मुलगा होणार की मुलगी हे ठरतं आणि त्याबाबत कोणीच काही करू शकत नाही.

पण मुलगी झाली तर बाईलाच का दोष देतात? लागोपाठ मुली झाल्या तर बायकोलाच टाकून देतात. किती ठिकाणी बघितलंय मी हे, नर्मदा म्हणाली.

अज्ञान हेच कारण. स्त्रीवर काही अवलंबून नसतं. अगदीच बोट दाखवायचं झालं तर तर पुरुषाकडेच दाखवता येईल. कारण त्याच्या बीजाच्या प्रकारावरच मुलगा होणार की मुलगी ते अवलंबून असणार अर्थात तोही त्यासाठी काही करू शकत नाही हेही तितकंच खरं. फलित झालेले बीज साधारण ४ ते ६ दिवसात हळुहळू त्या ३/४ इंच लांबीच्या बीजवाहिनीतून प्रवास करत गर्भाशयात येऊन पडते. तिथे मग गर्भाशयाच्या मऊ लुसलुशीत भरपूर पोषक द्रव्य असलेल्या अस्तरासारख्या अंतरत्वचेत स्वतःला रूजवून घेतं. ह्यालाच आपण गर्भधारणा झाली असे म्हणतो. ते बीज मग हळुहळू वाढायला लागतं. सुरूवातीला नुसत्याच गोल गोल पेशी असतात. त्याचं विभाजन होत होत सहा ते आठ आठवड्यांनी साधारण माणसासारखा आकार म्हणजे डोके, धड, हात, पाय वगैरे अवयव त्या गर्भाला येऊ लागतात आणि गर्भ वाढतो म्हणून पाळी येणं, परत बीज तयार होणं हे चक्र बाळंतपणा पर्यंत आणि पुढे साधारण तीन चार महिने तरी बंद राहतं.

पण अशा रितीने बीज फलित झालंच नसेल आणि ते गर्भाशयात स्थिरावलं नसेल तर मग प्रोजेस्टरॉन ह्या अंतरस्त्रावचं स्त्रवणं बंद होतं आणि त्या अंतरस्त्रावाचा प्रेरक आधार तुटल्याने गर्भाशयातली वाढलेली अंतःत्वचा कोसळायला लागते. तिचे तुकडे तुकडे निघू लागतात. आणि त्याच बरोबर त्याला शरिराकडून होणारा रक्ताचा पुरवठा बंद होतो. पण आधीच जे साठलेलं असतं ते रक्त आणि जाड आवरणाचे बारीक बारीक तुकडे गर्भाशयमुखातून योनीमार्गावाटे (पुचीतून) बाहेर पडू लागतात. हा बिनउपयोगाचा माल बाहेर काढण्यासाठी गर्भाशयाचं आकुंचन सुरू होतं. त्याला आपण म्हणतो मासिकपाळी सुरू झाली. साधारण ३ ते ४ दिवस हा रक्तस्त्राव अधून-मधून सुरू असतो.

पण हे सुरू असताना म्हणजे एक चक्र संपत असताना दुसऱ्या बीजांडकोषात परत नवीन बीजाची उत्पत्ती सुरू झालेली असते. कारण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरॉन हे बीजांडकोषातले अंतस्त्राव स्त्रवण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे परत पिट्युटरीचे बीजउत्पत्ती प्रेरक अंतस्त्राव स्त्रवू लागतात. परत दुसऱ्या ऋतुचक्राची सुरूवात परत चौदाव्या दिवशी नवीन बीजोत्पत्ती, परत गर्भाशयाच्या आवरणाचं जाड होण्याचं काम, परत तेच इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरॉन अंतस्त्रावाचं काम, आणि परत जर बीज फळलं नाही तर परत वाट पाहून परत पाळीचा रक्तस्त्राव सुरू होतो.

तेव्हा केवळ त्या १३/१४ व्या दिवशीच पतीपत्नीचा लैंगिक संबंध आला तरच पत्नीला दिवस राहण्याची शक्यता असते, इतर दिवशी नाही. मग तुमचा संबंध दिवसातून दोन वेळा येवो नाहीतर ४ वेळा येवो. स्त्रीबीजचं हजर नसेल तर त्या संबंधाचा उपयोगच काय, म्हणजे दिवस राहण्याच्या दृष्टीने हं नर्मदा.

नर्मदानं लाजून मान खाली घातली अन् म्हणाली, माझाच मूर्खपणा सगळा ! पण मला तरी काय माहिती हो. हे असं नियमशीर असतं म्हणून. मला पोरांचा ध्यास, म्हणून मालक संबंधाला कधी कधी वैतागायचे तरी मी ऐकायची नाही त्यांचं.

आणि म्हणूनच संबंधाचा आनंदही तुम्ही उपभोगू शकत नव्हतात. नुसती क्रिया घडायची. मी म्हणालो.

नर्मदाला एकदम एक शंका आली, पण आमचा संबंध त्या तेराव्या की चौदाव्या दिवशी येत होताच की, मग तरीही मला दिवस का गेले नाहीत?

नर्मदाची शंका बरोबर होती. समजा एखाद्या स्त्रीची मासिकपाळी नियमित आहे, म्हणजे स्त्रीबीज नियतकाली म्हणजे, पाळीच्या १३/१४ व्या दिवशी उत्पन्न होतं असं धरून चाल, पती-पत्नीमध्ये

शारीरिक दोष नसेल, मूल व्हावं या इच्छेनं पतीपत्नी दिवसातून २/३ वेळा समागम (संभोग) करत असतील अन् तरीही फलधारणा होऊ शकत नसेल तर मग कारण म्हणून जास्त शक्यता समजली जाते ती पतीपत्नीमध्ये लैंगिक संबंधाचं प्रमाण जास्त असण्याची.

स्त्रीमध्ये साधारण २८/३० दिवसांच्या कालावधीत एकच बीज उत्पन्न होतं आणि ते चोवीस तासंच जगतं, पण पुरूषात मात्र तो वयात आल्यापासून मरेपर्यंत २४ तास शुक्राणुंची उत्पत्ती त्याच्या अंडकोषात सुरू असते. त्याच्या अनेक फूट लांबीच्या अति सुक्ष्म अशा शुक्रउत्पादक नलिकांमधून एक शुक्राणु शुक्रजनकपेशीपासून तयार आणि परिपक्च व्हायला साधारण काळ हा ८१ दिवसांचा (७२ ते ९० दिवसांचा) लागतो. पण अशा कोट्यवधी शुक्राणुंची निर्मिती प्रक्रिया सतत सुरू असते. असे हे तयार झालेले शुक्राणु काही काळ म्हणजे एक दोन आठवड्यापर्यंत शुक्रवाहक नसेमध्ये साठून राहू शकतात आणि संबंधाच्या अखेरीस बाहेर पडताना तिथूनच ते खेचले जातात.

शुक्राणु एवढे कोट्यवधीच्या संख्येत तयार होण्याचं कारण काय? तर योनीमार्गातील स्त्रावामुळे आम्लतेमुळे बहुसंख्य शुक्राणु नष्ट होतात. आणि काही हजारच गर्भाशयात प्रवेश करू शकतात. तर शेवटी स्त्रीबीजाभोवती गर्दी करणारे काही डझनातच आढळतात. स्त्रीबीजवाहिनीतील उलट्या प्रवाहामुळे शुक्राणुंच्या हालचालींना अडथळा येतो.

म्हणूनच योनीमार्गात पडलेल्या वीर्यात साधारणपणे योग्य ती गती असलेले परिपक्च वाढ झालेले असे कमीतकमी ४ कोटी वा त्याच्यापेक्षा जास्त शुक्राणु एका सी,सी.त असतील तरच ते फलित होण्याचा संभव असतो. आणि जर वरचेवर संबंध आले तरच मग एवढ्या प्रमाणात शुक्राणु वीर्यात खेचले जात नाहीत किंवा अपरिपक्व अवस्थेत बाहेर टाकले जातात. आवश्यक तेवढा साठा व्हायला दोन समागमात (संभोगात) वेळेचे अंतर कमीच असल्याने उसंतच मिळत नाही. त्यामुळे नुसते वीर्य म्हणजे मूत्राशयातील खालील पुरूषग्रंथी, वीर्यकोष आणि कौपर्स ह्या तीन ग्रंथीतील स्त्राव बाहेर पडतात व त्यात शुक्राणुंचं प्रमाण अल्पच राहतं. त्यामुळे जे शुक्राणु येतात ते योनिमार्गातच नाश पावतात.

 
म्हणूनच मूल होण्यासाठी समागम क्रिया करताना नेहमी एक दिवसाआड असा समागम (४८ ते ६० तासांच्या अंतराने) करावा, असा सल्ला पतिपत्नीना नेहमी दिला जातो. त्यामुळे मग एका वीर्यपतन क्रियेत कमीत कमी आवश्यक एवढ्या प्रमाणात शुक्राणु गर्भाशयमुखाशी योनीमार्गात पडू शकतात आणि त्यामुळे स्त्रीबीज फलित होण्याची शक्यता खूपच वाढते.

म्हणजे आता आम्ही फक्त तेराव्या किंवा चौदाव्या दिवशी फक्त एकदाच संबंध करायचा का? नर्मदाने विचारले.

अगं, पतीपत्नी संबंधासाठी जवळ येतात ते काय फक्त मूल होण्यासाठी का? एकमेकांवर प्रेम व्यक्त करणं आणि त्या योगे आनंद व तृप्ती मिळवणं हा एक मुख्य हेतु समागमामागे असतो. पण त्यातूनही गर्भ रहावा अशी इच्छा असते. तेव्हा समागम साधारण पाळीच्या दहाव्या, बाराव्या, चौदाव्या, सोळाव्या दिवशी म्हणजे समदिवशी पती पत्नीनी समागम होऊ द्यावा. दुसऱ्या महिन्याला अकराव्या, तेराव्या, पंधराव्या, सतराव्या म्हणजे विषम दिवशी समागम होऊ द्यावा.

तेव्हा यापुढे सर्व नीट लक्षात ठेव ! मी नर्मदाला सूचना केल्या.

मग नर्मदाची सर्व खुलासेवार माहिती मी वैद्यकीय दृष्टीकोनातून विचारली. आईवडीलांची प्रकृती, अनुवंशिक आजार, नर्मदाला लहानपणापासूनच झालेले आजार, उपचार, शस्त्रक्रिया, तिच्या सवयी, आहार, मासिकपाळीची माहिती वगैरे विचारल्यानंतर मुख्य गोष्ट कळली ती म्हणजे नर्मदाला पाळीच्या वेळी ६/७ दिवस खूप रक्तस्त्राव व्हायचा. पाळी वेळेवर येत होती. नर्मदाच्या नखांचा, जिभेचा, डोळ्यांच्या खालच्या पापणीचा फिकट पांढरा रंग तिच्या अंगातल्या रक्तातल्या हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्याचं दर्शवत होत्या.

जेव्हा स्त्रीला असा भरपूर रक्तस्त्राव होतो किंवा अधून मधून होतच राहतो, तेव्हा तिच्यात बीजोत्पती होत नसतेच. नर्मदाला मग मी हे सुध्दा समजावून सांगितलं की त्या अंतरस्त्रावांच्या कार्यात काही तरी घोटाळा झाल्यामुळे या प्रकारचा रक्तस्त्राव होतो आणि बीजच तयार होत नसल्यामुळे रक्तस्त्राव थांबल्यानंतर संबंध आले तरी दिवस राहतच नाहीत आणि शरिरातील रक्त कमी झाल्यामुळे कंबर दुखणे, अंगावर पांढरं जाणे, अशक्तपणा आणि इतर कटकटी संभवतात.

नर्मदाची बाकीची तपासणी केली तपासणीत इतर काही विशेष सापडलं नाही. नर्मदाला आता तिचा अत्यावर्त बंद होण्यासाठी आणि शरीरातल्या रक्ताचं प्रमाण वाढविण्यासाठी औषध सुरू करणं आवश्यक होतं. अत्यावर्त बंद झाल्यावर मासिकपाळीत रक्तस्त्राव योग्य प्रमाणात होऊ लागल्यावर आपोआपच बीजोत्पतीचीही सुरूवात झाली असती.

त्यासाठी तीन चार महिने सतत औषधे घेणे, आहारातही अति तेलकट, अति तिखट, मसाल्याचे पदार्थ टाळणे, फळे खाणे, साधा सात्विक आणि समतोल आहार घेणं, मन शांत ठेवण वगैरे सर्व उपयुक्त सूचना तिला दिल्या. तंबाखू खाण्याची तिला संवय होती ती पण पूर्ण बंद करण्यास बजावलं आणि मुख्य म्हणजे नर्मदाला मी हे समजावून दिलं की औषधं, आहार यांनी इष्ट परिणाम व्हायला वेळ लागेल, ती काही जादू नव्हे. तेव्हा तिने आतापासून बाळासाठी अधीर, उताविळ होऊ नये.

आता पुढील पायरी म्हणजे नर्मदाच्या नवऱ्याची शारीरिक तपासणी करणे महत्वाचे होतं. म्हणून नर्मदाला जाताना नवऱ्यास मी सांगितलेल्या सर्वच गोष्टी तिचं अज्ञान वगैरे मोकळेपणाने बोलायला सांगितलं. म्हणजे त्याच्या मनावरचा ताणही कमी झाला असता.

पाच सहा दिवसांनी नर्मदा नवऱ्यासह आली. आल्या आल्या प्रथम नर्मदाच्या डोक्यातील वेड काढल्याबद्दल त्याच्यावर उपकार झाल्याची भावना त्याने व्यक्त केली. स्वभाव अबोल आहे असं म्हणत तो बोलला मोकळेपणे. गर्भधारणेबद्दलची वीर्याबद्दलची माहिती परत नीट समजवून घेतली.

मी त्याच्या लग्नापूर्वीची हकीकत विचारली. त्याला विशेष असे आजारपण काही नव्हते. कसली शस्त्रक्रिया झाली नव्हती, अपघात वगैरेही झाला नव्हता. लग्नापूर्वी कोणत्या स्त्रीशीही त्याचा संबंध आला नव्हता.

नर्मदाच्या नवऱ्याच्या शारीरिक तपासणीतही विशेष दोष आढळला नाही. फक्त अंडाशय (अंडकुली) जरा दाबल्यावर त्याला वेदना जाणवत होत्या. वीर्य तपासणीसाठी त्याला पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीमध्ये जाण्यास सांगितलं. हस्तमैथुन करून वीर्य बाटलीमध्ये गोळा करून लॅबमध्ये देण्याबद्दलही सूचना केल्या.

५/६ दिवसांनी नर्मदाचा नवरा जनार्दन वीर्य तपासणीचा अहवाल घेऊन आला. वीर्यतपासणीत शुक्राणुंची संख्या ४ कोटी २० लाख एवढी होती म्हणजे व्यवस्थित होती. शुक्राणुंची गतिमानता बऱ्यापैकी होती. मात्र ५० टक्केच शुक्राणु व्यवस्थित गती असलेले होते. गर्भधारणेसाठी साधारणपणे ६५ टक्के शुक्राणु गतिमान असावे लागतात. शिवाय काही पस सेल्स सापडल्या होत्या. या पस सेल्स म्हणजे रक्तामध्ये बाहेरून कोणतेही जंतू पसरले असल्यास त्यांच्या प्रतिकारासाठी किंवा जंतू असतील तिथे त्या एकत्र होतात. म्हणजेच जनार्दनला सौम्य स्वरूपात अंडाशयाला लागून असलेल्या एपिडीडायमिस या अवयवाच्या पेशीमध्ये जंतुदोष (इंफेक्शन) होता. असा संभव होता.

जनार्दनला मी हे सर्व सोप्या भाषेत समजावून दिलं आणि शुक्रजंतूंची गतिमानता वाढविण्यासाठी आणि जर थोडंफार इंफकेशन या कारणासाठी दोन औषधं दिली व ती दोन महिने घेण्यास सांगितले. गर्भधारणेसाठीच्या योग्य काळात एक दिवसाआड समागम करण्यावर भर देण्यास सांगितलं.

नर्मदा आणि जनार्दन गेले. त्यांना १/२ महिन्यानंतर येण्यास सांगितले होते. कारण नर्मदाच्या पाळीचा त्रास कमी होईपर्यंत आणि रक्तवाढ होईपर्यंत मला पुढच्या तपासण्या करायच्याच नव्हत्या.

२ महिन्यांनी नर्मदा एकदा आली होती. तिला पाळीचा त्रास आता चार दिवसच होत होता, रक्तातही थोडी वाढ झाल्याची लक्षणं दिसत होती. ५/६ महिन्यानंतर नर्मदाला दिवस राहिले.

मला वाटलं की पाळी चुकल्या चुकल्या नर्मदा मला सांगायला धावतच येईल, पण ती चक्क २||-२।।। महिने झाल्यावरच तपासणीसाठी आली. मला आश्चर्य वाटलं, पण योग्य ज्ञान मिळाल्यामुळे नर्मदाचं मन स्थिरावलं होतं आणि तिच्यातील उतावीळपणा आपोआप कमी झाला होता.

(केस तिसरी संपूर्ण)

 
Back
Top