S
StoryPublisher
Guest
तडा
लेखिका - अश्विनी
"दुर दूखर जिथवर नजर जातीया, अगदी जिथं आभाळ धरतीचे चुंबन घ्याया झुकलंय, जिथं आभाळ धरतीमातेचं स्तन गोंजाराया तिला चिकटलय त्या डोंगरापतुर, जिथं गी बघाल थितं जिमीनीला पडलेलं तडं दिसत व्हतं, समदं वसाड दिसत व्हतं, एकत्री हिरवंच काय पर पिवळं पानवी झाडावर दिसत नव्हतं. म्होरल्या वर्साला देवाच्या किरपेनं पानी बरसंल तर, हो जिमीनीचं तडं वी भरलं जातील, हिरवा चुडा घालून हिरवा शालू नेसून ही धरती पुन्यांदा नव्या नवरीसारखी सजल, पर....,"
"पर माज्या पोरिच्या आत्रुला गेलेलं तडं कोन बुजवनार? तिच्या अंगावर कोन हिखा शालु पांघरतार? कोन तिला हिरवा चुडा घालाया देनार? कोन गोळा करनार तिच्या आब्रुची लक्तरं गावच्या येशीवरून ?, कोन....? सांगा कोन...... व्य माज्या मनाच्या हिरीत खुप काही दडलंय, म्या पायलेत माज्या पोरीच्या अबुला गेलेले नडे, म्या पायलीत माज्या पोरिच्या कापडांची लक्तरे, समद्यासमोर घडलं हो पर..... कोनी वी न्हाई आलं मदतीला.... आई मा
होय, तिच्या मनाच्या विहीरीत खुप काही दडलंय असेच मला वाटत होते. तिच्या डोळ्यातली आसवं माझे काळीज पिळवटून काढत होती. तिची दुख भरी कहाणी माझ्या हृदयाला छिद्र पाडत होती. ती बोलत होती. तिच्या ग्रामीण भाषेतच मला ती सांगत होती. (इथे मी ती कथा आपल्याला उमजेल अश्या भाषेत लिहीत आहे. मधे जिथे त्या ग्रामीण भाषेची गरज लागेल तिथे त्याच ग्रामीणशैलीत सांगेन )
१९५६ चे वर्ष होते ते. १९५५चा पावसाळा कोरडा गेला होता. अखंड वर्षात कुठेही पाण्याचे टिपूसदेखील पडले नव्हते. विहिरींमधे स्वतः चे प्रतिबिंब बघता येईल येवढेही पाणी नव्हते. जमीन पुर्ण कोरडीहोती. गावात पक्षी तर नावालाही शिल्लक नव्हते. होते ते बैल, गायी विकून सर्व गावकरी घर चालवत होते. दुष्काळानी सगळीकडे हाऽहाऽकार माजवला होता. शक्य होते तेवढे पाणी सरकार टँकरने पुखायचा प्रयत्न करत होते. दोन, तीन दिवसातून येणारा एक टँकर कितीसा पुरणार होता गावाला.
अखंड वर्ष असेच गेले होते. १९५६ हे साल तरी सर्वाना दिलासा देईल याची आशा होती. पण छे !!! नियतीला ते मंजूर नव्हते. तमाम मानवाचा घास गिळायचा होता तिला. तसाच काहीसा खेळ नियती खेळत होती. १९५६चा सप्टेंबर अर्ध्याहून अधिक संपला होता. पावसानी पुन्हा हुलकावणी दिली होती. सलग दोन वर्षे दुष्काळ म्हणजे काय असतो आम्हालाच विचारा. आम्ही काढलेन ते दिवस पाहीलाय नियतीचा प्रकोप, या सृष्टीचा प्रकोप, पाण्याच्या अभावाने जो हाहाकार झाला तो आम्ही या डोळ्यांनी पाहीलाय.
गावात जनावरे कृश झाली होती, जी तगड़ी होती ती सावकाराने आणि पाटलाने लाटली होती. जमिनी सावकार गिळंकृत करत होता, पाटील खदा खदा हसत होता. लोकांचे, प्रजेचे होणारे हाल पाहून जो हसेल तो राजा कसला. पण कुणाला कळणार होते ते. पोटाचे आधी बघायचे की पाटलाचे हा प्रश्न मनात घेऊनच जो तो जगत होता. भिक मागायला सावकाराकडे नाहीतर पाटलाकडे जात होता. हातावर शेरभर धान्य ठेवून त्याची एकरो जमिन सावकाराच्या घशात जात होती. कोण येणार होते हे बघायला? कोण थांबवणार होते है ? ज्याला त्याला स्वत: ची चिंता सतावत होती.
एकच पुरुष उभा राहीला ज्याने सावकाराला आणि पाटलाला जाब विचारला. तो म्हणजे माझा दादला (नवरा) कोणासाठी? गावकऱ्यांसाठी त्यांच्या भल्यासाठी काय मिळाले त्याला? काय दिले यांनी त्याला ? गावकऱ्यांनी त्यांच्या भल्यासाठी लढणाऱ्याला काय फळ दिले माहितेय? सांगते ऐक वार्ड
सप्टेंबरमधे गावच्या देवीची जत्रा असते पण त्या वर्षी ती जत्रा झाली नाही. कारण सर्वत्र पडलेला दुष्काळ. त्याच सुमारास गावदेवीच्या देवळात एक साधूवावा आले होते. त्यांचे नाव मला आठवत नाही, हां पण त्यांना सगळे साधूवावाच म्हणायचे. भगवी कफनी नेसलेली, एका हातात कमंडलू आणि दुसऱ्यात दंड घेऊन देवीच्या देवळाबाहेर
ध्यानस्थ बसलेले साधूवावा गावकऱ्यांना मोहीत करत होते. गावकरीही त्यांच्याकडे आकृष्ट होत होते. सगळ्यांची दुखभरी कहाणी एकच होती.
"देवा, पान्यावाचून अवाळ व्हतेय, तवा पावसाला आनाच "
"मागल्या वर्साला पावसानी दगा दिलाय, या वर्साला वी आतापतुर पान्याचा टिपूस न्हाय आलेला, तवा फुडं काय व्हनार ते सांगा?"
सगळ्यांचे प्रश्न सारखेच होते. साधुवावा शांत चित्ताने ऐकत होते. मधेच आपली दाढी कुरवाळत हसत होते. मधेच काहीतरी पुटपुटत होते. शेवटी सगळ्यांचे प्रश्न ऐकल्यावर ते म्हणाले,
"वालकांनो, उद्याच्याला या.... मी रातच्याला देवासंगत बोलून घेतू आनि मंग उद्या तुमास्नी यावर उपाय सांगतू "
त्यांच्या या बोलण्याने खुश झालेले गावकरी साधूबावांचा जयजयकार करत आपापल्या घरी गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच देवळाबाहेर गर्दी जमली होती. सर्वाना हवा होता पाऊस, पाणी आणि त्यासाठी साधुवावा काय उपाय सांगतील तो करायची सर्वांची मानसिक तयारी होती. पण संध्याकाळचे ५ वाजले तरी वाया देवळातून बाहेर आले नाहीत. एक दोघांनी डोकावून पाहीले. बाबा समाधिस्त होते. सगळे गावकरी उपाशीपोटी बाहेर ओसरीवर बाबांची वाट पहात होते. अखेर तो क्षण समीप आला. बाबा समाधीतून उठले. त्यानी उठून देवीला दिवा लावला. बाबा उठलेले पाहताच गावकऱ्यांच्या जीवात जीव आला.
सगळेजण आदवीने उभे राहीले. इतक्यात पाटील आणि सावकारपण गाडीतून तिथे आले. सर्व गावकऱ्यानी त्यांना जागा करून दिली, पुढे जाण्यासाठी. वात्रा गाभाऱ्याच्या दरवाजातच स्थानापन्न झाले. पाटलानी आणलेल्या फळांच्या टोपलीतले एक फळ उचलून त्यानी देवीला नैवेद्य दाखवला. बाकीची टोपली गावकऱ्यात वाटून टाकली. गावकऱ्यांच्या मनात वावाबद्दलची श्रद्धा अजूनच दृढ झाली.
तेव्हा माझा दादला शहराकडे गेला होता. गावकऱ्यांना जास्तीचे पाणी मिळावे यासाठी सरकारदरबारी तो खेटा घालायचा त्याच कामासाठी तो गेला होता. मी आणि सुलू, माझी लेक, सुलक्षणा नाव तिचे. आम्ही दोघीनी त्यांच्यात उभे होतो. जे घडेल ते पाहत होतो. सगळ्या गावकऱ्यांनी वावाचा जयघोष केला. पाटलाचा आणि सावकाराचाही त्यांच्याशिवाय गावाला कोण तारणार होते नाही तरी कसेही असले तरी ते गावकऱ्यांसाठी देवासमान होते. पाटलानी वावांना विचारले,
"बाबा, काय झाले? काय म्हनला देव तुमास्नी? यंदाच्या हंगामाला पाऊस पडल नव्हं?"
बावांचा चेहरा खित्र होता. खिन्न चेहऱ्यानीच वावा हसले. पण काहीच बोलले नाहीत. तेव्हा सावकार बोलला,
"सांगा बाबा, सांगा काय उपाय बोलला देव ?"
सावकारानी अक्षरश: लोटांगण घातले गावाला. त्याला उठवतच वाषा बोलू लागले,
"मी रातच्याला देवासंगट बोललू, त्यानी उपायवी सांगितला. पर....." इथेच बाबाची सुई अटकली.
"पर..., पर काय जावा. सांगा तुमी जो कायबी उपाय असेल तो कराया समदे लोग तयार हायेत." पाटलाने त्याना सांगितले.
"व्हय.... व्हय..." सगळ्या गावकऱ्यातून गलका झाला. पुन्हा एकदा वावांचा जयजयकार. आता वावाला स्फुरण चढले. तो पुढे बोलू लागला,
"ठिक हाये, तुमास्नी मंजूर असेल तर सांगतू, पाटील तुमचे धनी हायत, पाटलाची हिर हिच गावची सगल्यात मोटी हिर हाये, तवा आधी ती भराया पायजे बरोबर नव्हं?
"व्हय,,, व्हय है वरुवर हाय" सगळ्या गावकऱ्यांच्या तोंडातून आवाज आला.
"त्येच्या हिरीला पानी लागलं, म्हंजे तुमास्नीगी मिळेलच ना, पर......" पुन्हा एकदा गावा अडखळला.
"पर पर काय सांगून टाका बाबा" सावकार पुन्हा बोलला.
"पर देव म्हनतो, पाटलाच्या हिरीला बळी पायजे, नवाच पाऊस येऊन न्हायील " बावाने उपाय सांगितला.
"हात्तीच्या इतकच ना, मंग देऊ की एक बोकड कापून वळी गावातला खाटीक बोलला.
"हम्म्म्म, न्हाई र न्हाई, त्या हिरीला बोकड नगया, " बाबा पुन्हा बोलला
"मंग?" तोंडाचा चंबू करतच पाटलानं विचारलं.
"अरं लेकरा, तिला बोकडाचा बळी नकोय, तिला हवेय बाईचा बळी" वागांचे हे वाक्य ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. एकदम तणावग्रस्त झालेले चेहरे एकमेकांकडे पाहू लागले.
"हां.... पर बाईचा म्हंजी कंवार पोरीचा पायजे, जी लगनाच्या वयाशी हाये पर अजुन पाट लागला न्हाई अश्या पोरीचा पायजे, जिचा चेहरा गोड हाये, जिचे डोलं काळे हायेत. अगदी अक्ष्याच पोरीचा वळी पायजे तिला." वावाने अजुन एक फुसूंगळी सोडली.
लेखिका - अश्विनी
"दुर दूखर जिथवर नजर जातीया, अगदी जिथं आभाळ धरतीचे चुंबन घ्याया झुकलंय, जिथं आभाळ धरतीमातेचं स्तन गोंजाराया तिला चिकटलय त्या डोंगरापतुर, जिथं गी बघाल थितं जिमीनीला पडलेलं तडं दिसत व्हतं, समदं वसाड दिसत व्हतं, एकत्री हिरवंच काय पर पिवळं पानवी झाडावर दिसत नव्हतं. म्होरल्या वर्साला देवाच्या किरपेनं पानी बरसंल तर, हो जिमीनीचं तडं वी भरलं जातील, हिरवा चुडा घालून हिरवा शालू नेसून ही धरती पुन्यांदा नव्या नवरीसारखी सजल, पर....,"
"पर माज्या पोरिच्या आत्रुला गेलेलं तडं कोन बुजवनार? तिच्या अंगावर कोन हिखा शालु पांघरतार? कोन तिला हिरवा चुडा घालाया देनार? कोन गोळा करनार तिच्या आब्रुची लक्तरं गावच्या येशीवरून ?, कोन....? सांगा कोन...... व्य माज्या मनाच्या हिरीत खुप काही दडलंय, म्या पायलेत माज्या पोरीच्या अबुला गेलेले नडे, म्या पायलीत माज्या पोरिच्या कापडांची लक्तरे, समद्यासमोर घडलं हो पर..... कोनी वी न्हाई आलं मदतीला.... आई मा
होय, तिच्या मनाच्या विहीरीत खुप काही दडलंय असेच मला वाटत होते. तिच्या डोळ्यातली आसवं माझे काळीज पिळवटून काढत होती. तिची दुख भरी कहाणी माझ्या हृदयाला छिद्र पाडत होती. ती बोलत होती. तिच्या ग्रामीण भाषेतच मला ती सांगत होती. (इथे मी ती कथा आपल्याला उमजेल अश्या भाषेत लिहीत आहे. मधे जिथे त्या ग्रामीण भाषेची गरज लागेल तिथे त्याच ग्रामीणशैलीत सांगेन )
१९५६ चे वर्ष होते ते. १९५५चा पावसाळा कोरडा गेला होता. अखंड वर्षात कुठेही पाण्याचे टिपूसदेखील पडले नव्हते. विहिरींमधे स्वतः चे प्रतिबिंब बघता येईल येवढेही पाणी नव्हते. जमीन पुर्ण कोरडीहोती. गावात पक्षी तर नावालाही शिल्लक नव्हते. होते ते बैल, गायी विकून सर्व गावकरी घर चालवत होते. दुष्काळानी सगळीकडे हाऽहाऽकार माजवला होता. शक्य होते तेवढे पाणी सरकार टँकरने पुखायचा प्रयत्न करत होते. दोन, तीन दिवसातून येणारा एक टँकर कितीसा पुरणार होता गावाला.
अखंड वर्ष असेच गेले होते. १९५६ हे साल तरी सर्वाना दिलासा देईल याची आशा होती. पण छे !!! नियतीला ते मंजूर नव्हते. तमाम मानवाचा घास गिळायचा होता तिला. तसाच काहीसा खेळ नियती खेळत होती. १९५६चा सप्टेंबर अर्ध्याहून अधिक संपला होता. पावसानी पुन्हा हुलकावणी दिली होती. सलग दोन वर्षे दुष्काळ म्हणजे काय असतो आम्हालाच विचारा. आम्ही काढलेन ते दिवस पाहीलाय नियतीचा प्रकोप, या सृष्टीचा प्रकोप, पाण्याच्या अभावाने जो हाहाकार झाला तो आम्ही या डोळ्यांनी पाहीलाय.
गावात जनावरे कृश झाली होती, जी तगड़ी होती ती सावकाराने आणि पाटलाने लाटली होती. जमिनी सावकार गिळंकृत करत होता, पाटील खदा खदा हसत होता. लोकांचे, प्रजेचे होणारे हाल पाहून जो हसेल तो राजा कसला. पण कुणाला कळणार होते ते. पोटाचे आधी बघायचे की पाटलाचे हा प्रश्न मनात घेऊनच जो तो जगत होता. भिक मागायला सावकाराकडे नाहीतर पाटलाकडे जात होता. हातावर शेरभर धान्य ठेवून त्याची एकरो जमिन सावकाराच्या घशात जात होती. कोण येणार होते हे बघायला? कोण थांबवणार होते है ? ज्याला त्याला स्वत: ची चिंता सतावत होती.
एकच पुरुष उभा राहीला ज्याने सावकाराला आणि पाटलाला जाब विचारला. तो म्हणजे माझा दादला (नवरा) कोणासाठी? गावकऱ्यांसाठी त्यांच्या भल्यासाठी काय मिळाले त्याला? काय दिले यांनी त्याला ? गावकऱ्यांनी त्यांच्या भल्यासाठी लढणाऱ्याला काय फळ दिले माहितेय? सांगते ऐक वार्ड
सप्टेंबरमधे गावच्या देवीची जत्रा असते पण त्या वर्षी ती जत्रा झाली नाही. कारण सर्वत्र पडलेला दुष्काळ. त्याच सुमारास गावदेवीच्या देवळात एक साधूवावा आले होते. त्यांचे नाव मला आठवत नाही, हां पण त्यांना सगळे साधूवावाच म्हणायचे. भगवी कफनी नेसलेली, एका हातात कमंडलू आणि दुसऱ्यात दंड घेऊन देवीच्या देवळाबाहेर
ध्यानस्थ बसलेले साधूवावा गावकऱ्यांना मोहीत करत होते. गावकरीही त्यांच्याकडे आकृष्ट होत होते. सगळ्यांची दुखभरी कहाणी एकच होती.
"देवा, पान्यावाचून अवाळ व्हतेय, तवा पावसाला आनाच "
"मागल्या वर्साला पावसानी दगा दिलाय, या वर्साला वी आतापतुर पान्याचा टिपूस न्हाय आलेला, तवा फुडं काय व्हनार ते सांगा?"
सगळ्यांचे प्रश्न सारखेच होते. साधुवावा शांत चित्ताने ऐकत होते. मधेच आपली दाढी कुरवाळत हसत होते. मधेच काहीतरी पुटपुटत होते. शेवटी सगळ्यांचे प्रश्न ऐकल्यावर ते म्हणाले,
"वालकांनो, उद्याच्याला या.... मी रातच्याला देवासंगत बोलून घेतू आनि मंग उद्या तुमास्नी यावर उपाय सांगतू "
त्यांच्या या बोलण्याने खुश झालेले गावकरी साधूबावांचा जयजयकार करत आपापल्या घरी गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच देवळाबाहेर गर्दी जमली होती. सर्वाना हवा होता पाऊस, पाणी आणि त्यासाठी साधुवावा काय उपाय सांगतील तो करायची सर्वांची मानसिक तयारी होती. पण संध्याकाळचे ५ वाजले तरी वाया देवळातून बाहेर आले नाहीत. एक दोघांनी डोकावून पाहीले. बाबा समाधिस्त होते. सगळे गावकरी उपाशीपोटी बाहेर ओसरीवर बाबांची वाट पहात होते. अखेर तो क्षण समीप आला. बाबा समाधीतून उठले. त्यानी उठून देवीला दिवा लावला. बाबा उठलेले पाहताच गावकऱ्यांच्या जीवात जीव आला.
सगळेजण आदवीने उभे राहीले. इतक्यात पाटील आणि सावकारपण गाडीतून तिथे आले. सर्व गावकऱ्यानी त्यांना जागा करून दिली, पुढे जाण्यासाठी. वात्रा गाभाऱ्याच्या दरवाजातच स्थानापन्न झाले. पाटलानी आणलेल्या फळांच्या टोपलीतले एक फळ उचलून त्यानी देवीला नैवेद्य दाखवला. बाकीची टोपली गावकऱ्यात वाटून टाकली. गावकऱ्यांच्या मनात वावाबद्दलची श्रद्धा अजूनच दृढ झाली.
तेव्हा माझा दादला शहराकडे गेला होता. गावकऱ्यांना जास्तीचे पाणी मिळावे यासाठी सरकारदरबारी तो खेटा घालायचा त्याच कामासाठी तो गेला होता. मी आणि सुलू, माझी लेक, सुलक्षणा नाव तिचे. आम्ही दोघीनी त्यांच्यात उभे होतो. जे घडेल ते पाहत होतो. सगळ्या गावकऱ्यांनी वावाचा जयघोष केला. पाटलाचा आणि सावकाराचाही त्यांच्याशिवाय गावाला कोण तारणार होते नाही तरी कसेही असले तरी ते गावकऱ्यांसाठी देवासमान होते. पाटलानी वावांना विचारले,
"बाबा, काय झाले? काय म्हनला देव तुमास्नी? यंदाच्या हंगामाला पाऊस पडल नव्हं?"
बावांचा चेहरा खित्र होता. खिन्न चेहऱ्यानीच वावा हसले. पण काहीच बोलले नाहीत. तेव्हा सावकार बोलला,
"सांगा बाबा, सांगा काय उपाय बोलला देव ?"
सावकारानी अक्षरश: लोटांगण घातले गावाला. त्याला उठवतच वाषा बोलू लागले,
"मी रातच्याला देवासंगट बोललू, त्यानी उपायवी सांगितला. पर....." इथेच बाबाची सुई अटकली.
"पर..., पर काय जावा. सांगा तुमी जो कायबी उपाय असेल तो कराया समदे लोग तयार हायेत." पाटलाने त्याना सांगितले.
"व्हय.... व्हय..." सगळ्या गावकऱ्यातून गलका झाला. पुन्हा एकदा वावांचा जयजयकार. आता वावाला स्फुरण चढले. तो पुढे बोलू लागला,
"ठिक हाये, तुमास्नी मंजूर असेल तर सांगतू, पाटील तुमचे धनी हायत, पाटलाची हिर हिच गावची सगल्यात मोटी हिर हाये, तवा आधी ती भराया पायजे बरोबर नव्हं?
"व्हय,,, व्हय है वरुवर हाय" सगळ्या गावकऱ्यांच्या तोंडातून आवाज आला.
"त्येच्या हिरीला पानी लागलं, म्हंजे तुमास्नीगी मिळेलच ना, पर......" पुन्हा एकदा गावा अडखळला.
"पर पर काय सांगून टाका बाबा" सावकार पुन्हा बोलला.
"पर देव म्हनतो, पाटलाच्या हिरीला बळी पायजे, नवाच पाऊस येऊन न्हायील " बावाने उपाय सांगितला.
"हात्तीच्या इतकच ना, मंग देऊ की एक बोकड कापून वळी गावातला खाटीक बोलला.
"हम्म्म्म, न्हाई र न्हाई, त्या हिरीला बोकड नगया, " बाबा पुन्हा बोलला
"मंग?" तोंडाचा चंबू करतच पाटलानं विचारलं.
"अरं लेकरा, तिला बोकडाचा बळी नकोय, तिला हवेय बाईचा बळी" वागांचे हे वाक्य ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. एकदम तणावग्रस्त झालेले चेहरे एकमेकांकडे पाहू लागले.
"हां.... पर बाईचा म्हंजी कंवार पोरीचा पायजे, जी लगनाच्या वयाशी हाये पर अजुन पाट लागला न्हाई अश्या पोरीचा पायजे, जिचा चेहरा गोड हाये, जिचे डोलं काळे हायेत. अगदी अक्ष्याच पोरीचा वळी पायजे तिला." वावाने अजुन एक फुसूंगळी सोडली.