S
StoryPublisher
Guest
तृप्ती
रोजप्रमाणे त्याचा पोफळीतल्या टपरीच्या बाजूला दोन स्टूल घेऊन चहा आणि सिगारेटचा कार्यक्रम चालू होता.
शांत व स्वच्छ समुद्रकिनाऱ्यामुळे आणि घण्टेश्वराच्या टुमदार मंदिरामुळे गावात पर्यटकांची संख्या जरी वाढू लागली असली तरी तसं गाव मागासलेलंच होतं. शहरात मोठ्या हॉटेलांमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी करून चांगला पैसा कमावून एक छोटेखानी पर्यटक निवास त्याने इथे चालू केला होता.
उत्पन्न खूप नसले तरी त्याचं बरं चाललं होतं. तो गावात हळूहळू सुधारणाही करू लागला होता. सुशिक्षित, शहरात राहून आलेला आणि इतरांच्या मानाने बराच सधन असल्यामुळे गावात त्याला बऱ्यापैकी मान होता.
सकाळी सात वाजल्यापासून ते साडेदहा अकरा पर्यंत तिथे गावातल्या लोकांशी उगाच गप्पा मारायला बसत असे आणि चहा आणि सिगरेट ओढत असे. येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना जवळपास असणाऱ्या पण जास्त प्रसिद्ध नसणाऱ्या पर्यटन स्थळांची माहितीही देत असे. त्याच्या पेहराव व एकूणच व्यक्तीमत्वामुळे तो या गावातील नाही हे पाहताक्षणी कळायचं!
आजही नेहमीप्रमाणे त्याचा सकाळचा कार्यक्रम चालू होता. तेवढ्यात एक मोठा टेम्पो येऊन टपरीसमोर थांबला. समोरून उतरून एक म्हातारे काका त्याच्या जवळ आले.
“भय्या! ते जेट्टीला जायचा रस्ता कोणता आहे? आम्ही दुरून आलोय. ड्राइवरला रस्ते माहीत नाहीत. रात्रभर जंगलातुन फिरतोय.” काका बोलले.
“ह्या रस्त्याने पुढे गाव लागेपर्यंत सरळ जा, गावातल्या चौकातून डावीकडे वळा आणि खाडी ओलांडली की पुन्हा पहिल्या उजव्या रस्त्याने सरळ जा! जेट्टीला जातो तो रस्ता!” तो
“गावं खूप लहान आहेत इथली. इथे अंघोळी व नाश्त्याची सोय कुठे असेल?” काका
“हा बाबूस बनवून देईल नाश्ता तुम्हाला. तिकडे थोडं पुढे घंटेश्वराचं मन्दिर आहे, तिथे हवं तर आराम करू शकता. बाजूच्या कुंडात पुरुषांना अंघोळी करता येतील. साबण लावू नका फक्त.” तो
“लेडीजपण आहेत!”
त्यांची काय सोय असं बहुधा त्यांना विचारायचं असावं.
“माझा यात्री निवास आहे तिथे पलीकडे मग सगळेच तिथे अंघोळी वगैरे करू शकता. नाश्ताही होऊ शकेल तिथेच. किनाऱ्यावर एक हॉल आहे. तुम्ही थकलेले दिसता. दुपारपर्यंत आराम करून पुढे निघालात तरी होईल! ड्रायव्हरलाही आराम हवा. रात्रभर गाडी चालवलीय म्हणताय तुम्ही.” तो
“एक मिनिट,” म्हणून काका टेम्पोकडे गेले.
टेम्पोच्या मागे जाऊन त्यांनी आतमधील कुणालातरी काहीतरी विचारले.
“सगळेच खूप कंटाळलेत. सगळेच आराम करूच असं म्हणतायत. तुमचे चार्जेस कसे आहेत?” काकांनी परत येऊन त्याला विचारले.
“किती लोक आहात तुम्ही?” तो
“ड्राइवर धरून तेवीस जण आहोतं. लहान मुलं सहा म्हणजे एकूण तीसेक जण!” काका
“अंघोळी वगैरेचे पैसे नाही घेणार, हॉलच भाडं तीनशे रुपये होईल उद्या सकाळ पर्यंतच आणि नाश्त्याचे प्रति माणूस पंचवीस रुपये होतील. पुरीभाजी किंवा पोहे सांबार मिळेल!” तो
“एक मीनीट!” ते पुन्हा टेम्पोच्या मागे गेले.
आता एक तिशीतला तरुण उतरून त्यांच्यासोबत आला.
“नमस्ते! मी राजेंद्र शेट्ये!” तो तरुण म्हणाला.
“नमस्ते,” तो
“इथे आजूबाजूस काही पाहण्यासारखे आहे का? असतं तर मुक्कामच केला असता!” राजेंद्र
“आहे तिकडे लाईटहाऊस आहे, मंदिरात आज नेमकं शिमगोत्सव आहे पाहण्यासारखा असतो. किनाऱ्यावर पलीकडे शिवकालीन छुप्या गुहा आहेत. थोड्या वेळाने किनाऱ्यावर जेट स्की वगैरेही चालू होतं! दुपारपर्यंत आराम केलात तर रात्रीपर्यंत तुम्हाला बरंच काही पाहता येईल.” तो
“ठीक आहे मग आम्ही उद्या सकाळीच निघू,” राजेंद्र
“नो प्रॉब्लेम पण हॉलचं भाडं हजार रुपये पडेल आणि एक वेळचं एका माणसाचं जेवण नव्वद रुपये.” तो
“एकूण किती होतात?” राजेंद्र
“दोन वेळचं जेवण एक नाश्ता आणि हॉलभाडे मिळून सात हजार शंभर होतात तीस जणांचे. एक हजार डिस्काउंट. सहा हजार होतील!” तो
“चालेल!” तो लगेच तयार झाला.
“चला ड्रायव्हरला माझे मागे यायला सांगा. रस्ता थोडा अरुंद आहे. सांभाळून!” असं म्हणत तो उठला. पायाखाली सिगारेट विझवत त्याने हेल्मेट चढवले.
“तुम्ही बसा माझ्या गाडीवरच!” राजेंद्रला सांगत तो त्याच्या बुलेटवर बसला.
काका टेम्पोत बसले. पुढे त्याची बुलेट आणि टेम्पो त्याच्यामागे निघाला. साळीच्या शेतांतून, पोफळी नारळीच्या बागांतून वळणावळणाच्या रस्त्याने ते समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या त्याच्या पर्यटक निवासवर पोचले. ते पोचताच बापू त्याचा मॅनेजर कम कूक कम रिसेप्शनसिस्ट धावत आला.
“बापू तीस लोक आहेत. अंघोळी करायच्या आहेत कॉमन बाथरूमची कुलुपं काढ. त्यांच्या अंघोळी होईपर्यंत हॉल झाडून गाद्या टाक आणि पुरीभाजी किंवा पोहे सांबरं करायला घे. पटापट उरक, सरुला हाक मर हवं तर! लवकर उरक!” तो
“मोटरची चावी द्या साहेब, टाकीत पाणी कमी आहे.” बापू
“लवकर! लवक्कर!” तो त्याच्याकडे चावी फेकत बोलला.
चावी झेलून तो पळाला.
रोजप्रमाणे त्याचा पोफळीतल्या टपरीच्या बाजूला दोन स्टूल घेऊन चहा आणि सिगारेटचा कार्यक्रम चालू होता.
शांत व स्वच्छ समुद्रकिनाऱ्यामुळे आणि घण्टेश्वराच्या टुमदार मंदिरामुळे गावात पर्यटकांची संख्या जरी वाढू लागली असली तरी तसं गाव मागासलेलंच होतं. शहरात मोठ्या हॉटेलांमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी करून चांगला पैसा कमावून एक छोटेखानी पर्यटक निवास त्याने इथे चालू केला होता.
उत्पन्न खूप नसले तरी त्याचं बरं चाललं होतं. तो गावात हळूहळू सुधारणाही करू लागला होता. सुशिक्षित, शहरात राहून आलेला आणि इतरांच्या मानाने बराच सधन असल्यामुळे गावात त्याला बऱ्यापैकी मान होता.
सकाळी सात वाजल्यापासून ते साडेदहा अकरा पर्यंत तिथे गावातल्या लोकांशी उगाच गप्पा मारायला बसत असे आणि चहा आणि सिगरेट ओढत असे. येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना जवळपास असणाऱ्या पण जास्त प्रसिद्ध नसणाऱ्या पर्यटन स्थळांची माहितीही देत असे. त्याच्या पेहराव व एकूणच व्यक्तीमत्वामुळे तो या गावातील नाही हे पाहताक्षणी कळायचं!
आजही नेहमीप्रमाणे त्याचा सकाळचा कार्यक्रम चालू होता. तेवढ्यात एक मोठा टेम्पो येऊन टपरीसमोर थांबला. समोरून उतरून एक म्हातारे काका त्याच्या जवळ आले.
“भय्या! ते जेट्टीला जायचा रस्ता कोणता आहे? आम्ही दुरून आलोय. ड्राइवरला रस्ते माहीत नाहीत. रात्रभर जंगलातुन फिरतोय.” काका बोलले.
“ह्या रस्त्याने पुढे गाव लागेपर्यंत सरळ जा, गावातल्या चौकातून डावीकडे वळा आणि खाडी ओलांडली की पुन्हा पहिल्या उजव्या रस्त्याने सरळ जा! जेट्टीला जातो तो रस्ता!” तो
“गावं खूप लहान आहेत इथली. इथे अंघोळी व नाश्त्याची सोय कुठे असेल?” काका
“हा बाबूस बनवून देईल नाश्ता तुम्हाला. तिकडे थोडं पुढे घंटेश्वराचं मन्दिर आहे, तिथे हवं तर आराम करू शकता. बाजूच्या कुंडात पुरुषांना अंघोळी करता येतील. साबण लावू नका फक्त.” तो
“लेडीजपण आहेत!”
त्यांची काय सोय असं बहुधा त्यांना विचारायचं असावं.
“माझा यात्री निवास आहे तिथे पलीकडे मग सगळेच तिथे अंघोळी वगैरे करू शकता. नाश्ताही होऊ शकेल तिथेच. किनाऱ्यावर एक हॉल आहे. तुम्ही थकलेले दिसता. दुपारपर्यंत आराम करून पुढे निघालात तरी होईल! ड्रायव्हरलाही आराम हवा. रात्रभर गाडी चालवलीय म्हणताय तुम्ही.” तो
“एक मिनिट,” म्हणून काका टेम्पोकडे गेले.
टेम्पोच्या मागे जाऊन त्यांनी आतमधील कुणालातरी काहीतरी विचारले.
“सगळेच खूप कंटाळलेत. सगळेच आराम करूच असं म्हणतायत. तुमचे चार्जेस कसे आहेत?” काकांनी परत येऊन त्याला विचारले.
“किती लोक आहात तुम्ही?” तो
“ड्राइवर धरून तेवीस जण आहोतं. लहान मुलं सहा म्हणजे एकूण तीसेक जण!” काका
“अंघोळी वगैरेचे पैसे नाही घेणार, हॉलच भाडं तीनशे रुपये होईल उद्या सकाळ पर्यंतच आणि नाश्त्याचे प्रति माणूस पंचवीस रुपये होतील. पुरीभाजी किंवा पोहे सांबार मिळेल!” तो
“एक मीनीट!” ते पुन्हा टेम्पोच्या मागे गेले.
आता एक तिशीतला तरुण उतरून त्यांच्यासोबत आला.
“नमस्ते! मी राजेंद्र शेट्ये!” तो तरुण म्हणाला.
“नमस्ते,” तो
“इथे आजूबाजूस काही पाहण्यासारखे आहे का? असतं तर मुक्कामच केला असता!” राजेंद्र
“आहे तिकडे लाईटहाऊस आहे, मंदिरात आज नेमकं शिमगोत्सव आहे पाहण्यासारखा असतो. किनाऱ्यावर पलीकडे शिवकालीन छुप्या गुहा आहेत. थोड्या वेळाने किनाऱ्यावर जेट स्की वगैरेही चालू होतं! दुपारपर्यंत आराम केलात तर रात्रीपर्यंत तुम्हाला बरंच काही पाहता येईल.” तो
“ठीक आहे मग आम्ही उद्या सकाळीच निघू,” राजेंद्र
“नो प्रॉब्लेम पण हॉलचं भाडं हजार रुपये पडेल आणि एक वेळचं एका माणसाचं जेवण नव्वद रुपये.” तो
“एकूण किती होतात?” राजेंद्र
“दोन वेळचं जेवण एक नाश्ता आणि हॉलभाडे मिळून सात हजार शंभर होतात तीस जणांचे. एक हजार डिस्काउंट. सहा हजार होतील!” तो
“चालेल!” तो लगेच तयार झाला.
“चला ड्रायव्हरला माझे मागे यायला सांगा. रस्ता थोडा अरुंद आहे. सांभाळून!” असं म्हणत तो उठला. पायाखाली सिगारेट विझवत त्याने हेल्मेट चढवले.
“तुम्ही बसा माझ्या गाडीवरच!” राजेंद्रला सांगत तो त्याच्या बुलेटवर बसला.
काका टेम्पोत बसले. पुढे त्याची बुलेट आणि टेम्पो त्याच्यामागे निघाला. साळीच्या शेतांतून, पोफळी नारळीच्या बागांतून वळणावळणाच्या रस्त्याने ते समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या त्याच्या पर्यटक निवासवर पोचले. ते पोचताच बापू त्याचा मॅनेजर कम कूक कम रिसेप्शनसिस्ट धावत आला.
“बापू तीस लोक आहेत. अंघोळी करायच्या आहेत कॉमन बाथरूमची कुलुपं काढ. त्यांच्या अंघोळी होईपर्यंत हॉल झाडून गाद्या टाक आणि पुरीभाजी किंवा पोहे सांबरं करायला घे. पटापट उरक, सरुला हाक मर हवं तर! लवकर उरक!” तो
“मोटरची चावी द्या साहेब, टाकीत पाणी कमी आहे.” बापू
“लवकर! लवक्कर!” तो त्याच्याकडे चावी फेकत बोलला.
चावी झेलून तो पळाला.