S
StoryPublisher
Guest
परतीची वरात
Partichi Varaat
लेखिका- रेखा
काही दिवसांपूर्वी एकचोपिण्ण पाहिलीपु-धूमपर. त्मा सोफिममधूनच माकने बीम माझ्या डोक्याव पसे गेले... मर्मतरी याचना का पूर्ण करण्याच्या नावावी या मागे पडली होती. ही फिल्म बक्षर भारतातील पार्वभूमीवर जाधारिख होती... भामितिाना सर्व पाापी ना मराठमोळी ठेवली असून कसा नागपूर ते भोपामा पार्श्वभूमीवर लिहिली आहे
यात्रिगण कृपया ध्यान दे.. गाडी नंबर १८२३७ बिलासपूर-अमृतसर छत्तीसगढ़ एक्सप्रेस प्लेटफॉर्म नंबर तीन पर आ रही है यह गाडी भोपाल, ग्वालियर, हजरत निजामुद्दीन के रास्ते अमृतसर जायेगी....
.
.
गाडी येण्याची उद्घोषणा होताच प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर प्रवाशांच्या हालचाली सुरु झाल्या. रात्रीचे पावणे दहा वाजले होते... गाडी नियमित वेळेपेक्षा पंधरा मिनिटे उशिरा धावत होती. सर्व प्रवासी डिसप्ले बोर्डंबर फ्लॅश होत असलेल्या कोच क्रमांकानुसार उभे राहून गाडीची वाट पाहू लागले. नऊ बाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी प्लॅटफॉर्ममध्ये येऊन दाखल झाली. इंजिन बदलीसाठी गाडीचा थांबा बीस मिनिटांचा असल्याकारणाने सगळे आरामात चढत होते.
त्या गाडीने प्रवास करणाऱ्यांमध्ये एक लग्नाची बरातसुद्धा होती. नवरा मुलगा भोपाळचा तर नवरी नागपूरची. लग्न नागपुरात एका दिवसाआधीच पार पडले होते. थोडा दूरचा प्रवास असल्याकारणाने फिरतीची बरात लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जायचे आधीच ठरले होते... यामुळे नवरदेवाकडची खास दहा बारा मंडळी आज ह्या गाडीने जात होते. मुलीच्या वडिलांनी शर्थीचे प्रयत्न करून सगळ्यांना फर्स्ट क्लास एसीमध्ये पाठवायचे ठरवले पण त्यांना फर्स्ट क्लासचे केवळ दोनच कूप मिळू शकले... पैकी एका कूपमध्ये नवरी नवरदेव आणि दुसऱ्यामध्ये नवरदेवाचे आईवडील... आणि उरलेल्या सहा जणांसाठी सेकण्ड क्लास एसीचे तिकीट मिळाले.
ट्रेन येऊन पंधरा मिनिटे झाली होती... पाच मिनिटांनी गाडी सुटणार होती.. घागरा, चोळी आणि डोळ्यावर चुनरीचे आवरण... त्या आवरणाखाली तिचा चेहरा पूर्णपणे झाकला होता. नवरदेवसुद्धा शेरवानी घालूनच होता... त्याचा चेहरासुद्धा फेल्यावरील बाशिंगाने जवळपास झाकलेलाच होता. आपले अभू आवरत नबरी आपल्या आप्तेष्टांची भेट घेत होती... आई-वडील, बहीण-भाऊ अश्शू गाळून मुलीला बिदा करत होते... इंजिने शिटी वाजवली तशी नवरी मुलगी डोळे पुसतच डब्यात शिरली तशी गाडी सुटली... नवरदेव दारात उभा राहून सगळ्यांना हात हलवत निरोप देत होता.
ती आपल्या सीटवर येऊन बसली... नवरा मुलगा अजूनही आला नव्हता... बहुतेक सेकण्ड एसीमध्ये मित्रांशी बोलत बसला असावा. तिच्या मनात नवजीवनाच्या आशा होत्या... काही कल्पना होत्या... नबरा, सासूसासरे... आणि इतर मंडळी कसे असतील?... त्यांचा स्वभाव कसा असेल? ह्या सगळ्यांचा विचार करतच ती खिडकीजबळ जाऊन बसली.
लग्नाच्या धावपळीत ती पार थकून चूर झाली होती... शिवाय रिती-परंपरेनुसार तीने दोन दिवसापासून आपल्या चेहऱ्यावरून तो पदर हटवला नव्हता... समाजाच्या ज्या कोपऱ्यातून ती येत होती त्या कोपऱ्यात मुलगा आणि मुलगी लग्न होईपर्यंत एकमेकांना पाहू शकत नव्हते... मुलगी जेव्हा सासुरवाडीत जाईल तेव्हा पहिल्या समागमाच्या वेळीच ते एकमेकांना पाहू शकत होते... त्यामुळे तिने मुलाला आणि मुलाने तिला अजूनही पाहिले नव्हते किंवा एकमेकांशी बोलले सुद्धा नव्हते... आधुनिक भारतात अशा रूढी-परंपरा अजूनही सर्रासपणे चालतात.... अर्थात लग्न जुळायच्या आधी सासऱ्याने बगैरे तिला पाहिले होते... पण त्यांच्या सामाजिक प्रथेप्रमाणे नवरी-नबरदेवाने अजूनही एकमेकांना पाहिले नव्हते. त्यामुळे दोघांनाही आपल्या जोडीदाराविषयी काहीच कल्पना नव्हती.
तिच्या मनात भविष्यविषयीचेच विचार सुरु होते... आईबाबांवर विश्वास ठेऊन तिने ह्या लग्नास होकार दिला होता... करणार तरी काय?... कुंडलीत दोष असल्याने आधीच तिचे लग्नाचे वय निघून गेले होते... तिच्या जातीतील मुली एकवीस-बावीस वर्षांच्या होईपर्यंत एका बाळाच्या माता होऊन जायच्या... आणि हिने तर वयाची पंचविशी पार केली होती. तशी शिकली होती आणि लग्नाआधी नोकरी सुद्धा करायची पण समोर ती नोकरी करू शकेल की नाही याबाबत मात्र शंकाच होती. लग्न ठरतेवेळी तिच्या वडिलांनी नोकरीविषयी मुलाकडच्यांना विचारलेही नव्हते. लग्नाला इतका उशीर झाल्यानंतर त्यांना ह्या सर्व गोष्टींचा जणू विसरच पडला असावा...
"बाई... बाई... बाई... काय म्हणावं आमच्या व्याहीना?... म्हटलं विमानाचे तिकीट बुक करा... पण नाही...हे केले... ह्या बैलगाडीचे..." तिच्या सासूचा आवाज कानावर पडली तशी ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली आणि चुनरी नीट करत चेहरा झाकला. सासरकडची काही मंडळी तिच्या कूपमध्ये येऊन बसली. सासू, सासरे... आणि आणखी दोघेतिघे.
"अगं पण पहिल्या दर्जाची चार तिकिटे आणि दुसऱ्या दर्जाची सहा तिकिटे तर दिली... काय पाहिजे अजून?.." एक पुरुषी आवाज बोलला. बहुतेक सासरा असावा.
"म्हणे पहिला दर्जा ?... हैं... पहिला दर्जा?... मी आधीच म्हटलं नका करू या भागात लग्न पण ऐकतं माझं कोणी?... आणि जेवण तरी काय दिलं... ना धड मसाले ना धड स्वीट... काय म्हणावं बाई?... निघताना बाटलं काही महागडं गिफ्ट मिळेल... आयफोन नाही तर आणखी काही... पण काय दिलं?... एक साडी अन हे काचेच्या भांड्यांचे सेट... " सासूच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता.
"हो... हो आई... जेवणानंतर पिंटूला जुलाब झाले आणि माझं पोट अजनूही दुखतंय कालपासून..." पुन्हा एक पुरुषी आवाज तिच्या कानावर पडला.
Partichi Varaat
लेखिका- रेखा
काही दिवसांपूर्वी एकचोपिण्ण पाहिलीपु-धूमपर. त्मा सोफिममधूनच माकने बीम माझ्या डोक्याव पसे गेले... मर्मतरी याचना का पूर्ण करण्याच्या नावावी या मागे पडली होती. ही फिल्म बक्षर भारतातील पार्वभूमीवर जाधारिख होती... भामितिाना सर्व पाापी ना मराठमोळी ठेवली असून कसा नागपूर ते भोपामा पार्श्वभूमीवर लिहिली आहे
यात्रिगण कृपया ध्यान दे.. गाडी नंबर १८२३७ बिलासपूर-अमृतसर छत्तीसगढ़ एक्सप्रेस प्लेटफॉर्म नंबर तीन पर आ रही है यह गाडी भोपाल, ग्वालियर, हजरत निजामुद्दीन के रास्ते अमृतसर जायेगी....
.
.
गाडी येण्याची उद्घोषणा होताच प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर प्रवाशांच्या हालचाली सुरु झाल्या. रात्रीचे पावणे दहा वाजले होते... गाडी नियमित वेळेपेक्षा पंधरा मिनिटे उशिरा धावत होती. सर्व प्रवासी डिसप्ले बोर्डंबर फ्लॅश होत असलेल्या कोच क्रमांकानुसार उभे राहून गाडीची वाट पाहू लागले. नऊ बाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी प्लॅटफॉर्ममध्ये येऊन दाखल झाली. इंजिन बदलीसाठी गाडीचा थांबा बीस मिनिटांचा असल्याकारणाने सगळे आरामात चढत होते.
त्या गाडीने प्रवास करणाऱ्यांमध्ये एक लग्नाची बरातसुद्धा होती. नवरा मुलगा भोपाळचा तर नवरी नागपूरची. लग्न नागपुरात एका दिवसाआधीच पार पडले होते. थोडा दूरचा प्रवास असल्याकारणाने फिरतीची बरात लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जायचे आधीच ठरले होते... यामुळे नवरदेवाकडची खास दहा बारा मंडळी आज ह्या गाडीने जात होते. मुलीच्या वडिलांनी शर्थीचे प्रयत्न करून सगळ्यांना फर्स्ट क्लास एसीमध्ये पाठवायचे ठरवले पण त्यांना फर्स्ट क्लासचे केवळ दोनच कूप मिळू शकले... पैकी एका कूपमध्ये नवरी नवरदेव आणि दुसऱ्यामध्ये नवरदेवाचे आईवडील... आणि उरलेल्या सहा जणांसाठी सेकण्ड क्लास एसीचे तिकीट मिळाले.
ट्रेन येऊन पंधरा मिनिटे झाली होती... पाच मिनिटांनी गाडी सुटणार होती.. घागरा, चोळी आणि डोळ्यावर चुनरीचे आवरण... त्या आवरणाखाली तिचा चेहरा पूर्णपणे झाकला होता. नवरदेवसुद्धा शेरवानी घालूनच होता... त्याचा चेहरासुद्धा फेल्यावरील बाशिंगाने जवळपास झाकलेलाच होता. आपले अभू आवरत नबरी आपल्या आप्तेष्टांची भेट घेत होती... आई-वडील, बहीण-भाऊ अश्शू गाळून मुलीला बिदा करत होते... इंजिने शिटी वाजवली तशी नवरी मुलगी डोळे पुसतच डब्यात शिरली तशी गाडी सुटली... नवरदेव दारात उभा राहून सगळ्यांना हात हलवत निरोप देत होता.
ती आपल्या सीटवर येऊन बसली... नवरा मुलगा अजूनही आला नव्हता... बहुतेक सेकण्ड एसीमध्ये मित्रांशी बोलत बसला असावा. तिच्या मनात नवजीवनाच्या आशा होत्या... काही कल्पना होत्या... नबरा, सासूसासरे... आणि इतर मंडळी कसे असतील?... त्यांचा स्वभाव कसा असेल? ह्या सगळ्यांचा विचार करतच ती खिडकीजबळ जाऊन बसली.
लग्नाच्या धावपळीत ती पार थकून चूर झाली होती... शिवाय रिती-परंपरेनुसार तीने दोन दिवसापासून आपल्या चेहऱ्यावरून तो पदर हटवला नव्हता... समाजाच्या ज्या कोपऱ्यातून ती येत होती त्या कोपऱ्यात मुलगा आणि मुलगी लग्न होईपर्यंत एकमेकांना पाहू शकत नव्हते... मुलगी जेव्हा सासुरवाडीत जाईल तेव्हा पहिल्या समागमाच्या वेळीच ते एकमेकांना पाहू शकत होते... त्यामुळे तिने मुलाला आणि मुलाने तिला अजूनही पाहिले नव्हते किंवा एकमेकांशी बोलले सुद्धा नव्हते... आधुनिक भारतात अशा रूढी-परंपरा अजूनही सर्रासपणे चालतात.... अर्थात लग्न जुळायच्या आधी सासऱ्याने बगैरे तिला पाहिले होते... पण त्यांच्या सामाजिक प्रथेप्रमाणे नवरी-नबरदेवाने अजूनही एकमेकांना पाहिले नव्हते. त्यामुळे दोघांनाही आपल्या जोडीदाराविषयी काहीच कल्पना नव्हती.
तिच्या मनात भविष्यविषयीचेच विचार सुरु होते... आईबाबांवर विश्वास ठेऊन तिने ह्या लग्नास होकार दिला होता... करणार तरी काय?... कुंडलीत दोष असल्याने आधीच तिचे लग्नाचे वय निघून गेले होते... तिच्या जातीतील मुली एकवीस-बावीस वर्षांच्या होईपर्यंत एका बाळाच्या माता होऊन जायच्या... आणि हिने तर वयाची पंचविशी पार केली होती. तशी शिकली होती आणि लग्नाआधी नोकरी सुद्धा करायची पण समोर ती नोकरी करू शकेल की नाही याबाबत मात्र शंकाच होती. लग्न ठरतेवेळी तिच्या वडिलांनी नोकरीविषयी मुलाकडच्यांना विचारलेही नव्हते. लग्नाला इतका उशीर झाल्यानंतर त्यांना ह्या सर्व गोष्टींचा जणू विसरच पडला असावा...
"बाई... बाई... बाई... काय म्हणावं आमच्या व्याहीना?... म्हटलं विमानाचे तिकीट बुक करा... पण नाही...हे केले... ह्या बैलगाडीचे..." तिच्या सासूचा आवाज कानावर पडली तशी ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली आणि चुनरी नीट करत चेहरा झाकला. सासरकडची काही मंडळी तिच्या कूपमध्ये येऊन बसली. सासू, सासरे... आणि आणखी दोघेतिघे.
"अगं पण पहिल्या दर्जाची चार तिकिटे आणि दुसऱ्या दर्जाची सहा तिकिटे तर दिली... काय पाहिजे अजून?.." एक पुरुषी आवाज बोलला. बहुतेक सासरा असावा.
"म्हणे पहिला दर्जा ?... हैं... पहिला दर्जा?... मी आधीच म्हटलं नका करू या भागात लग्न पण ऐकतं माझं कोणी?... आणि जेवण तरी काय दिलं... ना धड मसाले ना धड स्वीट... काय म्हणावं बाई?... निघताना बाटलं काही महागडं गिफ्ट मिळेल... आयफोन नाही तर आणखी काही... पण काय दिलं?... एक साडी अन हे काचेच्या भांड्यांचे सेट... " सासूच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता.
"हो... हो आई... जेवणानंतर पिंटूला जुलाब झाले आणि माझं पोट अजनूही दुखतंय कालपासून..." पुन्हा एक पुरुषी आवाज तिच्या कानावर पडला.