• Hello Friends You can Register on the Forum and by posting you can earn money too.

वलय (कादंबरी)

  • Thread starter Thread starter StoryPublisher
  • Start date Start date
वलय - प्रकरण २०

राजेश मुंबईला जायला निघाला तेव्हा सुनंदा सुरुवातीला राजेशच्या आईसोबत गावातच थांबली कारण राजेशने बोरीवलीची रूम सोडून गोरेगांवला फिल्म सिटी जवळच घर शोधण्याचा निर्णय घेतला. सगळी व्यवस्था लावल्यानंतर तो मग तिला पुन्हा घ्यायला येणार होता. दरम्यान त्याने कोणतेही मेसेज चेक केले नाहीत कारण गावाकडे घडले ते सगळे त्याच्या मनाविरुद्ध होत होते आणि त्याचे मन त्याच्या ताब्यात नसल्यासारखे होते. त्याने जितेंद्रला तसेच इतर ज्यांच्यासाठी तो लिखाण करत होता त्यानाही थोडक्यात कॉल करून त्याला परत यायला उशीर होईल असे कळवले, मात्र लग्न झाल्याचे त्याने अजून कुणाला सांगितले नव्हते. नंतर त्याने एके दिवशी मुंबईची ट्रेन पकडली आणि निघाला - पुन्हा स्वप्ननगरी मुंबईत!

राजेश स्टेशनवर उतरला तेव्हा मुंबई तीच होती. तीच लोकलची जीवघेणी गर्दी आणि तेच ते एकामागून एक येणारे स्टेशन्स. समुद्रही तोच आणि तसाच ! कधी शांत तर कधी खवळलेला! दिवसरात्र धावणारे रस्ते. सगळे तेच होते. बदलले होते फक्त राजेशने आयुष्य! मुंबई सोडतांना सुप्रियाशी जाणूनबुजून केलेली ताटातूट आणि मग येतांना नको असलेल्या एका सोबतीचे ओझे. प्रत्यक्ष ती सोबत सोबतीला नव्हती पण मनावर असलेले ओझे होतेच!

राजेश चे दुसरे मन त्याला म्हणू लागले , "नाही राजेश! सुनंदाला तू हे जे ओझे मानतोस, ते चूक आहे. तू तुझी संमती दिली आहेस लग्नाला. मग तिला दोष देता कामा नये. काही गोष्टी आयुष्यात मनासारख्या होतात आणि काही मनासारख्या होत नाहीत. तू तर लेखक आहेस. तुला पूर्ण शक्य असूनही तुझ्या कथेतल्या पात्रांना तू त्यांच्या आणि तुझ्या मनासारखं भाग्य देतोस का? म्हणजे कल्पनेत सुद्धा तू तसे करत नाहीस मग हे खरे वास्तविक जग तर कल्पनेपेक्षा जास्त निर्दयी आहे."

बोरिवलीला रूमवर गेल्यावर दोन दिवस उदासवाणे गेले. मधूनच सुप्रियाची आठवण त्याच्या मन:पटलावरून तरळून गेली. ती कामानिमित्ताने सतत सोबत आणि जवळ होती. ती भेटायची तेव्हा त्याला असे काही प्रकर्षाने जाणवले नव्हते, पण आता ती अनेक दिवस भेटली नाही तेव्हा मात्र तीची आठवण येण्याचे प्रमाण वाढले. विशेषत: ब्रेकप झाल्यानंतर प्रथमच तो आतां मुंबईत आला होता त्यामुळे सुप्रियाची आठवण तीव्र व्हायला लागली.

तेव्हा राजेशने स्वत:ला बजावले, "नाही, राजेश. तुझे आता लग्न झाले आहे. सोड ते विचार!"

बोरिवलीची रूम सोडण्याआधी त्याने प्रथम जितेंद्र करमरकरची भेट घायचे ठरवले, मग इतर काही जणांना ज्यांच्यासाठी सुद्धा तो लिहित होता त्यांना तो भेटणार होता. पण जितेंद्र आठ दिवसांसाठी सुट्टीवर गेला होता. रोशन रोकडे पण भेटला नाही. मग आधी गोरेगांवला रूमची सेटलमेंट करून मगच आता सगळ्यांना भेटण्याचे त्याने ठरवले.

चार दिवसांत रूम शोधून झाली. पुढच्या काही दिवसांत सामान शिफ्ट झाला. त्याचे लेखन त्याने त्याच्या रेग्युलर सिरियल्सच्या निर्मात्यांकडे अगोदरच पाठवून ठेवल्याने ते लोक तसे निश्चिन्त होते. पण आता पुढच्या लेखनासाठी मात्र जास्त दिरंगाई झालेलीही चालणार नव्हती.

दरम्यान त्याच्या सिरियलच्या कामाने प्रभावित होऊन एका मराठी मालिका निर्मात्याकडून त्याला कथा, पटकथा आणि संवाद लेखनाची ऑफर आली पण ती मालिकेसाठी नसून मराठी चित्रपटासाठी होती. तो निर्माता सिरीयलनंतर आता आपले नशीब चित्रपट निर्मितीत आजमावून बघणार होता. त्यांनी चित्रपटाच्या विषयाबद्दल राजेशला कल्पना दिली होती आणि सविस्तर चर्चेसाठी प्रत्यक्ष भेटायला बोलावले होते. राजेशच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अधून मधून घरी कॉल करून तो आई आणि सुनंदाशी जुजबी बोलत होता. सुनंदाला मुंबईला आणायला थोडा उशीरच होणार होता. कारण आधी या निर्मात्याला भेटणे आवश्यक होते कारण अशी संधी पुन्हा येणार नव्हती.

निर्मात्याचे नाव होते - समीरण देवधर! आतापर्यंत चार यशस्वी मालिका टीव्ही जगताला देणारे! चारही मालिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं होतं. टिपिकल गल्लाभरू सासू सुनेच्या ड्रामेबाजीपासून ते नेहमी दूरच राहिले होते. त्यांच्या चारही मालिका अगदी वेगवेगळ्या विषयांवर आधारित होत्या. त्यांच्या सगळ्यात पहिल्या मालिकेसाठी राजेशने संवाद लेखन केले होते.

समीरणने त्याला घरी भेटायला बोलावले होते. प्रथमच तो समीरणला घरी भेटायला जाणार होता. समीरण आरे रोड जवळ, आरे गार्डन रेस्टॉरंट जवळ असलेल्या "सुरभी" हौसिंग सोसायटीत रहात होता. आसपास अनेक मराठी आणि गुजराती व्यावसायिक रहात असत. त्याच्या घरी पोहोचतांना राजेशच्या मनात सारखी एक कल्पना घोळत होती. समीरणला ती कल्पना मान्य होईल की नाही याबद्दल तो साशंक होता. पण त्याला पटवून सांगण्याची त्याने पूर्णपणे पूर्वतयारी केली होती. समीरणने मान्य केले तर दोघांचा फायदा होणार होता आणि….?

बेल वाजली. समीरण घरी एकटा होता. त्याची पत्नी जॉबनिमित्ताने बाहेर आणि मुलगा शाळेत गेलेला होता.
 
दरवाजा उघडत समीरण म्हणाला, "अरे ये ये राजेश. काय म्हणतोस? ये बैस!"

राजेश एका सोफ्यावर बसला. टीव्ही सुरु होता. थोड्या वेळाने किचन मधून दोन कॉफी कप हातात घेऊन समोरच्या सोफ्यावर समीरण बसला.

एक कप राजेशला देत समीरण म्हणाला, "घे कॉफी! बोल राजेश. कसा आहेस?"

राजेश कॉफी घेत कम्फर्टेबल झाला आणि म्हणाला, "हो समीरण! आणि मी ठीक आहे. फार कमी वेळेत बराच काही घडून गेलंय माझ्या आयुष्यात!

समीरण, "म्हणजे? कसे? काय घडले ते?"

राजेश, "लग्न करून आलोय मी गावाकडून येतांना!"

समीरण कॉफी कप बाजूला ठेवत म्हणाला, "ओह माय गॉड! इट्स अ गुड न्यूज! अभिनंदन!", आणि त्याने हात पुढे केला. राजेशने अभिनंदन स्वीकारले व म्हणाला, "धन्यवाद!"

मग जुजबी विचारपूस झाल्यावर समीरण मूळ मुद्द्यावर आला.

समीरण, "हे बघ राजेश. आज मराठी इंडस्ट्रीत नवनवीन विषय हाताळले जात आहेत. हरहुन्नरी कलाकार, लेखक दिग्दर्शक उदयाला येत आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षकांचा आश्रय जो कधी काळी मराठी चित्रपटांसाठी दुर्मिळ होता तोही आता मिळतोय. मल्टीप्लेक्स मध्येही मराठी चित्रपट हाउसफुल होत आहेत. अशा उमेदीच्या काळात अनेक निर्मात्यांना आणि दिग्दर्शकाना हुरूप न आला तर नवल!"

राजेश, "होय समीरण! बरोबर आहे तुमचे! भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके आज असते तर त्यांना खचितच खूप आनंद झाला असता. मध्यंतरी मराठी चित्रपट हळद, कुंकू, सासू सून, घरगुती भावनिक विषय अशा प्रकारच्या एकसूरी साच्यात अडकला होता. त्यातून आता तो समर्थपणे बाहेर पडलाय!"

समीरण, "आता कसे बरोबर बोललास! आज मराठी चित्रपट सगळ्या प्रकारचे आणि अगदी आजपर्यंत कधीही कुणीही स्पर्श न केलेल्या विषयांवर सुद्धा समर्थपणे चित्रपट काढतोय. अगदी अलीकडील काळापर्यंत मराठी टीव्ही जगतात सुद्धा फारसे आश्वासक चित्र नव्हते. पण आज इतके मराठी चॅनेल निघाले आहेत आणि ते यशस्वीपणे वाटचाल करत आहेत"

राजेश, "हो ना. खरे आहे! पण अजूनही काही मराठी सिरीयल मात्र सासू सुनेच्या घरगुती दळणात अडकून पडलीय! उलट पूर्वी दूरदर्शन वर २३ भागांच्या मालिकेचा ट्रेंड होता तो बरा होता. त्यावेळेस पण मालिकेत विविध विषय हाताळले जात असत! पण असे जरी असले तरी या इंडस्ट्रीत लेखक आणि पटकथा लेखक म्हणून टिकून राहाण्यासाठी अशा प्रकारच्या काही मालिकांसाठी मीही तेच करतोय. तेच ते सासू सुनेचे दळण! पण तसं पाहिलं तर तेही लिहिणं म्हणजे वाटतं तेवढं सोप काम नाहीये. रोज रोज प्रेक्षकांना कथेमध्ये काहीतरी वेगळं देऊन सिरीयलच्या पुढच्या भागाकरता गुंतवून ठेवणं तितकसं सोपं काम नाही. मोठ्या प्रमाणावर ज्या प्रकारच्या सिरीयल बनतात त्यांच्यासाठी लेखन करणं आवश्यक आहे, त्याशिवाय आमच्यासारख्या लेखकाचं पोट कसं भरणार?"

एव्हाना कॉफी संपली होती. समीरणने घरातील बाईला ताजा स्वादिष्ट स्वयंपाक बनवायच्या सुचना दिल्या.

समीरण हसत म्हणाला, "होय! तेही खरेच आहे. मलाही ते घरगुती विषयाचं जरा वावडंच आहे! बाकी काहीही असो पण पटकथा लेखनासोबतच तुझे संवाद लेखन फारच मस्त आहे बुवा! आपल्याला अगदी आवडलंय ते! आणि आता मी चित्रपट निर्मितीत उतरायचे म्हटल्यावर विषय तसे मुळीच नसणार आहेत. तर मला म्हणायचं आहे की माझेकडे दोन तीन विषय आहेत. दोन वर्षांच्या अंतरानंतर दोनेक चित्रपट काढायचा माझा विचार आहे. विषय मी सुचवणार. निर्मिती मी करणार. दिग्दर्शन सुद्धा मीच करणार आणि कथा, पटकथा आणि संवाद लेखनाची धुरा तू सांभाळायची. त्याचबरोबर चित्रपटाचे काही हक्क आणि नफ्यात हिस्सा सुद्धा देईन म्हणतो ते!"

राजेश, "धन्यवाद माझ्यावर एवढा विश्वास टाकल्याबद्दल. मी नक्कीच माझं सृजनशील लेखन सर्वस्व यात ओतणार यात वाद नाही! आजकाल अजूनही बरेच नवोदित लेखक या फिल्म इंडस्ट्रीत येण्यात धडपडत आहेत. बरेचदा त्यांच्या कथांची सपशेल चोरी होते आणी त्याचे क्रेडीट सुद्धा त्यांना दिले जात नाही! "

येतांना राजेशने मनात योजून ठेवलेली गोष्ट हळूहळू आता समीरण जवळ काढायची वेळ आली आहे हे राजेशच्या लक्षात आले.

समीरण, "होय अगदी खरे आहे. मराठीत सुद्धा हा प्रकार आहेच पण हिंदीत तर हे प्रकार फार वाढलेत. कायदे धाब्यावर बसवून काही लेखकांच्या कादंबऱ्या किंवा कथा संहिता डायरेक्टर लोक वाचतात, ऐकून घेतात, रिजेक्ट करतात आणि मग काही वर्षांनी त्यात थोडा फेरफार करून त्यावर चित्रपट काढतात आणि पुन्हा त्या मूळ लेखकांना धुडकावून लावत त्यांचे क्रेडीट स्वत:कडे घेतात!"

राजेश मनात म्हणाला, "समीरण अगदी मूळ मुद्द्यापर्यंत पोहोचलाय पण मी अजून माझ्यासोबत भूतकाळात घडलेले याला सांगणार नाही. त्याऐवजी मला भविष्यात काय करायचेय त्याबाबत एक पाऊल टाकायला समीरणची मला मदत घायची आहे. वेळ आली की समीरणला त्याबद्दल सांगता येईलच!"

समीरण, "कसल्या विचारांत गढून गेलास राजेश?"

राजेश, "नाही समीरण! तू जे आता म्हणालास ते अगदी योग्य आहे त्यावरच मी विचार करत होतो. बरं मी काय म्हणतो की माझी एक विनंती आहे"

समीरण, "काय विनंती आहे तुझी?"

राजेश, "सांगू की नको असे होत आहे!"

समीरण, "अरे बिनधास्त सांग. मला तुझा जवळचा मित्र समजून बिनधास्त सांग!"

राजेश, " मला असे सुचवावेसे वाटते की समीरण तू चित्रपट हिंदीत बनव! किंवा मी म्हणेन की पहिली चित्रपट निर्मिती तू हिंदीत करावीस. तू सुचवलेल्या विषयांपैकी एक विषय हिंदीत नवीन आहे. तेव्हा हिंदीत चित्रपट बनव!"

समीरण आश्चर्याने म्हणाला, "अरे काय सांगतोस राजेश हे? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.."

राजेश, "तू मला मित्र मनात असशील तर मी असा सल्ला देईन की जरी तू मराठीत अनेक मालिका यशस्वीरीत्या हाताळल्या आहेस तरी पहिली चित्रपट निर्मिती हिंदीत करावीस असे मला वाटते. अनेक हिंदी चित्रपट निर्माते दिग्दर्शक हे मराठी आहेत. त्यांनी सकस आणि दर्जेदार कथा असलेले हिट चित्रपट हिंदीत दिले आहेत. नंतर त्यांनी मराठीत सुद्धा यशस्वी चित्रपट निर्मिती केली आहे. आणि हिंदीतल्या काही चांगल्या लोकांशी तुझ्या ओळखी सुद्धा आहेत, त्या उपयोगी पडतील. आपण तुझ्या हिंदी चित्रपटात मराठी संगीतकराला आणी मराठी कलाकारांना संधी देऊ. त्यांना मोठं व्यासपीठ मिळेल. हिंदीत लोकांना आपण दाखवून देऊ की कथा चांगली आणि अभिनव असेल तर चित्रपट नक्की चालतो. त्याद्वारे सशक्त कथाकारांना आपण समोर आणू शकतो!"

समीरण बराच विचार करून म्हणाला, "हम्म! तुझा सल्ला आहे तसा मुद्द्याला धरूनच, पण मला थोडा वेळ दे! मी नक्की विचार करून सांगतो पण ...."

राजेश, "अगदी हवा तेवढा वेळ घे तू समीरण! शेवटी तुझा कोणताही निर्णय मला मान्य असेलच! मी लेखनासाठी सदैव तयार असेन!"

मग अवांतर गप्पा झाल्यानंतर जेवण तयार झाले होते. स्वादिष्ट जेवण खाल्ल्यानंतर समीरण कडून राजेश निघाला. त्याच्या मनात थोडी साशंकता होतीच की समीरण त्याचा हा प्रस्ताव स्वीकारेल की नाही त्याची! हरकत नाही पण अगदीच नकाराच्या भीतीपोटी प्रयत्नच न करण्यापेक्षा थोडा प्रयत्न त्याने करून बघितला होता. ही संधी तो स्वत: निर्माण करत होता. जर कदाचित संधीने हुलकावणी दिलीच तरी हरकत नव्हती. पुढे आणखी संधी नक्कीच येतील याबद्दल त्याला विश्वास होता. "नाहीतर मी संधी निर्माण करण्याचा पुन्हा प्रयत्न करेन!" राजेश मनात म्हणाला.

(क्रमशः)
 
वलय - प्रकरण २१

काही दिवसांनी गोरेगांच्या राजेशच्या रुमवर -

राजेश फोनवर बोलत होता -"जितेंद्र करमरकर साहेब कुठे गेला होतात? आम्ही आपली वाट बघत होतो. आतुरतेने!"

जितेंद्र - "वा वा वा! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते हेच का? आपण गावाकडे गेलात आणि गायब झालात. कॉल केले होते तेव्हा काही उत्तर नाही मिळाले. इकडे काय काय संकटे आली आम्हाला, काही कानावरून हवा गेली की नाही अजून?"

राजेश - "संकटं? कसली संकटं? तुझ्यासारखा माणसावर संकटं येण्याआधीच ती स्वत:च घाबरून पळून जाणार! अन म्हणे संकटं आली!"

जितेंद्र - " आरे मित्रा! एक तर त्या तुमच्या सुप्रिया मॅडम सिरीया सोडून गेल्या आणि …."

राजेश - "काय ? काय? काय बोललास? परत बोल एकदा? सुप्रियाने सिरीयल सोडली??"

जितेंद्र - "असा अंगावर पाल पडल्यासारखा काय दचकून बोलतो आहेस? जसे काही तुला माहितीच नाही?"

राजेश - "अरे नाही मित्रा! खरंच मला माहिती नाही. ए पण एक सांग! तू माझी खेचत तर नाही आहेस ना?"

जितेंद्र - "मित्रा! आता बास झाले. आता प्रत्यक्ष भेट, तेव्हाच बोलू. अनेक नवी कामे द्यायची आहेत तुला. त्याबद्द्ल सुद्धा सविस्तर बोलता येईल!"

फोन बंद झाल्यावर क्षणभर राजेशच्या पोटात धस्स झाले. सुप्रियाने सिरीयल सोडली? अशक्य!

ती तर म्हणाली होती की --

".... हे बघ राजेश. आपण एकाच क्षेत्रात आहोत. कामानिमित्त आपली भेट होतच राहाणार. सो लेट्स बी प्रोफेशनल! आपल्या वैयक्तिक गोष्टी कामाच्या आड येऊ द्यायच्या नाहीत. नाहीतर त्यामुळे दोघांचेही नुकसान होईल...."

राजेश विचार करता करता अस्वस्थ झाला. अचानक त्याला सुप्रियाबरोबरचे सोबत घालवलेले क्षण भले ते कमी काळाकरता का होईना ते आठवायला लागले.

आणि ती सोबत होती तेव्हा मात्र ....?

राजेशला तीला भेटावेसे वाटायला लागले. कुठे असेल ती? फोन करु का? होय! फोनच करतो तीला आता!

सुप्रियाला फोन करताच, "हा नंबर स्विच्ड ऑफ म्हणजेच बंद आहे." असा संदेश एक मंजूळ स्त्री आवाज राजेशला सांगू लागला.

"सुप्रियाने नंबर बदलला असावा बहुतेक!" राजेशचे हृदय त्याला सुचवू लागले.

"राजेश! अरे तू आता ब्रेकअप केले आहेस! आता तूला काय अधिकार आहे तीला कॉल करण्याचा?" राजेशची बुद्धी त्याला सांगू लागली.

"पण ती असे कसे करू शकते? मला तिला एकदा भेटायलाच हवे !" पुन्हा हृदय म्हणू लागले.

दोघांचे द्वंद्व असतांना राजेशच्या मोबाईलची रिंगटोन वाजली.

"सुनंदा कॉलिंग … " अशी अक्षरे स्क्रीन वर उमटू लागली.

"हा सुनंदा ब.. ब.. बोल!"

"तुमचा स्वर असा चिंतीत कसा वाटतो आहे? काही काळजी आहे का? मला सांगा?"

"न .. न .. नाही! सगळं ठीक आहे. व्यवस्थित आहे. पुढच्या आठवड्यात तुला आणि आईला घ्यायला येतोय मी!"

"मला किती किती आनंद झालाय म्हणून सांगू?," तिच्या स्वरातून आनंद ओसंडून वाहात होता.

जुजबी बोलून त्याने फोन ठेवला. सुप्रियाच्या बातमीमुळे त्याचे पुढचे प्लॅन तो विसरत चालला होता.

त्याचे हृदय गप्प बसले आणि बुद्धी सांगू लागली, "राजेश ! जितेंद्रला भेटायचे आहे. समीरणला भेटायचे आहे. स्क्रिप्ट लिहायच्या आहेत. तुझी महत्वाकांक्षा तुझ्याकडे मोठ्या अपेक्षेने बघते आहे की तू तिला नक्की न्याय देशील आणि तू अजूनही सुप्रियाच्या आठवणी काढतो आहेस? अरे सुनंदाला घेऊन ये, आई काही दिवस शहरात राहून गावी परत जाणार आहेच! मग आईची नेहेमीकरता यायची इच्छा असेल तर तिलाही नेहेमीकरता बोलावून घे. मग तुझी स्वप्ने पूर्ण कर! चल लाग कामाला! सोड त्या सुप्रियाची आठवण!"

काही काळ लोटला.

अधून मधून तो सारंग सोमैय्या सोबत फोन करून टच मध्ये होताच. सारंग आणि त्याची टिम सुद्धा अगदी राजेशच्या फ्रिक्वेन्सीशी जुळवून घेणारी होती. त्या टिमकडून राजेशला सामान्य नागरिकांची, फॅमिलिज्ची चित्रपटांविषयीची अनेक मतं आणि मतांतरं मिळण्यास मदत होत होती. त्याचा फायदा राजेशला चित्रपटांच्या कथा आणि परीक्षण लिहायला व्हायचा. ही टीम त्याचे पर्सनल ध्येय साध्य करायला त्याला मदत करणार होतीच पण या इंडस्ट्रीत त्या टिममधील अनेकांना त्यांच्या कुवतीप्रमाणे आणि लायकीप्रमाणे ब्रेक देऊन शक्य तेवढी परतफेड सुद्धा त्याला करायची होतीच.
 
वलय-प्रकरण 22

या सगळ्या घटनांदरम्यान सुप्रिया आणि रागिणी रूम सोडून गेल्यानंतर सोनीच्या दोन नवीन रुम पार्टनर्स झाल्या होत्या - एलेना एडवर्ड आणि नताशा दत्ता. सुप्रियाचा नंतर ठावठिकाणा न लागल्याने सोनीने तिला कॉल करणे सोडून दिले होते. सोशल साईटसवर सुद्धा सुप्रियाचे जुनेच अपडेट्स दिसत होते. पुण्याला जाणे झालेच तर मात्र तिने सुप्रियाला धावती भेट देण्याचे मनाशी ठरवले होतेच. रागिणी मात्र सोनीच्या संपर्कात होती. रागिणी तिच्या बॉयफ्रेंड सोबत हॅप्पी लाईफ जगत होती आणि सोनी "त्या" फोटो प्रकरणातून सावरली होती. तसे तिच्या दृष्टीकोनातून त्यामुळे तिचे फार काही फारसे नुकसान झाले नव्हते. पण नंतर तिला काही काळ कोणत्या डान्स कार्यक्रमाच्या ऑफर आल्या नाहीत, त्यामुळे निराश होती.

मग एके दिवशी अचानक आणि अनपेक्षितपणे "बिग आय बिग क्वेस्ट (Big Eye Big Quest)- मुझसे बचके कहां जाओगे?" नावाच्या मेगा रियालिटी शोची तिला ऑफर मिळाली. त्या शोच्या कास्टिंग डायरेक्टरने तिला त्याच्या ऑफिसमध्ये जेव्हा बोलावले होते तेव्हा त्याने तिला स्पष्टपणे संगितले होते:

"तुला मी एकाच कारणाकरता बेबक्यू (BEBQ) ची ऑफर देत आहे. ते कारण सांगण्याआधी ह्या शोबद्दल तुला सांगतो. या रियालिटी शोचा कॉन्सेप्ट वेगळा आहे. यात दहा अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक एका प्रायव्हेट रिसॉर्टवर वीस दिवसांकरता सोडले जातील. बाहेरच्या जगाशी संपर्क करण्याची कोणतीच साधने त्यांना दिली जाणार नाहीत, अनलेस देयर इज एनी इमरजेंसी! त्यांना एकमेकांशी जुळवून घ्यायचे आहे. त्यांना एक मिशन दिले जाईल. त्याचे नियम सांगण्यात येतील. त्यानुसार काही पॉईंट्स देण्यात येतील. शेवटच्या दिवशी फक्त तीन जण उरतील. एक विनर, दुसरा आणि तिसरा रनर्स अप!"

आयती संधी चालून आली होती. पण तिच्या मनात विचारचक्र सुरु झाले, "मला डान्सच्या क्षेत्रात पुढे जायचे आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून माझ्याकडे एकही काम नाही. आता हा शो आहे पण यात डान्स नाही, पण पैसा मिळेल. प्रसिद्धी मिळेल. एरवी मी मॅडम अॅकॅडमी आणि इतर संस्थांमध्ये डान्स शिकत राहाणारच आहे. या शोनंतर बघूया, एखादी डान्स संबंधित दुसरी ऑफर नक्की मिळेल. आता फक्त मिळेल ते काम आणि पैसा महत्वाचा आहे!"

"काय विचारात पडलाय मॅडम? "

"अं, काही नाही. सॉरी, सांगा तुम्ही! मी ऎकतेय!"

"तर मी सांगत होतो की तुम्हाला या शोमध्ये घेण्याचे मूळ कारण मी तुम्हाला सांगतो. या शोमध्ये डान्स क्षेत्रातली तूच एक व्यक्ती असणार आहे. यात तुला डान्सचा वापर करून क्रिएटिव्ह अंगप्रदर्शन करावे लागेल. क्रिएटिव्ह अंगप्रदर्शन म्हणजे माझ्या मते असे की, तू जाणूनबुजून तुझे शरीर दाखवत आहेस असे लोकांना आणि प्रेक्षकांना वाटता कामा नये, त्याऐवजी रियालिटी शोच्या फ्लो मध्ये किंवा ओघात आपोआप असे प्रसंग येतील (जे आपण मुद्दाम टाकू) त्यातून अपरिहार्यपणे तुझी बॉडी तू एक्स्पोज करायची जी कृत्रिम वाटायला नको! तुझी सेल्फी अजून काही लोकांच्या नक्की लक्षात आहे! अजूनही तुझ्या त्या चित्राला रोज गुगलवर सर्च केलं जातं! कळलं का तुला मला काय म्हणायचे आहे ते? सरळ हिशेब आहे! मान्य असेल तर अॅग्रीमेंट आणि सायनिंग अमाऊंटचा एक लाखाचा चेक आणलाय सोबत!"

विचारात गढून सोनी मनाशी म्हणाली, "सेल्फीमुळे जे नुकसान व्हायचं ते झालंय! मला सतत माझे "वलय" टिकवायचे असले तर तडजोड करावी लागेलच! चला सोनी मॅडम स्वीकारा ही ऑफर!"

मग ती निर्मात्याला म्हणाली, "तयार आहे. अट मान्य आहे!"

अंधेरीच्या ऑफिस मध्ये "बिग आय" शोच्या त्या कास्टिंग डायरेक्टरने (के. सचदेवा) तिची एग्रीमेंटवर सही घेतली. तिला सायनिंग अमाऊंटचा चेक दिला आणि त्याच्या ऑफिस मधून सोनी निघाली.
 
वलय-प्रकरण 23

"लुप्थांसा एयर्लाइन्स" च्या विमानात रात्री बारा वाजता मुंबईहून ते दोघे बसले होते. सुबोध केतगावकर आणि सुप्रिया सोंगाटे! अर्थात आता तीही केतगावकर झाली होती! सुबोध पुण्याचा पण इटलीच्या रोम शहरात त्याला परमानंट जॉब होता. रोम जवळ असलेल्या पोमेझीया शहरात एका कंपनीत तो "टेक्निकल कोऑर्डीनेटर" होता. आता रात्रीचे नऊ वाजत आले होते. विमान "दा व्हिन्सी" विमानतळावर उतरायला सज्ज झाले होते. तशी अनाउन्समेंट झाली होती.

सुप्रिया सुबोधसोबत इटलीला स्थायिक होणार होती. विमानतळावर नऊ वाजता उतरल्यानंतर त्यांनी सगळ्या सिक्योरिटी आणि डॉक्युमेंट संबंधित फॉरमॅलिटिज पूर्ण केल्या, बॅग्ज कलेक्ट केल्या आणि दोघे विमानतळाबाहेर पडले. मग थर्मल वियर घालून ते रोम शहरातून पोमेझीया पर्यंत प्रायव्हेट कॅबने गेले. नवा देश, नवे शहर! तिला रूळायला वेळ लागणार होता. पोमेझिया मध्ये "ला एशीयाना" नावाच्या एका एशियन हॉटेल मध्ये ते गेले. टेबलावर बसल्यानंतर प्रथम भारतात दोघांच्या पेरेंट्सना कॉन्फरन्स मध्ये घेऊन त्यांनी सुखरूप पोचल्याचे कळवले. मग त्यांनी सँडविच, कॉकटेल आणि पिझा मागवला. सततचा प्रवास आणि जेट लॅगमुळे दोघांनाही थकवा वाटत होता.

"काय मॅडम, कसं वाटलं आमचं रोम शहर?", सुबोध म्हणाला.

"अगदी छानच! आवडलं. निदान प्रथमदर्शनी तरी आवडलंच!", सुप्रिया म्हणाली.

"थंडी मात्र थोडी जास्तच आहे नाही का?", सुबोध ने विचारले.

"हो. एवढी बोचरी थंडी मी माझ्या आयुष्यात प्रथमच अनुभवते आहे!"

"बियर घेणार का थोडी? थंडीत आवश्यक असते म्हणून म्हटलं!"

"तू घे तुला हवी असेल तर! मी तर कधी घेतली नाहीए पण कधीतरी गरज वाटली तर घेईन सुद्धा, पण आता नको!"

"ठीक! नो प्रॉब्लेम! आय विल टेक वन! यु एंजॉय युर पिझ्झा विथ कॉकटेल!"

त्यांनतर बराच वेळ ते दोघे न बोलता खाण्यापिण्यात मग्न होते. कारण दोघांनाही चांगलीच भूक लागली होती.

अचानक काहीतरी आठवून सुबोध म्हणाला, "अगं हो! मी मागे तुला बोललो होतो ना, तो 'प्राईम प्रॉस्पेक्ट' या इंग्रजी टीव्ही सिरीयलमधला तुझा फेवरीट टेलिव्हिजन अॅक्टर ‘फ्रांको बोनुकी’ रोम मध्ये म्हणजे आपल्या येथून जवळच राहातो. लवकरच आपण जाऊ त्याचेकडे! माझा एक ऑफिसमधला सहकारी ओळखतो त्याला."

"सो नाईस ऑफ यू सुबोध फॉर रिमेंबरींग इट!" असे म्हणून तिने त्याच्या ओठांवर एक छोटासा किस केला.

मग ते दोघेजण "सांता प्रोक्युला" येथे असलेल्या सुबोधच्या स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये आले. आतमध्ये हिटर्सची गरमी दोघांना सुखावून गेली. लग्नानंतरचा हा दहावा दिवस होता. इटलीत जाऊनच मग पहिल्यांदा "हनीमून" साजरा करायचा म्हणजेच पहिला सेक्स इटलीत घरी पोहोचल्यावर करायचा असे दोघांनी ठरवले होते व त्यांनी ते पाळले होते. दोघेजण फ्रेश झाले आणि बेडवर पहुडले. लग्नाआधीचे काही दिवस आणि लग्नानंतरचे दहा दिवस जाणूनबुजून ते एकमेकांपासून दूर होते. स्पर्श सुद्धा टाळत होते. जेवढे टाळत होते तेवढी मिलनाची ओढ जास्त वाढत होती. पण एवढा लांबचा प्रवास झाल्यानंतर त्यांना एकमेकांच्या बाहुपाशात लगेच झोप लागली..

आणि सकाळी पाच वाजता दोघांना एकाच वेळेस अचानक जाग आली. सुबोधला एक जाणीव झाली - एक अर्ध अनावृत्त स्त्री शरीर आपल्याला चिटकून झोपलं आहे! आणि अचानक झालेल्या त्या जाणीवेने त्याचं सर्वांग शहारलं आणि उत्तेजित झालं. सुप्रियाही जागी झाली होतीच पण ती मुद्दाम झोपेच सोंग घेऊन वाट बघू लागली की, सुबोध आता स्वतःवर किती नियंत्रण करू शकतो ते?

आता तो प्रसंग आला होता जो त्यांनी ठरवून टाळला होता! त्याने तिला आवेगाने जवळ ओढले आणि तिच्या सर्वांगावर ओठांनी तो किस घेत राहिला आणि मग दोघांची शरीरे एकमेकांना जाणून घेण्यास एवढी अधीर झाली की जणू काही दोन अतिशक्तीशाली इलेक्ट्रोमॅग्नेट एकमेकांच्या सान्निध्यात आलेत! मग वस्त्रांनी बंधने गाळून पडली.

सुप्रिया च्या ओठांची ठेवण म्हणजे मुद्दाम केल्यासारखी होती.

सुप्रिया च्या नाजूक ओठांना सुबोध ने ओठाने स्पर्श केला आणि तिचे हळू हळू करत चुंबन घेण्यास सुरवात केली. सुरवातीस असलेला सुबोध चा वेग थोड्याच वेळात इतका जोरात झाला कि हलक्या चुंबनाची जागा स्मूचिंग ने कधी घेतली हे त्या दोघांना पण समजले नाही. सुबोध ने आणि ती दोघे पण बेभान होऊन एकमेकांवर चुंबनाचा वर्षाव करत होता.

सुबोध चा लंड कमालीचा कडक झाला होता. सुप्रिया च्या गळ्यावरून सुबोध आपले तोंड फिरवू लागताच ती अधिकच गरम झाली. तोंड फिरवत फिरवत सुबोध ने आपली जीभ बाहेर काढली आणि सुप्रिया च्या त्या गोऱ्यापान गळ्यावरून फिरवू लागला.

उन्हाळयात आईस्क्रीम जसे चाटून खातात तसे सुबोध तिचा गळा चाटत होता. खूप वेळ सुप्रिया च्या मानेशी, गळ्याशी आणि ओठांशी खेळून झाल्यावर सुबोध ने आपला मोर्चा सुप्रिया च्या छातीकडे वळवला. सुप्रिया च्या साडीचा पदर बाजूला करताच तिची भरदार छाती उघडी झाली.तिला सुबोध ने तसेच बेड वर झोपवले. तिची छाती कमालीची मादक असल्याचे त्याच्या लक्षात आले.

सुप्रिया च्या छातीला सुबोध ने दाबायला चालू करताच तिची छाती अजून जास्त वर येत होती. सुबोध समजत होता त्यापेक्षा किती तरी पटीने मोठी तिची छाती आहे. सुबोध ने आता स्वतःला त्या छातीला आपल्या तोंडात घेण्यापासून रोखू शकत नव्हता.

सुप्रिया च्या ब्लाउज ची बटणे सुबोध हळू हळू काढू लागला. सुप्रिया च्या लाल रंगाच्या ब्रा मध्ये तिची गोरी गुमटी छाती कमालीची उठून दिसत होती. त्या ब्रा वरच सुबोध ने आपले तोंड ठेवून आधाशा सारखा तिला चावू लागला. सुप्रिया च्या अंगाखाली सुबोध ने हात घातला आणि सुप्रिया च्या ब्रा चे हुक सोडताच तिची छाती पूर्ण उघडी पडली.

त्या गोऱ्या छातीला सुबोध ने तोंडात घेतले आणि चोखायला चालू केले. तिचे निप्प्प्ल्स भुऱ्या रंगाचे होते. त्यांना सुबोध ने आपल्या तोंडात घेऊन चोक चोक चोकू लागला. त्यांना दातात धरून चावताना सुबोध ला आसुरी आनंद मिळत होता. तिचे निप्पल्स ताठुन बाहेर येत होते. एका स्तनाला चोकत असताना दुसऱ्या स्तनाला सुबोध आपल्या हाताने प्रचंड ताकदीने दाबून काढत होता, रगडत होता.

खूप वेळ सुप्रिया च्या छातीचा उपभोग घेतल्यावर सुबोध ने तिची साडी फेडली आणि तिला पूर्ण नग्न केली. तिची लाल रंगाची निकर सुबोध ने आपल्या हातात घेतली आणि तीचा वास घेऊ लागला. त्या वासाने सुबोध अधिकच उद्युक्त झाला. सुप्रिया च्या त्या गोऱ्या देहावर सुबोध ने स्वतःला झोकून दिले. सुप्रिया च्या लुसलुशीत मांड्या सुबोध ने हाताने बाजूला केल्या

सुप्रिया च्या मांड्या बाजूला करताच सुप्रिया च्या गुलाबी योनीचे उभे दर्शन सुबोध ला झाले. सुबोध ने आपले तोंड सुप्रिया च्या जांघेत घातले आणि त्या लुसलुशीत मांसाचा आनंद घेऊ लागला. तिचं ते मांस सुबोध ने आपल्या तोंडात घेऊन चोकताना सुबोध ला प्रचंड भावना जागृत होत असल्याचे जाणवले. सुप्रिया च्या योनिवरून सुबोध आपली जीभ लगेच फिरवू लागला. कारण तिची योनी कमालीची गोरी आणि गुलाबी रंगाची होती.

तिची योनी चाटून चाटून सुबोध ने तिला खूपच गरम तर केली होतीच पण ती इतकी ओली झाली होती कि ती स्त्रवू लागली होती. तिची योनी फुगीर झाल्यावर सुबोध लगेचच उठला आणि लंड आपल्या हातात घेतला. हातात घेऊन सुबोध ने हळूच त्याला सुप्रिया च्या योनीत कोंबला आणि पूर्ण आत जाऊ पर्यंत सुबोध ने सुप्रिया च्या कलाने घेतले.

आपला लंड पूर्ण आत जाताच मात्र सुबोध ने प्रचंड वेगाने आपली कंबर हलवू लागला. इतक्या वर्षाचा सुबोध चा उपवास आज तुटला होता. त्यामुळे सुबोध ने खाऊ कि गिळू अश्या अविर्भावात तिला ठोकत होता. थोड्या वेळाने सुबोध ने तिचे दोन्ही पाय आपल्या खांदयावर घेतले आणि तिचं गांडीखाली उशी दिली. त्यामुळे तिची कंबर वर उचलली आणि सुबोध ला तिला ठोकताना अधिक आरामदायी पोजिशन मिळाली.

खूप वेळ एकसारखे ठोक ठोक ठोकून झाल्यावर सुबोध ने आपले वीर्य सुप्रिया च्या योनीत सोडले आणि ते दोघे शांत झाले.पण हा आनंद काही औरच होता.

स्त्री पुरुषाना एकमेकांवरचे मानसिक आणि शारीरिक प्रेम व्यक्त करता करता सगळ्यात शेवटी मिळणारी अत्युच्च अनुभूती काय असते ते दोघांनी आता प्रथमच अनुभवलं. मग त्यातून मिळालेल्या आत्यंतिक समाधानाने मंद पिवळ्या रंगाच्या प्रकाशात एकमेकांच्या वस्त्रविरहित शरीरांकडे, न्याहाळत आणि एकमेकांना कुरवाळत ते बराच वेळ पडून राहिले तेव्हा नुकतेच सहा वाजले होते.

तिच्या अंगावरून तसूभरही न बाजूला होता तो म्हणाला, "मॅडम! आज दिवसभर मी कुठेच जाणार नाही!"

"हो का? आणि मग ऑफिसात कोण जाणार? मी?" लटक्या रागाने ती म्हणाली.

"ना तू, ना मी! फक्त माझा बॉस आणि माझे कलिग्ज जातील ऑफिसला!"

सुप्रिया हसायला लागली.

"उठा. पहाट झाली. झोप संपली. स्वप्नांतून जागे व्हा. जीवनाचा रियालिटी शो सुरु झालाय! ऑफिसला जायची तयारी करा. सुट्टी संपली आहे," असे म्हणून तिने त्याला हळूच बाजूला ढकलले. अगदी अनिच्छेने तो उठला...
 
"उठा. पहाट झाली. झोप संपली. स्वप्नांतून जागे व्हा. जीवनाचा रियालिटी शो सुरु झालाय! ऑफिसला जायची तयारी करा. सुट्टी संपली आहे," असे म्हणून तिने त्याला हळूच बाजूला ढकलले. अगदी अनिच्छेने तो उठला...

...काही वेळानंतर मध्येच बाथरूम मधून आंघोळ करतांना बाहेर येऊन तो म्हणाला, "आपला पहिला सेक्स होईल त्या दिवसापासून मी तुला प्रिया म्हणणार असं मी मनात ठरवलं होतं. आजपासून तू माझी प्रिया! आज की ताजा खबर, आज की ताजा खबर! सुप्रिया बनी प्रिया! जेव्हा जेव्हा मी तुला प्रिया म्हणून हाक मारेन तेव्हा तेव्हा तू आणि मी हा पहिला सेक्स आठवून ताजेतवाने होऊ!"

असे म्हणून त्याने तिला ही बाथरूम मध्ये ओढले. बराच वेळ बाथरूम मधून आनंद आणि हास्याचे आवाज येत राहिले...

सुबोध ऑफिसला गेल्यानंतर दिवसभर ती रिकामीच होती. आज लगेच तिला स्वयंपाक बनवायचा नव्हता. या आठवड्यात सगळ्या गोष्टी सेट करायच्या होत्या. एशियन शॉप मधून आणलेली काही फूड पॅकेट्स फ्रिज मध्ये होती, त्यात तिचे दुपारचे जेवणाचे काम भागणार होते. मग तिने आवरसावर सुरु केली. ते घर अगदी मनापासून तिला आवडलं. दरम्याम तिने आई वडिलांना आणि सुबोधच्या आईला भारतात फोन केला (सुबोधला वडील नव्हते) आणि खुशाली कळवली.

हॉलमध्ये एक फायरप्लेस होतं. बाजूला एक मोठी खिडकी आणि त्याबाजूला एक छोटंसं काचेचं कपाट होतं. त्यात अनेक इंग्रजी आणि मराठी पुस्तके ठेवलेली होती. सुबोधासारखीच तिलाही वाचनाची आवड होतीच.

त्या घराची ओळख करून घेता घेता तिला बाजूला टेबलावर ठेवलेला एफ एम रेडिओ दिसला तो तिने ऑन केला. कोणतं तरी इटालियन गाणं सुरु होतं. त्यातले शब्द नीट कळत नव्हते पण ऐकायला वेगळाच आनंद यायला लागला आणि कोणत्यातरी अद्भुत दुनियेत गेल्यासारखं वाटत होतं ते गाणं ऐकून! त्या गाण्याने भारावून जाऊन आणि मंत्रमुग्ध होऊन तिच्या हातून भराभर कामं होऊ लागली. मराठी आणि इंग्रजी गाणे ती नेहमी ऐकायची पण इटालियन म्युझिक ती प्रथमच ऐकत होती.

ती त्या दिवशी बाहेर कुठेच गेली नाही कारण शहर, माणसं आणि तो देश हे सगळं तिच्यासाठी नवीन होतं. दुपारी फ्रिजमधील भाज्यांचे सॅन्डविच करून सॉस सोबत खाल्ल्यानंतर तिने सुबोधला कॉल केला. त्याला लवकर घरी यायला सांगून तिने फोन ठेवला. मग थोडा आराम करावा म्हणून ती बेडवर आडवी झाली. गेल्या काही महिन्यातल्या वेगवान घटना तिला आठवायला लागल्या...

(क्रमशः)
 
वलय - प्रकरण २४

राजेश सोबतच्या दु:खद ब्रेकपनंतर जीवनाला अचानक मिळालेली सुखद कलाटणी तिला आठवली. तिने मुद्दाम राजेशला असे सांगितले होते की ती यापुढे प्रोफेशनल रिलेशन कायम ठेवेल म्हणजे राजेश बेसावध राहील आणि तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार नाही.

राजेशकडून नकार आला तर असे सांगायचे हे तिने आधीच ठरवले होते. नंतर सोनी बनकरला राजेशसोबत झालेल्या ब्रेकपची कल्पना दिल्यानंतर ती काही दिवसांनी हॉस्टेल सोडून गेली होती. तिने मॅडम अकॅडमीच्या फायनल इयरच्या असाईनमेन्ट बऱ्याच आधी संपवल्या होत्या आणि रीतसर "मॅडम" चे प्रोव्हीजनल सर्टिफिकेट मिळवले.

मग तिने कायमचे पुण्याला घरी परत जाऊन आईला ब्रेकपबद्दल सांगितले. सुरुवातीला ती थोडी डिप्रेस झाली होती पण लवकर सावरली. तिने प्रॅक्टिकली विचार केला आणि सर्वप्रथम "चार थापडा सासूच्या" ही निरर्थक सिरीयल सोडायचे ठरवले. कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केल्याचे पैसेही तिने प्रोड्युसरला ऑनलाईन देऊन टाकले. तसेच स्वतःच्या लग्नासाठी तिने आईवडीलांकडे तयारी दर्शवली. आईवडील तिच्याकरता सुयोग्य वर शोधण्यात मग्न झाले.

सिरीयल्समध्ये येण्याआधी तिने नाटकात काम केले होतेच. म्हणून थोड्या प्रयत्नांनंतर काही दिवसांनी तिला एका नाटकात काम मिळाले.

"कुमारगंधर्व" मध्ये त्याचे 10 यशस्वी आणि 7 हाऊसफुल प्रयोग झाले. त्या नाटकाचे नांव- "चाफेकळी खुलली". दरम्यान कलेची आवड जपणारा आणि अत्यंत रसिक असलेला सुबोध केतगांवकर इटलीहून सुट्टी घेऊन भारतात आलेला होता. त्या नाटकाच्या 20 व्या प्रयोगाला तो आणि त्याची आई आले होते. तो तिचे काम बघून प्रभावित झाला. नाटक चालू असतांना सुबोध आणि त्याची आई पहिल्या रांगेत बसले होते. लव्ह ऍट फर्स्ट साईट जे काय म्हणतात ते त्या दोघांत नाटक चालू असतांनाच घडले. नाटकातील तिच्या प्रत्येक संवादाला आणि लाजवाब अभिनयाला सुबोधची मिळणारी दाद तिला आवडली. लवकरच त्याने तिचा पत्ता शोधून घरी येऊन तिला प्रपोज केले. तिलाही तो आवडला कारण तिच्या मनातही तो होताच. मग सोबत फिरणे झाले. दोघांच्या घरच्यांना ते मान्य झाले. मग राजेशला ती हळूहळू विसरली.

फ्रेंडबुकवर राजेश तिच्या फ्रेंड्स लिस्ट मध्ये होताच पण तिने सिरीयल सोडल्यानंतर कटाक्षाने कोणतेच स्टेट्स अपडेट टाकले नव्हते. इतकेच नाही तर सुबोधने सुद्धा त्याचे स्टेट्स अपडेट केले नव्हते. लग्नानंतर इटलीला पोहोचल्यानंतरच सिंगल स्टेटस बदलून मॅरिड करायचे असे त्यांनी ठरवले होते. तिने सुबोधला राजेशबद्दल कोणताही आडपडदा न ठेवता सगळे सांगितले होते. त्यांचे लग्न पुण्यातच झाले पण तिने अभिनय क्षेत्रातील काही मोजके सहकारी आणि मोजके मित्र आणि नातेवाईक यांनाच बोलावले होते. सुबोधने तिला ऍक्टिंगचे करियर करायला मोकळीक दिली होती. त्यासाठी ती अधूनमधून भारतात येऊ शकणार होती. वडील आणि नवरा दोघेही तिला करियरसाठी मोकळीक देणारे मिळाले याहून आणखी भाग्याची गोष्ट दुसरी कोणती असू शकते? यावर आणखी चांगली गोष्ट म्हणजे इटली मधल्या काही टीव्ही स्टार्सशी सुबोधची त्याच्या ऑफिसमधील सहकाऱ्याद्वारे ओळख झाली होती आणि त्याने सुप्रियला त्यांचेशी ओळख करून घ्यायचे कबुलही केले होते. त्या ऍक्टर 'फ्रांको बोनुकी' ला प्रत्यक्षात भेटण्याची उत्सुकताही तिला होती. मुंबईत असतांना ती 'केपीएक्स' चॅनेल वरची 'प्राईम प्रॉस्पेक्ट' ही इंग्रजी सिरीयल नेहेमी बघायची.

नंतर तिचा व्हिसा आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाली. दरम्यान ती हळूहळू इटालियन भाषा शिकली. त्यासाठी तिने पुण्यात "जोशींकडे झटपट परदेशी भाषा शिका!" अशी जाहिरात असलेला इटालियन भाषेचा कोर्स केला तसेच ऑनलाइन वेबसाईट्सची आणि विविध मोबाईल अप्लिकेशनची मदत घेतली. राजेश सोबत ब्रेकप झाला हे एका अर्थाने बरे झाले असे तिला वाटले.

कदाचित जे राजेश म्हणाला होता तेच बरोबर होते की: "हे बघ! प्रॅक्टिकली विचार कर सुप्रिया. तू आणि मी दोघेही या बेभरवशाच्या क्षेत्रात एकत्र येऊन भरवशाचा संसार नाही करू शकत."

सुप्रिया फक्तच करियरिस्ट नव्हती तर तिला वर्क लाईफ बॅलन्स हवा होता. एका गोष्टीसाठी दुसऱ्या गोष्टीचा बळी द्यायची तिची इच्छा नव्हती. म्हणून लग्न वगैरे सारख्या जीवनातल्या महत्वाच्या गोष्टी वेळेवरच व्हायला हव्या असे तिला वाटे.

बेडवर विचारांत असतांनाच तिला अचानक आठवले:

फ्रेंडबुक? येस! आज फ्रेंडबुकचा फडशाच पडते मी!

असा विचार करून ती बेडवरून उठली आणि मोबाईल जवळ घेऊन बेडवर मोठ्या मऊ उशीला टेकून बसली. बघूया काय काय अपडेट्स आलेत? 1250 नवीन नोटिफिकेशन्स आलेले होते! ओह गॉड! किती दिवस झाले चेक केले नाही!

तिचे आणखी एक फेसबुक पेज सुद्धा होते तेही ती स्वतः मॅनेज करत असे आणि एक होते स्वतःचे फ्रेंडबुक अकाउंट! फ्रेंडबुकवर कुठेच तिने स्वतःचा मोबाईल नंबर कधीच दिला नव्हता. भारत सोडतांना तिने जुना नंबर कायमचा बंद केला आणि भारतात एक नवीन पोस्टपेड नंबर घेतला होता. तो आणि इटलीत आणखी एक नंबर ती घेणार होती. तिने तिचे स्टेटस अपडेट केले- "मॅरीड टू सुबोध केतगांवकर!"

त्याबरोबरच तिने फेसबुक वरचे आपले नांव बदलले- प्रिया केतगांवकर. सुबोधनेही नुकताच ऑफिसमधून त्याचे स्टेट्स बदलले. तेव्हा मेसेंजरवर राजेशसुद्धा तिला ऑनलाइन दिसला. त्याचे प्रोफाइल तीने चेक केले तेव्हा तिला दिसले की त्याने सुद्धा एका तासांपूर्वीच त्याचे स्टेटस "मॅरीड टू सुनंदा!" असे केले होते. काय योगायोग असतो एकेक! तिला आश्चर्य वाटले. आणि ही जी कोण सुनंदा आहे ती मात्र फ्रेंडबुकवर नव्हती.

तिचे स्वतःचे नवे स्टेटस बघून राजेशला काय वाटेल असा विचार तिच्या मनाला शिवून गेला आणि राजेशकडून कधी सुनंदाबद्दल काहीच ऐकले नव्हते. आणि मुळात माझ्यासोबतच काय पण राजेश लग्नालाच तयार नव्हता मग त्याने अचानक घाईत लग्न का केले असावे? असे विचार तिच्या मनात येऊ लागले. एनिवे तुला काय करायचे ते जाणून घेऊन, सुप्रिया! ऑनलाइन असल्याने कदाचित राजेश तिच्याशी चॅट सुरु करू शकतो असे वाटून ते टाळण्यासाठी तिने इंटरनेट बंद केले आणि बेडवर आडवी झाली. राजेश सोबतचे अनेक प्रसंग तिला आठवायला लागले पण तिने ते विचार झटकन बाजूला सारले.

सुप्रियाचा इटली देशातला पहिला आठवडा नव्या शहराची ओळख करून घेण्यात गेला. सुबोधने घरातल्या टीव्हीवर लोकल इटालियन चॅनेल्स सोबतच इंडियन आणि इंटरनॅशनल चॅनेल्सचे पॅक (कार्ड) सुद्धा घेतले होते. ते महाग होते पण त्याच्या रसिक वृत्ती साठी आणि सुप्रियाच्या एकूणच पुढच्या संभाव्य करियरसाठी ते आवश्यक होते. त्यायले भारतीय कार्यक्रम सिलेक्टेड होते आणि त्याच्या वेळा या भारतात ते कार्यक्रम टेलिकास्ट होण्याच्या वेळांपेक्षा वेगळ्या होत्या. सुबोधकडे घरी ब्रॉडबँड वायफाय आणि एक लॅपटॉप होता, लँडलाईन फोन होता. सुप्रियाचा स्वतःचाही लॅपटॉप तिने सोबत आणलेला होता आणि सुबोधचा ऑफिसचा लॅपटॉप वेगळा होता.

एके दिवशी सुप्रियाने चॅनेल बदलता बदलता "चार थापडा सासूच्या" सिरीयल मधली बदललेली सून पाहिली. वैशाली विचारे. तिने सुप्रिया करत असलेला रोल चांगलाच निभाऊन नेला होता. एकूण काय, तर सुप्रिया गेल्याने सिरीयल थाबली नव्हती किंवा सिरीयलचे नुकसान झाले नव्हते हे महत्वाचे!
 
वलय - प्रकरण २५

गॉथिक शैलीने बांधलेल्या एका भव्य बिल्डिंगमध्ये एक गौरवर्णीय उंचापुरा माणूस शिरतो. त्याच्या हातात बंदूक असते. भव्य दरवाज्यातून आत येताच आधी उजवीकडे आणि मग डावीकडे बघून तो बंदूक समोर धरतो. कुणी दबा धरून बसलेलं असेल तर त्याला हालचाल आणि हल्ला करायला मिळू नये म्हणून तो सावधगिरीने पावले उचलतो. त्याची नजर वर जाते. वर एक भव्य काचेचे झुंबर असते.

वरच्या बाजूला रंगीबेरंगी काचेच्या तुकड्यांनी बनलेला वाटावा असा भव्य गोल घुमट असतो. तो माणूस पुढे जात राहतो. दोन्ही हात नाकासमोर ताणून त्याने बंदूक धरलेली असते. पुढे गुलाबाच्या पाकळ्या एकमेकांमध्ये गुंतल्या आहेत असे वाटणारे बांधकाम असते. त्या बाजूला काचेच्या रंगीत तुकड्यांतून मस्त सूर्यप्रकाश आत येत असतो. बहुतेक जे तो शोधत होता ते न सापडल्यामुळे त्या माणसाची निराशा झाली असावी.

....तो बंदूक खाली करतो आणि उलट्या दिशेने चालू लागतो. तो माणूस पाठमोरा वळताच, त्याच्या मागच्या त्या रंगीत काचेच्या खिडक्या ताडताड फुटतात आणि त्यातून लोखंडी दांडा हातात घेतलेला आणि स्टेनगन हातात घेतलेला असे दोन माणसं उड्या मारून खाली पडतात. खाली पडल्यावर ते दोघे उठतात आणि त्या आवाजामुळे तो बंदुकवाला माणूस सावध होऊन पुन्हा मागे वळतो. पण तो माणूस सावरायच्या आत लोखंडी दांड्यावाला त्याच्या हातावर दणका मारून त्याची बंदूक खाली पाडतो.

ती बंदूक खाली उचलण्याचे नाटक करत तो माणूस खाली वाकतो आणि वायूवेगाने मागच्या बाजूला पाय फिरवून स्टेनगन वाल्याला आणि लोखंडी दांड्यावल्या माणसाला एकाच वेळेस खाली पाडतो. स्टेनगन आणि दांडा दूर जाऊन पडतात.

आता तिघेही शस्त्र विहीन असतात. तिघेही धडाधड एकमेकांना भिडतात. हातापायांचे वार आणि थापडा एकमेकांना बसू लागतात. त्याचा चटाचट आवाज येऊ लागतो... बराच वेळ तिघांमध्ये धुमश्चक्री चालते. तो एकटा दोघांना भारी पडतो...

तीन बाजुंनी तीन हलते कॅमेरे आणि एक समोरून स्थिर कॅमेरा (सगळे कॅमेरे एका बाजूच्या अर्धगोलात) असे चार कॅमेरे हा प्रसंग टिपत होते कारण हा चित्रपट थ्रीडी असणार होता. तो एक इटालियन चित्रपट होता. दूरवरच्या बाकड्यांवर काही मोजके लोक ही शुटिंग श्वास रोखून बघत होते. त्यात सुप्रिया, सुबोध आणि त्याचा ऑफीसातला कलीग "व्हीटोरिओ अंतीनिओ" हे सुद्धा होते. तो बंदुकवाला माणूस म्हणजेच 'फ्रांको बोनुकी' होता. टीव्ही सिरीजनंतर त्याचा हा पहिला इटालियन चित्रपट होता. सुप्रियाचे फ्रांकोला याची डोळा बघण्याचे स्वप्न पूर्ण होत होते. ही सगळी शुटिंग इटलीच्या रोम शहरातील "सिनेसीत्ता" (इंग्रजीत - सिनेमा सिटी) या भव्य फिल्म स्टुडिओमध्ये होत होती. इटलीत येऊन आता दोघांना दोन महिने झाले होते. एका विकेंडला दोघे रोम शहर बघायला आलेले होते. प्रथम त्यांनी फिल्म स्टुडिओ बघितला. व्हीटोरिओच्या ओळखीने त्यांना ही शूटिंग बघायला मिळत होती.

'फ्रांको बोनुकी' इतका मोठा ऍक्शन शॉट देत असतांना सुद्धा त्याच्या मनात काहीतरी वेगळेच चालले होते. इतक्या शारीरिक कसरतीच्या सिन मध्ये सुद्धा त्याच्या मनात आठवणींचा कल्लोळ सुरु होता.

"एंजेलिना करोल"- त्याची गर्लफ्रेंड, जिच्यासोबत तो गेली चार वर्षे लिव्ह इन मध्ये राहात होता ती मागील सहा महिन्यांपासून बदलली होती. फ्रांकोला तिने एकसारखे बोलून बोलून डिवचायला सुरुवात केली होती. त्याची सुरुवात एका छोट्याशा वाटणाऱ्या प्रसंगाने झाली होती. पण त्यातून राईचा पर्वत झाला होता आणि तो पर्वत दिवसेंदिवस मोठा मोठा होत चालला होता. आता गेल्या काही दिवसातला तो प्रसंग त्याला आठवला -

एंजेलिना त्याला इटालियन भाषेत खूपच टाकून बोलली होती -

"आंद्रे अल इन्फर्नो कोन ला तूआ रगझ्झा!'

म्हणजे -

"म्हणजे तुझ्या गर्लफ्रेंड सोबत तू मसणात जा!"

त्याला बोलायचा चान्स न देताच तिने त्याला शिवीगाळ केली होती.

तिचा गैरसमज झाला होता. ती ज्या गर्लफ्रेंडबद्दल बोलली होती ती फ्रांकोची गर्लफ्रेंड नव्हती. त्याने लाख समजावण्याचा प्रयत्न केला पण...ती ऐकत नव्हती.

तिला खरंच एक मुस्काटात द्यावे असे त्यावेळेस त्याला वाटले होते पण ती धाडकन त्याच्या तोंडावर दरवाजा आपटून त्या दिवशी बाहेर निघून गेली होती..

..फ्रांकोने अगदी जोर लावून समोरच्या माणसाच्या मुस्काटात दिली. एवढ्या जोरात की तो मार खाणारा समोरचा स्टंटमॅन अनपेक्षितपणे फ्रांकोकडे बघत राहिला आणि हेलपाटे खाऊन बराच दूर जाऊन पडला. पण कॅमेरामनच्या ते लक्षात आले नाही. तो शॉट जरुरीपेक्षा खूप जास्त रियल शूट झाला. पण फ्रांकोच्या लक्षात आल्यावर त्याने डायरेक्टरला खूण करून शूटिंग मधेच थांबवण्याची विनंती केली. त्या स्टंटमॅनला मदतीचा हात देऊन त्याने उठवले आणि सॉरी चुकून झाले म्हणून त्याची माफी मागितली.त्या दिवशीचा हा शेवटचा सिन असल्याने थोडे थांबून उरलेला सिन पुन्हा शूट करायचे ठरवले गेले. खरचटलेले आणि फाटलेले कपडे बदलले गेले.

व्हीटोरिओ, सुबोध आणि सुप्रिया हे तिघे फ्रांकोची फ्री होण्याची वाट बघू लागले. फ्रांको आणि बघ्यांमध्ये केव्हापासून बसून असलेली त्या चित्रपटाची हिरोईन "मार्सेला रमानो" हे दोघेजण आणि डायरेक्टर असे तिघेजण पिझ्झा खायला बसले. सोबत डाएट कोक होता.

व्हीटोरिओ वाट बघू लागला की फ्रांकोचे त्याच्याकडे दुरून का होईना थोडे लक्ष गेले तर बरे होईल. पिझ्झा खाऊन झाल्यावर थोडा आराम करण्यासाठी म्हणून बाजूच्या रूममध्ये जाण्यासाठी फ्रांको वळला तर त्याला नजरेच्या कोपऱ्यातून व्हीटोरिओ दिसला आणि त्याला हायसे वाटले. त्याच्या मनाला त्रास देणारा इश्यू विसरून अचानक त्याचे मन थोडे त्यातून बाहेर आले. फ्रांको स्वतःहून त्यांचेकडे चालत गेला तसे सुबोध आणि सुप्रिया नर्व्हस झाले आणि थोडे अलर्ट झाले.

सेटवरील इतर सर्वजण आपापल्या इतर कामांत गढून गेली. दरम्यान व्हीटोरिओने दोघांची ओळख फ्रांकोशी करून दिली. सुबोध कलाप्रेमी आणि सुप्रिया एक ऍक्टर आहे, दोन्ही भारतातून आलेत वगैरे थोडक्यात कल्पना दिली. व्हीटोरिओ आणि फ्रांको अनेक वर्षांपासूनन एकमेकांना ओळखत होते. अगदी थोड्या वेळाच्या त्या भेटीत सुप्रिया फ्रांकोला त्याचा अभिनय तिला आवडत असल्याचे सांगायला विसरली नाही. विशेष म्हणजे फ्रांको नावाप्रमाणे अगदी फ्रॅंक वाटला तिला! मनमोकळा! चित्रपट विषयावर त्यांनी थोड्या गप्पा केल्या. एक सेल्फी सुद्धा त्यांनी काढली. सुबोध सुप्रिया दोघेही खुश होते.

फ्रांको पुन्हा शूटिंगला निघून घेल्यावर व्हीटोरिओने सुद्धा त्या दोघांचा निरोप घेतला. दोघांनी अर्धे "सिनेसीत्ता" बघितले. नंतर पुन्हा वेळ मिळेल तसे ते पुन्हा येथे येणार होतेच. नाहीतरी सुबोध सुप्रिया सारख्या सिने रसिकांसाठी "सिनेसीत्ता" हे ठिकाण फक्त एकदा भेट देऊन एका दमात बघून मोकळे होण्यासारखे नव्हतेच!

एकंदरीत त्यांची त्या दिवशीची रोम ट्रिप स्मरणीय ठरली.
 
वलय - प्रकरण २६

राजेश, सुप्रिया, सोनी आणि रागिणी यांचे जीवन वेगवेगळी वळणे घेत होती. कधी अपेक्षित तर कधी अनपेक्षित! सोनी आणि रागिणीचे मॅडम अकॅडमी मधील रीतसर शिक्षण आता पूर्ण झाले होते. सुप्रियाचे सुद्धा आधीच ते झाले होते. त्यांना रीतसर सर्टिफिकेटस मिळाले होते. तसेच त्यांनी होस्टेल सोडले. सोनी मालाडला भाड्याने रूम घेऊन राहू लागली होती. जवळच्याच एका भागात तिची एक दूरची एक विधवा स्त्री-नातेवाईक रहात होती. तसा त्यांचा जास्त घरोबा नव्हता पण ती एकदा तिच्याकडे जाऊन आली. तसेच गावाकडे आईला सोनी पैसे नियमित पाठवत असे.

आता एलेना आणि नताशा तिघींच्या पूर्वीच्या हॉस्टेल रूम मध्ये राहत होत्या. एलेना कॅनडाहून तर नताशा श्रीलंकेहून बॉलिवूड मध्ये नशीब कमवायला आलेल्या होत्या. त्या दोघींनी सुद्धा मॅडम अकॅडमी जॉईन केलेली होती. त्या दोघींसोबत तिसरी पार्टनर त्यांना जॉईन झाली, तिचे नाव - मिष्टी मेहरान!

ती मॅडम अकॅडमी मध्ये नवोदित स्टुडंट्सना शॉर्ट फिल्म्स आणि ऍड फिल्म्स बनवण्याची कला शिकवायची! आणि अर्थातच मिष्टी हे नांव आता मॅडम अकॅडेमीतच नाही तर शॉर्ट फिल्म्स क्षेत्रातही खूप प्रसिद्ध होत होते. मिष्टीने फारच कमी वयात हे यश मिळवले होते.

दरम्यान राजेशने त्याच्या स्पेशल टीममधील अनेक जणांना मिष्टीच्या शॉर्ट फिल्म्समध्ये काम मिळवून दिले आणि त्या कलाकारांचा अभिनय अनेकांकडून वाखाणला गेला, कौतुक झाले. तसेच मसालेदार कथालेखन करायची इच्छा असलेल्या काही जणांना राजेशने तो लिहीत असलेल्या स्क्रिप्टससाठी त्याचा सहायक म्हणून घेतले होते आणि ते लोक त्या बदल्यात राजेश म्हणेल त्या चित्रपटाबद्दल "अपप्रचार" करायला एका पायावर तयार होते. विशेषकरून "के. के. सुमन" शी संबंधित चित्रपट!

दरम्यान समीरण देवधरने राजेशची विनंती मान्य केली होती आणि मराठी ऐवजी हिंदी चित्रपट बनवण्याची कल्पना त्याला पसंत पडली होती. चित्रपट निर्मिती लवकरच सुरु होणार होती.

दरम्यान रागिणी आणि सूरजने लग्न करायचा विचार लांबणीवर टाकला. लिव्ह इन मध्ये ते खुश होते. सूरजच्या परदेश वाऱ्या (विशेषतः ब्राझील देशातल्या) वाढू लागल्या आणि त्याचे वडील डी. पी. सिंग यांच्यासोबत रागिणी करत असलेल्या हॉरर सिरियल्स सुपरहिट होत होत होत्या. सुभाष भटने रागिणीला त्यांच्या आगामी हॉरर चित्रपटात घेण्याबद्दल डी. पी. सिंग यांना एकांतात विचारले होते कारण रागिणीला मुंबईत कुणी नातेवाईक नाहीत हे सिंग यांनी भट यांना सांगितले होते तसेच सूरज आणि रागिणी लिव्ह इन मध्ये राहातात ही त्यांना कल्पना होती. मग सिंग यांना विचारणेच योग्य आहे असे भटना वाटले. विचार करून सांगतो असे म्हणून त्यांनी भटकडे वेळ मागितला पण रागिणीजवळ त्याबद्दल बोलण्याऐवजी त्यांना ते सूरजला आधी सांगणे योग्य वाटले.

सूरजला सांगितल्यानंतर आश्चर्य असे की त्याने परवानगी तर दिलीच नाही उलट तो म्हणाला की आता आपण रागिणीला हळूहळू मनोरंजन क्षेत्रापासून दूर करायला हवे. तिने हाउस वाईफ म्हणून राहावे किंवा सूरजच्या फूड कंपनीत त्याला काहीतरी मदत करावी अशी त्याची इच्छा दिसली. म्हणून नाईलाजाने सिंग यांनी रागिणीला भटच्या प्रपोजलबद्दल डायरेक्ट सांगणे टाळले. सूरजने त्यांना आश्वासन दिले की तो रागिणीशी याबद्दल बोलेल त्यामुळे सिंग निर्धास्त झाले आणि दोघांच्या मध्ये न पडण्याचे त्यांनी ठरवले.

पण सूरजने रागिणीला त्याबद्दल सांगितलेच नाही. दरम्यान रागिणीला राहुलच्या फोनवरच्या धमक्या पुन्हा सुरू झाल्या. पैसे संपेपर्यंत तो चूप बसायचा मग परत कॉल करायचा. ती त्याला पैसे पुरवत होती. आता सूरजला याबद्दल सांगण्यावाचून पर्याय नव्हता!!!

क्रमशः
 
स्टोरी वाचल्या बद्दल आपला आभारी आहे
 
Back
Top